शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
3
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
4
Ishant Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
5
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
6
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
7
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
8
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
9
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
10
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
11
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
12
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
13
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
14
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
15
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
16
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
17
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
18
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
19
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
20
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 21:57 IST

मणिपूरमधील जिरीबाम येथे सोमवारी हमार समुदायातील संशयित अतिरेक्यांना (उग्रवादी) सुरक्षा दलांनी ठार केले. यानंतर परिसरातील तीन मुलांसह मैतेई समाजाचे सहा लोक अद्यापही बेपत्ता आहेत.

हिंसाचाराच्या ताज्या घटना आणि कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) 20 अतिरिक्त कंपन्या मणिपूरला पाठवल्या आहेत. यात सुमारे 2,000 जवान आहेत. अधिकृत सूत्रांनी बुधवारी ही माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी रात्री या जवानांना तातडीने हवाई मार्गाने पाठवून तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. मणिपूरमधील जिरीबाम येथे सोमवारी हमार समुदायातील संशयित अतिरेक्यांना (उग्रवादी) सुरक्षा दलांनी ठार केले. यानंतर परिसरातील तीन मुलांसह मैतेई समाजाचे सहा लोक अद्यापही बेपत्ता आहेत.

12 नोव्हेंबरला जारी करण्यात आलेल्या आदेशात गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, "राज्यात कायदा व सुव्यवस्था काय ठेवण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत सीएपीएफच्या 20 कंपन्या तैनात राहतील. यांत 15 केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि पाच सीमा सुरक्षा दलाच्या कंपन्यांचा समावेश असेल. सीएपीएफच्या या 20 कंपन्यांच्या तैनातीसह, सीएपीएफच्या एकूण 218 कंपन्या; सीआरपीएफच्या 115, आरएएफच्या आठ, बीएसएफच्या 84, एसएसबीच्या सहा आणि आयटीबीपीच्या पाच कंपन्या 30 नोव्हेंबरपर्यंत मणिपूरमध्ये तैनात राहतील." केंद्राने मणिपूर सरकारला संबंधित CAPF सोबत सल्लामसलत करून तपशीलवार तैनाती योजना तयार करण्यास सांगितले आहे.

मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात सोमवारी केंद्रीय राखीव पोलीस दला (CRPF) सोबत झालेल्या भीषण चकमकीत 11 संशयित अतिरेकी (उग्रवादी)  मारले गेले होते. खरेतर, काही वर्दिवर असलेल्या आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या अतिरेक्यांनी  जिरीबाम जिल्ह्यातील जाकुराधोरमधील बोरोबेकरा पोलीस ठाणे आणि जवळ्या CRPF कॅम्पवर अंदाधुंद गोळीबार केल्यानंतर, ही चकमक उडाली होती. या भीषण चकमकीनंतर सीआरपीएफने अत्याधुनिक शस्त्रांचा मोठी साठा जप्त केली होती.

मणिपूरमध्ये गेल्या वर्षीच्या मे महिन्यात जातीय हिंसाचार सुरू झाल्यापासून CAPF च्या 198 कंपन्या आधीच तैनात आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मणिपूरच्या जिरीबाममध्ये ताजा हिंसाचार भडकल्यानंतर गेल्या आठवड्यापासून तणावाची स्थिती आहे. मंगळवारी झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत मणिपूरमधील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अतिरिक्त 2000 सैनिक पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारPoliceपोलिसCentral Governmentकेंद्र सरकार