शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

नववी, दहावी, अकरावीच्या आधारे बारावीचे गुण देण्याचा पर्याय; कोरोनामुळे सीबीएसईचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 07:17 IST

परीक्षेबाबत उद्या सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बारावीची परीक्षा घ्यावी की न घ्यावी याबाबत मंगळवारी, १ जूनला केंद्र सरकार घोषणा करण्याची शक्यता आहे. मात्र, नववी, दहावी, अकरावी या तीन वर्षांच्या निकालाचा विचार करून संबंधित विद्यार्थ्याला बारावीचे गुण देण्यात यावेत, असा एक पर्याय सीबीएसई बोर्डाने मांडला आहे.बारावीसाठी सर्वच विषयांऐवजी काही महत्त्वाच्या विषयांची परीक्षा घ्यावी. तिचा कालावधी दीड तास असावा, असाही पर्याय सीबीएसईने मांडला होता. या पर्यायांना काही राज्यांनी नकार दिला, तर बारावी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना आधी कोरोना प्रतिबंधक लस दिली जावी व मगच त्यांची परीक्षा घेतली जावी, अशी मागणी काही राज्यांनी केली. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांची बारावीच्या परीक्षांबाबत एक बैठक नुकतीच झाली. त्यात सद्य:स्थितीचा आढावा घेण्यात आला होता.- शाळांना माहिती गोळा करण्याची सूचनाकौन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (सीआयएससीई) या संस्थेने २७ मे रोजी म्हटले आहे की, अकरावी इयत्तेत विद्यार्थ्याने विविध विषयांत सरासरी गुण किती मिळविले याची माहिती गोळा करण्यास शाळांना सांगण्यात आले आहे. तसेच बारावीमध्ये शाळेअंतर्गत झालेल्या परीक्षांमध्ये त्या विद्यार्थ्याला किती गुण मिळाले याचाही तपशील जमा केला जात आहे. त्या गुणांचा विचार करून बारावीच्या विद्यार्थ्याला अंतिम गुण देता येतील का, याची पडताळणी सुरू आहे.आज याचिकेची सुनावणी कोरोनामुळे बारावीची परीक्षा रद्द करा, अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर आज, सोमवारी ३१ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यावेळी न्यायालय काय आदेश देते याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.- राज्यातील शिक्षण मंडळाचेही लक्षबारावीच्या परीक्षा घेण्याबाबत केंद्र सरकार नेमका काय निर्र्णय घेणार याकडे महाराष्ट्रासह इतर राज्यांतील शिक्षण मंडळांचेही लक्ष लागले आहे. परीक्षा न झाल्यास बारावीच्या  विद्यार्थ्यांना गुण द्यायचे कसे हा प्रश्नही त्यांच्यासमोर आहे. परीक्षा रद्द झाल्यास राज्यातील शिक्षण मंडळेही बारावीचे गुण देताना सीबीएसईप्रमाणे नववी, दहावी आणि अकरावीच्या गुणांचा आधार घेण्याच्या पर्याय स्वीकारू शकतात. दोन टप्प्यात परीक्षेचा पर्यायकोरोना साथीमुळे बारावीची परीक्षा रद्द करावी या मागणीसाठी काही विद्यार्थी न्यायालयात गेले आहेत. १ ते २० ऑगस्ट बारावीची परीक्षा घ्यावी किंवा १५ जुलै ते २६ ऑगस्ट दरम्यान विद्यार्थ्यांची त्यांच्या शाळेतच बारावीची परीक्षा घेण्यात यावी. त्यांना ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचे प्रश्न विचारले जावेत. ही परीक्षा दोन टप्प्यात घेतली जावी, असा दुसरा पर्याय सीबीएसईने मांडला होता.