शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
3
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
4
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
5
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
6
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
7
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
8
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
9
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
10
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
11
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
12
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
13
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
14
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
15
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
16
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
17
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
18
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
19
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
20
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!

नववी, दहावी, अकरावीच्या आधारे बारावीचे गुण देण्याचा पर्याय; कोरोनामुळे सीबीएसईचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 07:17 IST

परीक्षेबाबत उद्या सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बारावीची परीक्षा घ्यावी की न घ्यावी याबाबत मंगळवारी, १ जूनला केंद्र सरकार घोषणा करण्याची शक्यता आहे. मात्र, नववी, दहावी, अकरावी या तीन वर्षांच्या निकालाचा विचार करून संबंधित विद्यार्थ्याला बारावीचे गुण देण्यात यावेत, असा एक पर्याय सीबीएसई बोर्डाने मांडला आहे.बारावीसाठी सर्वच विषयांऐवजी काही महत्त्वाच्या विषयांची परीक्षा घ्यावी. तिचा कालावधी दीड तास असावा, असाही पर्याय सीबीएसईने मांडला होता. या पर्यायांना काही राज्यांनी नकार दिला, तर बारावी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना आधी कोरोना प्रतिबंधक लस दिली जावी व मगच त्यांची परीक्षा घेतली जावी, अशी मागणी काही राज्यांनी केली. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांची बारावीच्या परीक्षांबाबत एक बैठक नुकतीच झाली. त्यात सद्य:स्थितीचा आढावा घेण्यात आला होता.- शाळांना माहिती गोळा करण्याची सूचनाकौन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (सीआयएससीई) या संस्थेने २७ मे रोजी म्हटले आहे की, अकरावी इयत्तेत विद्यार्थ्याने विविध विषयांत सरासरी गुण किती मिळविले याची माहिती गोळा करण्यास शाळांना सांगण्यात आले आहे. तसेच बारावीमध्ये शाळेअंतर्गत झालेल्या परीक्षांमध्ये त्या विद्यार्थ्याला किती गुण मिळाले याचाही तपशील जमा केला जात आहे. त्या गुणांचा विचार करून बारावीच्या विद्यार्थ्याला अंतिम गुण देता येतील का, याची पडताळणी सुरू आहे.आज याचिकेची सुनावणी कोरोनामुळे बारावीची परीक्षा रद्द करा, अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर आज, सोमवारी ३१ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यावेळी न्यायालय काय आदेश देते याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.- राज्यातील शिक्षण मंडळाचेही लक्षबारावीच्या परीक्षा घेण्याबाबत केंद्र सरकार नेमका काय निर्र्णय घेणार याकडे महाराष्ट्रासह इतर राज्यांतील शिक्षण मंडळांचेही लक्ष लागले आहे. परीक्षा न झाल्यास बारावीच्या  विद्यार्थ्यांना गुण द्यायचे कसे हा प्रश्नही त्यांच्यासमोर आहे. परीक्षा रद्द झाल्यास राज्यातील शिक्षण मंडळेही बारावीचे गुण देताना सीबीएसईप्रमाणे नववी, दहावी आणि अकरावीच्या गुणांचा आधार घेण्याच्या पर्याय स्वीकारू शकतात. दोन टप्प्यात परीक्षेचा पर्यायकोरोना साथीमुळे बारावीची परीक्षा रद्द करावी या मागणीसाठी काही विद्यार्थी न्यायालयात गेले आहेत. १ ते २० ऑगस्ट बारावीची परीक्षा घ्यावी किंवा १५ जुलै ते २६ ऑगस्ट दरम्यान विद्यार्थ्यांची त्यांच्या शाळेतच बारावीची परीक्षा घेण्यात यावी. त्यांना ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचे प्रश्न विचारले जावेत. ही परीक्षा दोन टप्प्यात घेतली जावी, असा दुसरा पर्याय सीबीएसईने मांडला होता.