शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

कांदा उत्पादन वाढविण्यासाठी केंद्राने तयार केली योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 05:49 IST

पाच राज्यांना ९,९०० हेक्टर लागवड वाढविण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशामध्ये कांद्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे दरवाढ होण्याची भीती लक्षात घेऊन आगामी काळात देशातच कांद्याचे पुरेसे उत्पादन होण्यासाठी राज्यांनी कांद्याचे उत्पादन क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यास केंद्र सरकारने सांगितले आहे. ज्या राज्यांमधून कमी प्रमाणात कांदा उत्पादन होते, त्यांनी सुमारे ९९०० हेक्टर कांद्याचे क्षेत्र कसे वाढेल, याची योजना आखून कांद्याच्या किमती नियंत्रणामध्ये राखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

देशामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये खरीप हंगामामध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. मात्र, काही नैसर्गिक संकट उद्भवल्यास कांद्याच्या उत्पादनामध्ये कपात होऊन देशामध्ये कांद्याची टंचाई निर्माण हाेऊन दरवाढ होत असते. हे दुष्टचक्र भेदण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याचे उत्पादन दुय्यम स्वरूपात घेणाऱ्या राज्यांकडे लक्ष केंद्रित केले असून, या पाच राज्यांमध्ये खरिपाच्या कांद्याची लागवड ९९०० हेक्टरने वाढविण्यासाठीचे प्रयत्न चालविले आहेत. 

राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेश या राज्यांना केंद्र सरकारने उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले आहे. यामधील राजस्थानचा अपवाद वगळता अन्य राज्यांमध्ये भाजपचे सरकार असल्याने केंद्र सरकारच्या आवाहनाला त्यांच्याकडून फारसा विरोध होण्याची शक्यता जाणवत नाही.

५१ हजार हेक्टर क्षेत्राचे लक्ष्यn कांद्याचे दुय्यम उत्पादन घेणाऱ्या पाच राज्यांमध्ये मागील वर्षाच्या खरीप हंगामामध्ये ४१,०८१ हेक्टरचे क्षेत्र कांदा लागवडीखाली होते. त्यामध्ये वाढ करून या हंगामामध्ये कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्र ५१ हजार हेक्टरवर न्यावे, असा केंद्राचा विचार आहे. यामुळे देशातील कांद्याच्या उत्पादनामध्ये वाढ होईल. n काही नैसर्गिक संकट येऊन कांद्याचे उत्पादन कमी झाल्यास त्यामुळे टंचाई आणि दरवाढीची समस्या उद्भवणार नाही. त्याचप्रमाणे सरकारला कांद्याची आयात करण्याची गरज भासणार नाही. मात्र, ही सर्व राज्य सरकारे केंद्र सरकारच्या आवाहनाला कितपत प्रतिसाद देतात व तेथील कांदा उत्पादन कसे होते, यावरच बरेचसे अवलंबून राहणार आहे.

 ज्या राज्यांमध्ये कांद्याचे उत्पादन त्यामानाने कमी प्रमाणात होते, तेथे कांद्याची लागवड वाढावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आम्ही त्या राज्य सरकारांशी चर्चा केली असून, त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे. कांद्याचे उत्पादन वाढल्यास देशामध्ये कांद्याची आयात करण्याची जरूरी भासणार नाही.  - एस. के. मल्होत्रा, कृषी आयुक्त

टॅग्स :onionकांदा