शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मोदी सरकारचं केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट; महागाई भत्ता 12 टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 22:35 IST

1 कोटी कर्मचारी, पेन्शन धारकांना होणार फायदा

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. हा भत्ता आधी 9 टक्के इतका होता. आता तो 12 टक्के करण्यात आला आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 1 जानेवारी 2019 पासून याचा लाभ कर्मचारी आणि निवृत्ती वेतन घेणाऱ्यांना मिळेल. या लाभार्थींची संख्या 1 कोटी इतकी असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटलींनी दिली. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याचं जेटली म्हणाले. त्यामुळे 1 जानेवारी 2019 पासून महागाई भत्ता 12 टक्के असेल. यामुळे सरकारच्या तिजोरीवर 9168.12 कोटी रुपयांचा भार पडेल. याचा लाभ 48.41 लाख कर्मचाऱ्यांना, तर 62.03 लाख निवृत्ती वेतन धारकांना मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली. लोकसभा निवडणुकीला काही दिवस राहिले असताना सरकारनं हा निर्णय घेतला आहे. संसदेचं अधिवेशन संपल्यानं काही महत्त्वाची विधेयकं मंजूर करता आली नाहीत. यातील काही विधेयकांना विरोधकांचाही पाठिंबा होता, असं जेटलींनी सांगितलं. यातील तीन विधेयकं अध्यादेशाच्या माध्यमातून लोकसभेत मांडण्यात आली होती. ती लोकसभेत मंजूरदेखील झाली. मात्र राज्यसभेत गदारोळामुळे ती मंजूर होऊ शकली नाहीत. त्यामुळे ही विधेयकं केंद्रीय मंत्रिमंडळानं यासाठीचे अध्यादेश राष्ट्रपतींकडे पाठवले आहेत. लवकरच राष्ट्रपती त्यावर स्वाक्षरी करतील, असं जेटली म्हणाले. राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आलेल्या अध्यादेशांमध्ये तिहेरी तलाकच्या अध्यादेशाचा समावेश आहे.  

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Employeeकर्मचारी