शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

सात दिवसांत फाशीची अंमलबजावणी व्हावी; मोदी सरकारची सर्वोच्च न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 20:34 IST

निर्भया प्रकरणासारखा विलंब होऊ नये म्हणून गृह मंत्रालयाची याचिका

नवी दिल्ली: निर्भया प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतरही दोषींकडून विविध तांत्रिक मुद्द्यांचा आधार घेत फाशी लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न होत आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मोदी सरकारनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी सात दिवसांत व्हावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी गृह मंत्रालयानंसर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. निर्भया प्रकरणातल्या दोषींनी पुनर्विचार, सुधारणा (क्युरेटिव्ह) आणि दया याचिका दाखल केल्यानं त्यांची शिक्षा लांबली आहे. असे प्रकार टाळण्यासाठी गृह मंत्रालय प्रयत्नशील आहे. पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यासाठी एक मुदत निश्चित करण्यात यावी, अशी मागणी गृह मंत्रालयानं याचिकेच्या माध्यमातून केली आहे. 'न्यायालयानं डेथ वॉरंट जारी केल्यानंतर दोषी व्यक्तीला दया याचिका दाखल करण्यासाठी सात दिवसांचा कालावधी दिला जावा,' असं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. दया याचिका फेटाळल्यानंतर सात दिवसांत डेथ वॉरंट जारी करण्याचे आदेश सर्व न्यायालयं, राज्य सरकारं, तुरुंग प्रशासनाला देण्यात यावेत आणि यानंतर सात दिवसांच्या आत दोषी व्यक्तीला फाशी देण्यात यावी. या दरम्यान दोषीची पुनर्विचार, क्युरेटिव्ह, दया याचिका कोणत्याही टप्प्यात असली तरी फाशीची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी गृह मंत्रालयानं याचिकेतून केली आहे.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयNirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपNarendra Modiनरेंद्र मोदीHome Ministryगृह मंत्रालय