शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
6
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
7
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
8
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
9
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
10
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
11
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
12
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
13
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
14
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
15
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
16
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
17
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
18
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
19
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
20
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 16:56 IST

CDS Anil Chauhan on Operation Sindoor:'शस्त्र आणि शास्त्र दोन्ही गरजेचे.'

CDS Anil Chauhan on Operation Sindoor: भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 'ऑपरेशन सिंदूर'द्वारेपाकिस्तानवर जोरदार कारवाई केली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाला असला तरी, 'ऑपरेशन सिंदूर' अजून थांबले नाही. देशाचे सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी आज याबाबत महत्वाचे अपडेट दिले आहे. ते म्हणाले की 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरू आहे. सैन्याला नेहमीच सतर्क राहावे लागते.

अनिल चव्हाण म्हणाले, आजचे युद्ध पारंपारिक आणि आधुनिक पद्धतींचे मिश्रण आहे. यामध्ये गतिज (शस्त्रांवर आधारित) आणि गैर-गतिज (माहितींवर आधारित) दोन्ही रणनीतींचा समावेश आहे. हे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीच्या युद्ध तंत्रांचे समन्वय आहे. युद्धासाठी शास्त्र आणि शस्त्र (ज्ञान) दोन्ही आवश्यक आहेत. ऑपरेशन सिंदूर अजूनही थांबलेले नाही. सैन्याने सर्व परिस्थितीत २४x७, ३६५ दिवस तयार असले पाहिजे. 

ऑपरेशन सिंदूर बद्दल संसदेत देण्यात आलेली माहितीगुरुवारी राज्यसभेत परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह म्हणाले की, २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दिलेला प्रत्युत्तर म्हणजून ऑपरेशन सिंदूर ७ मे रोजी सुरू करण्यात आले होते. ही कारवाई दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करणे आणि दहशतवाद्यांना मारणे यावर केंद्रित होती. ऑपरेशन सिंदूर आंतरराष्ट्रीय दबावाखाली सुरू करण्यात आले होते का? असे सरकारला विचारले असता, परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, ही भारताची उत्स्फूर्त आणि ठोस प्रतिक्रिया होती. यात आंतरराष्ट्रीय दबाव नव्हता.

भारतीय हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेले जैश-ए-मोहम्मद, हिज्बुल मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तोयबा सारख्या दहशतवादी संघटनांचे ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आणि १०० हून अधिक दहशतवादी ठार केले. जेव्हा पाकिस्तानने भारतीय लष्करी आणि नागरी लक्ष्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भारताने पाकिस्तानी हवाई तळ आणि लष्करी तळांवरही हल्ला केला. 

१० मे रोजी युद्धविरामचार दिवसांच्या संघर्षानंतर पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी भारतीय लष्करप्रमुखांना युद्धविरामाची विनंती केली. त्यानंतर १० मे रोजी दोन्ही देशांमध्ये युद्धविरामावर सहमती झाली.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तान