शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

फोन पाळतीबाबत कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यास केंद्र सरकारचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 05:23 IST

न्यायालयाने याप्रकरणी निकालही राखून ठेवला. 

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : पेगॅसस तंत्रज्ञानाद्वारे ठेवण्यात आलेल्या पाळतीबाबत स्वतंत्र यंत्रणेद्वारे चौकशी करावी, अशी मागणी करणाऱ्या  याचिकांबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात नकार दिला. त्यामुळे न्यायालयाने केंद्राला फटकारले. फोन पाळतीसाठी पेगॅसस हे सॉफ्टवेअर सरकार वापरते का, हे सांगायलाही सरकारतर्फे नकार देण्यात आल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने याप्रकरणी निकालही राखून ठेवला. 

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, नागरिकांचे खासगीपण जपणे सरकारचे कर्तव्यच आहे. मात्र योग्य कारणांसाठी फोन टॅपिंग करणे हे बेकायदेशीर असू शकत नाही. केंद्र सरकार कोणते सॉफ्टवेअर वापरते, हे सांगितल्यास दहशतवादी गैरफायदा घेऊ शकतील. मात्र पेगॅसस प्रकरणाची तज्ज्ञ समितीकडून चौकशी होऊ  द्यावी. तो अहवाल सीलबंद पाकिटातून न्यायालयास सादर करू.

अधिकारांचे उल्लंघन झाले का?

काही विशिष्ट लोकांचे फोन टॅप केले होते का? त्यासाठी कोणत्या यंत्रणोचा वापर केला गेला? ती यंत्रणा कायदेशीर आहे की बेकायदा आहे? फोन टॅप केल्याने नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले? असे प्रश्न करून सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा म्हणाले, आम्ही राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्दय़ाबाबत काहीच विचारत नाही आहोत. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार