शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 21:57 IST

मणिपूरमधील जिरीबाम येथे सोमवारी हमार समुदायातील संशयित अतिरेक्यांना (उग्रवादी) सुरक्षा दलांनी ठार केले. यानंतर परिसरातील तीन मुलांसह मैतेई समाजाचे सहा लोक अद्यापही बेपत्ता आहेत.

हिंसाचाराच्या ताज्या घटना आणि कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) 20 अतिरिक्त कंपन्या मणिपूरला पाठवल्या आहेत. यात सुमारे 2,000 जवान आहेत. अधिकृत सूत्रांनी बुधवारी ही माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी रात्री या जवानांना तातडीने हवाई मार्गाने पाठवून तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. मणिपूरमधील जिरीबाम येथे सोमवारी हमार समुदायातील संशयित अतिरेक्यांना (उग्रवादी) सुरक्षा दलांनी ठार केले. यानंतर परिसरातील तीन मुलांसह मैतेई समाजाचे सहा लोक अद्यापही बेपत्ता आहेत.

12 नोव्हेंबरला जारी करण्यात आलेल्या आदेशात गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, "राज्यात कायदा व सुव्यवस्था काय ठेवण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत सीएपीएफच्या 20 कंपन्या तैनात राहतील. यांत 15 केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि पाच सीमा सुरक्षा दलाच्या कंपन्यांचा समावेश असेल. सीएपीएफच्या या 20 कंपन्यांच्या तैनातीसह, सीएपीएफच्या एकूण 218 कंपन्या; सीआरपीएफच्या 115, आरएएफच्या आठ, बीएसएफच्या 84, एसएसबीच्या सहा आणि आयटीबीपीच्या पाच कंपन्या 30 नोव्हेंबरपर्यंत मणिपूरमध्ये तैनात राहतील." केंद्राने मणिपूर सरकारला संबंधित CAPF सोबत सल्लामसलत करून तपशीलवार तैनाती योजना तयार करण्यास सांगितले आहे.

मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात सोमवारी केंद्रीय राखीव पोलीस दला (CRPF) सोबत झालेल्या भीषण चकमकीत 11 संशयित अतिरेकी (उग्रवादी)  मारले गेले होते. खरेतर, काही वर्दिवर असलेल्या आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या अतिरेक्यांनी  जिरीबाम जिल्ह्यातील जाकुराधोरमधील बोरोबेकरा पोलीस ठाणे आणि जवळ्या CRPF कॅम्पवर अंदाधुंद गोळीबार केल्यानंतर, ही चकमक उडाली होती. या भीषण चकमकीनंतर सीआरपीएफने अत्याधुनिक शस्त्रांचा मोठी साठा जप्त केली होती.

मणिपूरमध्ये गेल्या वर्षीच्या मे महिन्यात जातीय हिंसाचार सुरू झाल्यापासून CAPF च्या 198 कंपन्या आधीच तैनात आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मणिपूरच्या जिरीबाममध्ये ताजा हिंसाचार भडकल्यानंतर गेल्या आठवड्यापासून तणावाची स्थिती आहे. मंगळवारी झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत मणिपूरमधील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अतिरिक्त 2000 सैनिक पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारPoliceपोलिसCentral Governmentकेंद्र सरकार