शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

फोन पाळतीबाबत कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यास केंद्र सरकारचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 05:23 IST

न्यायालयाने याप्रकरणी निकालही राखून ठेवला. 

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : पेगॅसस तंत्रज्ञानाद्वारे ठेवण्यात आलेल्या पाळतीबाबत स्वतंत्र यंत्रणेद्वारे चौकशी करावी, अशी मागणी करणाऱ्या  याचिकांबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात नकार दिला. त्यामुळे न्यायालयाने केंद्राला फटकारले. फोन पाळतीसाठी पेगॅसस हे सॉफ्टवेअर सरकार वापरते का, हे सांगायलाही सरकारतर्फे नकार देण्यात आल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने याप्रकरणी निकालही राखून ठेवला. 

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, नागरिकांचे खासगीपण जपणे सरकारचे कर्तव्यच आहे. मात्र योग्य कारणांसाठी फोन टॅपिंग करणे हे बेकायदेशीर असू शकत नाही. केंद्र सरकार कोणते सॉफ्टवेअर वापरते, हे सांगितल्यास दहशतवादी गैरफायदा घेऊ शकतील. मात्र पेगॅसस प्रकरणाची तज्ज्ञ समितीकडून चौकशी होऊ  द्यावी. तो अहवाल सीलबंद पाकिटातून न्यायालयास सादर करू.

अधिकारांचे उल्लंघन झाले का?

काही विशिष्ट लोकांचे फोन टॅप केले होते का? त्यासाठी कोणत्या यंत्रणोचा वापर केला गेला? ती यंत्रणा कायदेशीर आहे की बेकायदा आहे? फोन टॅप केल्याने नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले? असे प्रश्न करून सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा म्हणाले, आम्ही राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्दय़ाबाबत काहीच विचारत नाही आहोत. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार