शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

बंगालमध्ये सेंट्रल फोर्स, दिल्लीत पोलिसांच्या तैनातीत शोभायात्रा; हनुमान जन्मोत्सवानिमित्त देशभरात अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 02:05 IST

कुठे शोभायात्रेची तयारी सुरू आहे, तर कुठे मंदिरांमध्ये भाविक एकत्रित जमण्याची तयारी करत आहेत. मात्र यावेळी समाज कंटक आणि उपद्रवी लोकांकडून रामनवमी प्रमाणे हुल्लडबाजी होऊन हिंसाचार उफाळू नये म्हणून प्रशासन सतर्क आहे.

रामनवमीच्या मुहूर्तावर देशातील अनेक राज्यांमध्ये हिंसाचार उफाळून आला होता. प. बंगालपासून ते बिहार, झारखंडपर्यंत तणाव निर्माण झाला होता. आता हनुमान जन्मोत्सवानिमित्त ठिकठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे. कुठे शोभायात्रेची तयारी सुरू आहे, तर कुठे मंदिरांमध्ये भाविक एकत्रित जमण्याची तयारी करत आहेत. मात्र यावेळी समाज कंटक आणि उपद्रवी लोकांकडून रामनवमी प्रमाणे हुल्लडबाजी होऊन हिंसाचार उफाळू नये म्हणून प्रशासन सतर्क आहे.

उच्चन्यायालयाने फटकार लगावल्यानंतर बंगालमध्ये अलर्ट -रामनवमी प्रमाणे स्थिती आता निर्माण होऊ नये म्हणून, राज्यांनी आपापल्या स्तरावर तयारी सुरू केली आहे. पश्चिम बंगालमध्ये अजूनही हिंसाचार सुरू असल्याने तेथील प्रशासन हनुमान जयंतीनिमित्त अधिक सतर्क झाले आहे. कोलकाता उच्च न्यायालयालाही येथे हस्तक्षेप करावा लागला आहे. हनुमान जयंती संदर्भात काय व्यवस्था आहेत? असा प्रश्न कोलकाता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला विचारला आहे. तसेच, जर बंगाल पोलिस परिस्थिती हाताळण्यास सक्षम नसतील, तर निमलष्करी दलाची मदत घ्यावी, याच बरोबर जेथे कलम 144 लागू आहे, तेथे कोणतीही शोभायात्रा अथवा मिरवणूक काढू नये, असे निर्देशही कोलकाता उच्च न्यायालयानेही ममता सरकारला दिले आहेत.

उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हनुमान जयंतीनिमित्त बंगालमध्ये शांतता बाळगावी, असे आवाहन जनतेला केले आहे. हा उत्सव आनंदाने साजरा करा. बंगाल ही शांतता प्रीय भूमी आहे. खरे तर, रामनवमीच्या हिंसाचारानंतर, हनुमानांबद्दल सर्वांना आदर आहे, परंतु हिंसाचार कुठल्याही परिस्थितीत हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही. पुन्हा एकदा काही वाईट तत्व हिंसाचार पसरवण्याचे काम करू शकतात, असे सीएम ममता म्हणाल्या होत्या.

ममतांच्या याच वक्तव्यावरून भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच त्यांच्यावर तुष्टीकरणाचा आरोप करत आहे. ममतांच्या राजवटीत हिंदूंवर सातत्याने हल्ले होत असल्याचेही भाजप सातत्याने म्हणत आहे. यातच आता बंगालमध्ये हनुमान जन्मोत्सवाप्रसंगीही कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी केंद्रीय दलाच्या तीन तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत.

दिल्लीत पोलीस तैनात, जहांगीरपुरीतून निघणार शोभायात्रा -जहांगीरपुरी येथे गेल्यावर्षी प्रमाणे पुन्हा उपद्रव होऊ नये यासाठी, येथे सुरक्षा दलाचा मार्च निघत आहे. महत्वाचे म्हणजे,  विश्व हिंदू परिषदेने जहांगीरपुरीतून मिरवणूक काढण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी पोलिसांनी यासाठी परवानगी दिली नव्हती, मात्र आता याला हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. अर्थात आता ही मिरवणूक पोलीस बंदोबस्तात निघेल. 

केंद्र सरकारची अ‍ॅडव्हायजरी? -यातच केंद्र सरकारनेही यासंदर्भात अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. यात, राज्यांनी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी कायदा आणि सुरक्षा व्यवस्थित करावी. तसेच, समाजातील शांतता-सद्भाव बिघडविणाऱ्या कुठल्याही घटनेकडे दूर्लक्ष करू नये, असे म्हणण्यात आले आहे. यासंदर्भात, गृह मंत्रालयाने ट्विट केले आहे, "गृह मंत्रालयाकडून राज्य सरकारांना कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासंदर्भात, उत्सवाचे शांततेने पालन करणे आणि समाजात सांप्रदायिक सलोखा बिघडवणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे."

टॅग्स :Hanuman Jayantiहनुमान जयंतीPoliceपोलिसwest bengalपश्चिम बंगालdelhiदिल्ली