शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राला मच्छीमारांच्या सुविधांसाठी आली जाग; केंद्राकडून त्रिपक्षीय कराराचा मसुदा प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 07:18 IST

केंद्र सरकारने याबाबतच्या त्रिपक्षीय करारनाम्याचा मसुदा पाठविल्यावर त्यानुसार नाबार्डसोबत करारनामा करण्यात येणार आहे

नारायण जाधवठाणे : देशातील मच्छीमारांना सागरकिनाऱ्यावर सोयीसुविधा पुरविण्यासाठी केंद्र शासनाने २०१८ च्या अर्थसंकल्पात ७५२२ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र, तो प्राप्त करण्यासाठी त्रिपक्षीय करार करणे आवश्यक असून त्याचा मसुदा केंद्राने जानेवारी २०२० पर्यंत दिलेला नव्हता. आता प्राप्त झाल्याने महाराष्ट्राच्या ७२० किमी सागरकिना-यावरील तीन प्रमुख मासेमारी बंदरे आणि १७३ मासळी उतरवण्यासाठीच्या केंद्रांवर सोयीसुविधा देणे सोपे होणार आहे.

केंद्र सरकारने याबाबतच्या त्रिपक्षीय करारनाम्याचा मसुदा पाठविल्यावर त्यानुसार नाबार्डसोबत करारनामा करण्यात येणार आहे. यात कमीतकमी ५०० काेटींचे कर्ज घेण्यात येणार आहे. मात्र, हे कर्ज वर्षभराच्या आत उचलले नाही, तर ते व्यपगत होणार आहे. तसेच पहिला हप्ता मंजूर झाल्यावर पहिल्या दोन वर्षांत ते पूर्णपणे घ्यावे लागेल. या योजनेचा कालावधी २०२३ पर्यंत अूसन तिचा जास्तीतजास्त निधी घेण्यासाठी राज्य सरकारला धावपळ करावी लागणार आहे. या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी १२ वर्षांचा राहणार आहे.

या २० सुविधा पुरविता येणारसागरी भागामध्ये नवी बंदरे उभारणे, जेट्टी बांधणे, बर्फ कारखाना बांधणे, शीतगृह उभारणे, मासळी मार्केटचे आधुनिकीकरण करणे, मत्स्यबीज बँक तयार करण्यासाठी तत्सम २० सुविधा उभारता येणार आहेत.

कोकणाला होणार मोठा फायदामहाराष्ट्राच्या ७२० किमीच्या कोकण किनारपट्टीवरील मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांना या याेजनेतून जास्तीतजास्त निधी प्राप्त करून अनेक संकटांना ताेंड देणा-या मच्छीमारांना या ७५२२ कोटी ४८ लाख निधीपैकी जास्तीतजास्त निधी मिळवून दिलासा देता येणार आहे. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार