शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सर्व ब्रॉडगेज रेल्वेमार्गांचे तीन वर्षांत विद्युतीकरण करण्यास केंद्राचा हिरवा कंदील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 04:36 IST

भारतीय रेल्वेच्या देशभरातील अद्यापही विद्युतीकरण न झालेल्या १३,६७५ किमीच्या मार्गांचे विद्युतीकरण करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली.

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या देशभरातील अद्यापही विद्युतीकरण न झालेल्या १३,६७५ किमीच्या मार्गांचे विद्युतीकरण करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली.या कामास १२,१३४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून ब्रॉडगेज रेल्वेमार्गांचे शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण झाल्यावर रेल्वेच्या इंधनावरील खर्चात दरवर्षी १३,५१० कोटी रुपयांची बचत होईल, असे मंत्रिमंडळ बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकात नमूद करण्यात आले. हे विद्युतीकरणाचे काम सन २०२१-२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. सर्वाधिक वाहतूक असलेल्या सर्व महत्त्वाच्या रेल्वेमार्गांचे याआधीच विद्युतीकरण झालेले आहे. मात्र अधल्या-मधल्या व अगदी टोकाच्या काही मार्गांचे विद्युतीकरण झालेले नसल्याने त्याठिकाणी सध्या इंजिने बदलावी लागतात. पूर्ण विद्युतीकरण झाल्यावर रेल्वेची कार्यक्षमता, वेग, सुरक्षतता व वहनक्षमता वाढेल.सध्या रेल्वेच्या एकूण मालवाहतुकीपैकी सुमारे ७५ टक्के व प्रवासी वाहतुकीपैकी निम्म्याहून अधिक वाहतूक विजेवर चालणाऱ्या गाड्यांनीच होत असली तरी एकूण इंधनामध्ये विजेचा वाटा फक्त ३७ टक्के आहे. विजेचा वापर वाढल्यावर डिझेलचा वापर २.८३ अब्ज लिटरने कमी होईल व साहजिकच एकूण इंधनखर्चातही बचत होईल. या विद्युतीकरणाच्या कामाने २०.४ कोटी नवे थेट रोजगार उपलब्ध होतील, असेही सरकारचे म्हणणे आहे.

टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी