शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

कांदा उत्पादन वाढविण्यासाठी केंद्राने तयार केली योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 05:49 IST

पाच राज्यांना ९,९०० हेक्टर लागवड वाढविण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशामध्ये कांद्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे दरवाढ होण्याची भीती लक्षात घेऊन आगामी काळात देशातच कांद्याचे पुरेसे उत्पादन होण्यासाठी राज्यांनी कांद्याचे उत्पादन क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यास केंद्र सरकारने सांगितले आहे. ज्या राज्यांमधून कमी प्रमाणात कांदा उत्पादन होते, त्यांनी सुमारे ९९०० हेक्टर कांद्याचे क्षेत्र कसे वाढेल, याची योजना आखून कांद्याच्या किमती नियंत्रणामध्ये राखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

देशामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये खरीप हंगामामध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. मात्र, काही नैसर्गिक संकट उद्भवल्यास कांद्याच्या उत्पादनामध्ये कपात होऊन देशामध्ये कांद्याची टंचाई निर्माण हाेऊन दरवाढ होत असते. हे दुष्टचक्र भेदण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याचे उत्पादन दुय्यम स्वरूपात घेणाऱ्या राज्यांकडे लक्ष केंद्रित केले असून, या पाच राज्यांमध्ये खरिपाच्या कांद्याची लागवड ९९०० हेक्टरने वाढविण्यासाठीचे प्रयत्न चालविले आहेत. 

राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेश या राज्यांना केंद्र सरकारने उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले आहे. यामधील राजस्थानचा अपवाद वगळता अन्य राज्यांमध्ये भाजपचे सरकार असल्याने केंद्र सरकारच्या आवाहनाला त्यांच्याकडून फारसा विरोध होण्याची शक्यता जाणवत नाही.

५१ हजार हेक्टर क्षेत्राचे लक्ष्यn कांद्याचे दुय्यम उत्पादन घेणाऱ्या पाच राज्यांमध्ये मागील वर्षाच्या खरीप हंगामामध्ये ४१,०८१ हेक्टरचे क्षेत्र कांदा लागवडीखाली होते. त्यामध्ये वाढ करून या हंगामामध्ये कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्र ५१ हजार हेक्टरवर न्यावे, असा केंद्राचा विचार आहे. यामुळे देशातील कांद्याच्या उत्पादनामध्ये वाढ होईल. n काही नैसर्गिक संकट येऊन कांद्याचे उत्पादन कमी झाल्यास त्यामुळे टंचाई आणि दरवाढीची समस्या उद्भवणार नाही. त्याचप्रमाणे सरकारला कांद्याची आयात करण्याची गरज भासणार नाही. मात्र, ही सर्व राज्य सरकारे केंद्र सरकारच्या आवाहनाला कितपत प्रतिसाद देतात व तेथील कांदा उत्पादन कसे होते, यावरच बरेचसे अवलंबून राहणार आहे.

 ज्या राज्यांमध्ये कांद्याचे उत्पादन त्यामानाने कमी प्रमाणात होते, तेथे कांद्याची लागवड वाढावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आम्ही त्या राज्य सरकारांशी चर्चा केली असून, त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे. कांद्याचे उत्पादन वाढल्यास देशामध्ये कांद्याची आयात करण्याची जरूरी भासणार नाही.  - एस. के. मल्होत्रा, कृषी आयुक्त

टॅग्स :onionकांदा