शहरं
Join us  
Trending Stories
1
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
2
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

एलओसीवरील गोळीबाराविरोधात भारत आक्रमक; पाकिस्तानी राजदूतांना समन्स

By कुणाल गवाणकर | Updated: November 15, 2020 08:02 IST

पाकिस्तानकडून दिवाळीच्या पूर्वसंध्येला नियंत्रण रेषेवर बेछूट गोळीबार

नवी दिल्ली: नियंत्रण रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तान विरोधात भारतानं आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला भारताकडून समन्स बजावण्यात आलं आहे. भारतानं पाकिस्तानच्या नापाक कारवायांचा निषेध केला आहे.‘’भारताने CEPC उद्ध्वस्त करण्यासाठी ८० अब्ज दिले, रॉ ने ७०० दहशतवादी तयार केले’’पाकिस्तानी सुरक्षा दलांकडून भारताच्या सीमावर्ती भागातील नागरिकांना नाहक लक्ष्य केलं जात आहे. त्याबद्दल भारतानं अतिशय कठोर शब्दांत आपला निषेध नोंदवला असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली. 'उत्सव काळात नियंत्रण रेषेवर सुरू असलेला बेछूट गोळीबार आणि त्या माध्यमातून शांतता भंग करण्याचा प्रयत्न अतिशय निंदनीय आहे. पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या 'चार्ज डी अफेयर्स'ना समन्स बजावण्यात आलं. सीमेवर पाकिस्तानकडून विनाकारण सुरू असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा निषेध त्यांच्या समक्ष करण्यात आला,' अशी माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली.भारताच्या प्रत्युत्तरामुळे पीओकेत आतापर्यंतचं सर्वात मोठं नुकसान; पाकिस्तानची कबुलीसीमेपलीकडून दहशतवाद्यांची घुसखोरी सुरू आहे आणि दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कर अगदी उघडपणे मदत करत असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं. पाकिस्तानी सैन्यानं शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरपासून गुरेज सेक्टरपर्यंत नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात ५ जवान शहीद झाले. याशिवाय ११ नागरिकांचा मृत्यू झाला.पाकिस्तानच्या नापाक कारवायांना भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं. यात पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं. भारतीय सैन्याच्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे ११ सैनिक मारले गेले आणि १२ जण जखमी झाले. याशिवाय पाकिस्तानी सैन्याचे बंकर आणि लॉन्च पॅडदेखील उद्ध्वस्त झाले.

टॅग्स :Ceasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान