शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

केंद्र सरकारने भाजपच्या 32 नेत्यांची सुरक्षा काढली; ...म्हणून अमित शाह यांनी घेतला हा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 18:59 IST

यात गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या काही भाजप नेत्यांच्या नावाचाही समावेश होता...

केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी (२६ फेब्रुवारी २०२५) पश्चिम बंगालमधील एकूण ३२ भाजप नेत्यांची सुरक्षा काढून घेतली. खरे तर, गृह मंत्रालयाच्या समीक्षा समितीने यासंदर्भात एक यादी जाहीर केली होती, यात गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या काही भाजप नेत्यांच्या नावाचाही समावेश होता. 

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, माजी केंद्रीय मंत्री जॉन बारला, माजी खासदार दशरथ तिर्की, बीजेपी नेते शंकुदेव पांडा आणि माजी आयपीएस अधिकारी देबाशीष धर आदीनेत्यांचा सुरक्षा हटवण्यात आलेल्या ३२ नेत्यांमध्ये समावेश आहे. महत्वाचे महणजे, तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) खासदार अभिषेक बनर्जी यांच्याकडून पराभूत झालेले डायमंड हार्बर भागातील उमेदवार अभिजीत दास, डायमंड हार्बरचे माजी आमदार दीपक हलदर, बोलपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार पिया साहा आणि जंगीपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार धनंजय घोष आंदींचाही या यादीत समावे आहे.

काय म्हणाले अभिजीत दास? -अभिजित दास म्हणाले, "मी हरिद्वारमध्ये आहे, यासंदर्भात मला कसलीही माहिती नाही. यासंदर्भात आपल्याकडे अद्याप कोणताही मेसेज आलेला नाही. खरे तर, ही एक नियमित प्रक्रिया आहे. केंद्रीय गृहमंत्रालय दर तीन महिन्याला अशा प्रकारची यादी  जारी करत असते. त्यांचा एक प्रोटोकॉल आहे. ते पुन्हा सुरक्षा प्रदान करत असतात. गेल्या साडे सहा वर्षांत मी हे अनेक वेळा बघितले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी २० जणांच्या नावांची अशी एक यादी आली होती. यानंतर पुन्हा अनेकांना सुरक्षा देण्यात आली."

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना भाजप खासदार तथा राज्य प्रवक्ते समिक भट्टाचार्य इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना म्हणाले, "ही एक नियमित प्रक्रिया आहे. सुरक्षिततेची आवश्यकता कुणाला आणि केव्हा आहे, हे केंद्र ठरवते आणि त्यानुसार सुरक्षा पुरवली जाते. यासंदर्भात राजकारण करण्यासारखे काहीही नाही. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगाल