शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

अजित डोवालांच्या दौऱ्यानंतर काश्मीरमध्ये 10 हजार अतिरिक्त जवान, मेहबूबा मुफ्तींचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 21:24 IST

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल काश्मीर दौऱ्यावरुन परतल्यानंतर याठिकाणी 10 हजार अतिरिक्त सुरक्षा दल पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही जवान काश्मीरमध्ये दाखल झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून एक आदेश जारी करण्यात आला आहे. अतिरिक्त सुरक्षा दलाच्या जवानामुळे काश्मीरमधील दहशतवाद्यांचे नेटवर्क उद्धवस्त करण्यासाठी चालविण्यात आलेले अभियान मजबूत होईल. तसेच, राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मदत होईल, असे या आदेशात म्हटले आहे.

दुसरीकडे, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे घाटीत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विटरवर म्हटले आहे. त्या म्हणाल्या, "घाटीत अतिरिक्त 10 हजार जवान तैनात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा आहे. काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांची काही कमतरता नाही. जम्मू काश्मीरमधील समस्या राजकीय आहेत. त्या लष्कराच्या सहाय्याने सोडविल्या जाऊ शकत नाहीत. केंद्र सरकारला पुन्हा यावर विचार करायला हवा आणि आपले धोरण बदलण्याची गरज आहे."

सुत्रांच्या माहितीनुसार, देशातील विविध भागात तैनात असलेल्या केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांना एअरलिफ्टच्या माध्यमातून थेट काश्मीरला पाठविण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितले की, सुरक्षा दलाच्या 100 आणखी तुकड्या तैनात करण्यात येत आहेत. प्रत्येक तुकडीत 100 जवान असणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने 25 जुलै रोजी केंद्रीय सशस्त्र दलांच्या अतिरिक्त 100 तुकड्या तैनात करण्याचा आदेश जारी केला होता. यामध्ये केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, सशस्त्र सीमा दल आणि भारत-तिबेट सीमा पोलीस दलाचे जवानांचा समावेश आहे.

अजित डोवाल बुधवारी श्रीनगरमधील घाटीच्या दौऱ्यावर होते. याबाबतची कोणालाही माहिती देण्यात आली नव्हती. यावेळी अजित डोवाल यांनी सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. यामध्ये राज्यपालांचे सल्लागार के. विजय कुमार, मुख्य सचिव बीव्हीआर सुब्रमण्यन, डीजीपी दिलबाग सिंह यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. 

दरम्यान, सध्या जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल शासन लागू आहे. याआधी 24 फेब्रुवारीला देशभरातून निमलष्करी दलाच्या 100 तुकड्या काश्मीरला पाठवण्यात आल्या होत्या. त्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेसाठी अतिरिक्त जवान गरजेचे असल्याचे सांगण्यात आले होते. याचबरोबर, आता अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेतेसाठी निमलष्करी दलाचे जवळपास 40 हजार अतिरिक्त जवान तैनात केले आहेत. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरAjit Dovalअजित डोवालMehbooba Muftiमहेबूबा मुफ्ती