शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये, दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 11:46 IST

दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषणाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने इंफोर्समेंट टास्क फोर्स आणि फ्लाइंग स्क्वॉडची स्थापना केली आहे.

नवी दिल्ली: राजधानी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात झालेली प्रदूषणाची स्थिती कायम आहे. त्यावर उपाय करण्यासाठी आता केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. केंद्राने इंफोर्समेंट टास्क फोर्स आणि फ्लाइंग स्क्वॉडची स्थापना केली आहे. केंद्र सरकारने पाच सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केली, ज्याला कायदेमंडळाचे अधिकारही देण्यात आले आहेत. यासोबतच 17 फ्लाइंग स्क्वॉड्सही बनवण्यात आल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल

एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशनने (CAQM) शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करुन ही माहिती दिली. प्रतिज्ञापत्रानुसार, सर्वोच्च न्यायालयाने 2 डिसेंबर रोजी प्रदूषण रोखण्यासाठी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने आयोग आणि केंद्राने पाच सदस्यीय इंफोर्समेंट टास्क फोर्सची स्थापना केली आहे.

टास्क फोर्सला शिक्षा करण्याचा अधिकार

या टास्क फोर्सला शिक्षा आणि प्रदूषणाचा प्रसार रोखण्यासाठी विधायी अधिकार देण्यात आले आहेत. एमएम कुट्टी(CAQM चे अध्यक्ष) आणि CPCB चे अध्यक्ष तन्मय कुमार हे या टास्क फोर्सचे प्रमुख सदस्य असतील. याशिवाय, TERI चे DG डॉ. विभा धवन, मध्य प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी अध्यक्ष NK शुक्ला आणि CAQM NGO सदस्य आशिष धवन हे देखील टास्क फोर्सचे सदस्य आहेत.

दिल्लीतील प्रदूषणाची स्थिती

दिल्लीतील एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) आज सकाळी 385 वर राहिला, तर नोएडामध्ये 562 आणि गुरुग्राम 413 एक्यूआय नोंदवला गेला. त्याच वेळी, गाझियाबादमध्ये पीएम 2.5 ची पातळी 222 नोंदवण्यात आली. यापूर्वी गुरुवारी (2 डिसेंबर) दिल्लीतील वायु गुणवत्ता निर्देशांक (AQI) 342 होता.

टॅग्स :delhiदिल्लीpollutionप्रदूषणCentral Governmentकेंद्र सरकार