शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

औषध उत्पादनातील स्वयंपूर्णतेसाठी केंद्राने लागू केली पीएलआय योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 06:25 IST

लस तुटवड्यामुळे आली जाग; अर्ज करण्यासाठी मुदत ३१ जुलैपर्यंत 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : औषध उत्पादनाच्या क्षेत्रात देशाने स्वयंपूर्ण व्हावे यासाठी केंद्र सरकारने कामगिरीवर आधारित लाभ (परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेन्टिव्ह-पीएलआय) ही योजना या क्षेत्राला लागू केली आहे. जगातील औषधनिर्मितीचे महत्त्वाचे केंद्र अशी ओळख असलेल्या भारतातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या आजारावरील लसी व औषधांची मोठी टंचाई निर्माण झाली. त्यामुळे केंद्राने हे पाऊल उचलले आहे.

१५ हजार कोटी रुपयांची ही योजना असून, ती २ जूनपासून लागू झाली. तिचा लाभ घेण्याकरिता पात्र असलेले औषध उत्पादक ३१ जुलैपर्यंत केंद्र सरकारकडे अर्ज करू शकतात. जेनेरिक औषधांचे जगातील सर्वाधिक उत्पादन भारतात होते. २०१९-२० हे आधारभूत वर्ष मानून पुढील पाच वर्षांमध्ये औषधांची विक्री वाढविणाऱ्या कंपन्यांना पीएलआय योजनेद्वारे ४ ते १० टक्क्यांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल. 

या कंपन्यांनी औषधांची किती विक्री करायला हवी याचे उद्दिष्ट ठरवून दिले जाईल. या कंपन्यांचे २०१९-२० या कालावधीत जागतिक स्तरावर जे उत्पन्न असेल त्यानुसार तीन गटांत त्यांची विभागणी करण्यात येणार आहे. पीएलआय योजनेनुसार या कंपन्यांच्या अर्जांची छाननी करून मग त्यांना किती प्रोत्साहनपर रक्कम द्यायची याचा निर्णय केंद्र सरकार घेईल. लहान व मध्यम गटातील औषध कंपन्यांसाठी ही योजना खूप उपयोगी ठरणार आहे. पहिल्या, दुसऱ्या गटातील कंपन्यांना १० टक्के व तिसऱ्या गटातील कंपनीला ५ टक्के प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल.

आधारभूत वर्ष बदलण्याची मागणी२०१९-२० या कालावधीत औषध निर्मितीसाठी जो कच्चा माल लागतो त्याचा चीनकडून भारताला होणारा पुरवठा कमी झाला होता. त्यामुळे काही औषध कंपन्यांची आर्थिक घडी विस्कटली होती. त्यामुळे पीएलआय योजनेसाठी २०१९-२०च्या ऐवजी २०२०-२१ हे आधारभूत वर्ष मानण्यात यावे, अशी सूचना औषध उत्पादक कंपन्यांनी केली आहे. पीएलआय योजनेचा फायदा घेण्यासाठी देशातील औषध कंपन्या योग्य तयारी करत असल्याचे ऑल इंडिया ड्रग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष महेश दोशी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :medicineऔषधं