शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

नववी, दहावी, अकरावीच्या आधारे बारावीचे गुण देण्याचा पर्याय; कोरोनामुळे सीबीएसईचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 07:17 IST

परीक्षेबाबत उद्या सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बारावीची परीक्षा घ्यावी की न घ्यावी याबाबत मंगळवारी, १ जूनला केंद्र सरकार घोषणा करण्याची शक्यता आहे. मात्र, नववी, दहावी, अकरावी या तीन वर्षांच्या निकालाचा विचार करून संबंधित विद्यार्थ्याला बारावीचे गुण देण्यात यावेत, असा एक पर्याय सीबीएसई बोर्डाने मांडला आहे.बारावीसाठी सर्वच विषयांऐवजी काही महत्त्वाच्या विषयांची परीक्षा घ्यावी. तिचा कालावधी दीड तास असावा, असाही पर्याय सीबीएसईने मांडला होता. या पर्यायांना काही राज्यांनी नकार दिला, तर बारावी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना आधी कोरोना प्रतिबंधक लस दिली जावी व मगच त्यांची परीक्षा घेतली जावी, अशी मागणी काही राज्यांनी केली. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांची बारावीच्या परीक्षांबाबत एक बैठक नुकतीच झाली. त्यात सद्य:स्थितीचा आढावा घेण्यात आला होता.- शाळांना माहिती गोळा करण्याची सूचनाकौन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (सीआयएससीई) या संस्थेने २७ मे रोजी म्हटले आहे की, अकरावी इयत्तेत विद्यार्थ्याने विविध विषयांत सरासरी गुण किती मिळविले याची माहिती गोळा करण्यास शाळांना सांगण्यात आले आहे. तसेच बारावीमध्ये शाळेअंतर्गत झालेल्या परीक्षांमध्ये त्या विद्यार्थ्याला किती गुण मिळाले याचाही तपशील जमा केला जात आहे. त्या गुणांचा विचार करून बारावीच्या विद्यार्थ्याला अंतिम गुण देता येतील का, याची पडताळणी सुरू आहे.आज याचिकेची सुनावणी कोरोनामुळे बारावीची परीक्षा रद्द करा, अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर आज, सोमवारी ३१ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यावेळी न्यायालय काय आदेश देते याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.- राज्यातील शिक्षण मंडळाचेही लक्षबारावीच्या परीक्षा घेण्याबाबत केंद्र सरकार नेमका काय निर्र्णय घेणार याकडे महाराष्ट्रासह इतर राज्यांतील शिक्षण मंडळांचेही लक्ष लागले आहे. परीक्षा न झाल्यास बारावीच्या  विद्यार्थ्यांना गुण द्यायचे कसे हा प्रश्नही त्यांच्यासमोर आहे. परीक्षा रद्द झाल्यास राज्यातील शिक्षण मंडळेही बारावीचे गुण देताना सीबीएसईप्रमाणे नववी, दहावी आणि अकरावीच्या गुणांचा आधार घेण्याच्या पर्याय स्वीकारू शकतात. दोन टप्प्यात परीक्षेचा पर्यायकोरोना साथीमुळे बारावीची परीक्षा रद्द करावी या मागणीसाठी काही विद्यार्थी न्यायालयात गेले आहेत. १ ते २० ऑगस्ट बारावीची परीक्षा घ्यावी किंवा १५ जुलै ते २६ ऑगस्ट दरम्यान विद्यार्थ्यांची त्यांच्या शाळेतच बारावीची परीक्षा घेण्यात यावी. त्यांना ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचे प्रश्न विचारले जावेत. ही परीक्षा दोन टप्प्यात घेतली जावी, असा दुसरा पर्याय सीबीएसईने मांडला होता.