शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मंत्रिपदावरुन तडकाफडकी बदली; किरेन रिजिजू यांनी दिली मोजकीच प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 12:00 IST

मंत्रिपदावरुन तडकाफडकी बदली होताच किरेन रिजिजू यांनी मोजकी प्रतिक्रिया दिली आहे.

नवी दिल्ली: केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांना पदावरुन तडकाफडकी हटवण्यात आलं आहे. आता कायदा मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तर किरेन रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रालय काढून पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

केंद्र सरकारमधील मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे. मंत्रालयाच्या कामांचा अहवाल सादर करण्यात आला आहे. यानंतरच सरकारच्या वतीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मंत्रिपदावरुन तडकाफडकी बदली होताच किरेन रिजिजू यांनी मोजकी प्रतिक्रिया दिली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन खात्यांमध्ये बदल करण्यात आला आहे, असं स्पष्टीकरण किरेन रिजिजू यांनी दिलं आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून न्यायव्यवस्था, सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे किरेन रिजिजू यांचे कायदा मंत्रिपद काढून घेण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.  

किरेन रिजिजू हे अरुणाचल पश्चिम लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे खासदार आहेत. किरेन रिजिजू यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९७१ रोजी अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यात झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आहे. त्यांनी २००४ मध्ये (अरुणाचल पश्चिम मतदारसंघ) पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली. पण २००९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. २०१४च्या निवडणुकीत रिजिजू पुन्हा विजयी झाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांना गृहराज्यमंत्री बनवण्यात आले. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात म्हणजेच २०१९मध्ये त्यांना क्रीडा मंत्री (स्वतंत्र प्रभार) बनवण्यात आले. जुलै २०२१मध्ये, त्यांना मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान कायदा मंत्री करण्यात आले. रविशंकर प्रसाद यांच्या जागी त्यांना ही जबाबदारी देण्यात आली होती.

कोण आहे अर्जुन राम मेघवाल?

अर्जुन राम मेघवाल हे २००९पासून बिकानेरचे खासदार आहेत. मेघवाल यांचा जन्म बिकानेरच्या किसमिदेसर गावात झाला. बिकानेरच्या डुंगर कॉलेजमधून बीए आणि एलएलबी केले. यानंतर त्यांनी त्याच महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवी (M.A) केली. यानंतर त्यांनी फिलिपाइन्स विद्यापीठातून एमबीएही केले. ते राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत आणि राजस्थानमधील अनुसूचित जातीचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मेघवाल २००९, २०१४ आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीत बिकानेरमधून भाजपच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले होते. २०१३मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात ते लोकसभेतील भारतीय जनता पक्षाचे मुख्य व्हीप होते. मे २०१९मध्ये मेघवाल संसदीय कामकाज आणि अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम राज्यमंत्री बनले. आता त्यांच्याकडे कायदा मंत्रालयाची जबाबदारीही देण्यात आली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार