शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 21:57 IST

मणिपूरमधील जिरीबाम येथे सोमवारी हमार समुदायातील संशयित अतिरेक्यांना (उग्रवादी) सुरक्षा दलांनी ठार केले. यानंतर परिसरातील तीन मुलांसह मैतेई समाजाचे सहा लोक अद्यापही बेपत्ता आहेत.

हिंसाचाराच्या ताज्या घटना आणि कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) 20 अतिरिक्त कंपन्या मणिपूरला पाठवल्या आहेत. यात सुमारे 2,000 जवान आहेत. अधिकृत सूत्रांनी बुधवारी ही माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी रात्री या जवानांना तातडीने हवाई मार्गाने पाठवून तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. मणिपूरमधील जिरीबाम येथे सोमवारी हमार समुदायातील संशयित अतिरेक्यांना (उग्रवादी) सुरक्षा दलांनी ठार केले. यानंतर परिसरातील तीन मुलांसह मैतेई समाजाचे सहा लोक अद्यापही बेपत्ता आहेत.

12 नोव्हेंबरला जारी करण्यात आलेल्या आदेशात गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, "राज्यात कायदा व सुव्यवस्था काय ठेवण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत सीएपीएफच्या 20 कंपन्या तैनात राहतील. यांत 15 केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि पाच सीमा सुरक्षा दलाच्या कंपन्यांचा समावेश असेल. सीएपीएफच्या या 20 कंपन्यांच्या तैनातीसह, सीएपीएफच्या एकूण 218 कंपन्या; सीआरपीएफच्या 115, आरएएफच्या आठ, बीएसएफच्या 84, एसएसबीच्या सहा आणि आयटीबीपीच्या पाच कंपन्या 30 नोव्हेंबरपर्यंत मणिपूरमध्ये तैनात राहतील." केंद्राने मणिपूर सरकारला संबंधित CAPF सोबत सल्लामसलत करून तपशीलवार तैनाती योजना तयार करण्यास सांगितले आहे.

मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात सोमवारी केंद्रीय राखीव पोलीस दला (CRPF) सोबत झालेल्या भीषण चकमकीत 11 संशयित अतिरेकी (उग्रवादी)  मारले गेले होते. खरेतर, काही वर्दिवर असलेल्या आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या अतिरेक्यांनी  जिरीबाम जिल्ह्यातील जाकुराधोरमधील बोरोबेकरा पोलीस ठाणे आणि जवळ्या CRPF कॅम्पवर अंदाधुंद गोळीबार केल्यानंतर, ही चकमक उडाली होती. या भीषण चकमकीनंतर सीआरपीएफने अत्याधुनिक शस्त्रांचा मोठी साठा जप्त केली होती.

मणिपूरमध्ये गेल्या वर्षीच्या मे महिन्यात जातीय हिंसाचार सुरू झाल्यापासून CAPF च्या 198 कंपन्या आधीच तैनात आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मणिपूरच्या जिरीबाममध्ये ताजा हिंसाचार भडकल्यानंतर गेल्या आठवड्यापासून तणावाची स्थिती आहे. मंगळवारी झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत मणिपूरमधील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अतिरिक्त 2000 सैनिक पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारPoliceपोलिसCentral Governmentकेंद्र सरकार