शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

नववी, दहावी, अकरावीच्या आधारे बारावीचे गुण देण्याचा पर्याय; कोरोनामुळे सीबीएसईचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 07:17 IST

परीक्षेबाबत उद्या सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बारावीची परीक्षा घ्यावी की न घ्यावी याबाबत मंगळवारी, १ जूनला केंद्र सरकार घोषणा करण्याची शक्यता आहे. मात्र, नववी, दहावी, अकरावी या तीन वर्षांच्या निकालाचा विचार करून संबंधित विद्यार्थ्याला बारावीचे गुण देण्यात यावेत, असा एक पर्याय सीबीएसई बोर्डाने मांडला आहे.बारावीसाठी सर्वच विषयांऐवजी काही महत्त्वाच्या विषयांची परीक्षा घ्यावी. तिचा कालावधी दीड तास असावा, असाही पर्याय सीबीएसईने मांडला होता. या पर्यायांना काही राज्यांनी नकार दिला, तर बारावी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना आधी कोरोना प्रतिबंधक लस दिली जावी व मगच त्यांची परीक्षा घेतली जावी, अशी मागणी काही राज्यांनी केली. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांची बारावीच्या परीक्षांबाबत एक बैठक नुकतीच झाली. त्यात सद्य:स्थितीचा आढावा घेण्यात आला होता.- शाळांना माहिती गोळा करण्याची सूचनाकौन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (सीआयएससीई) या संस्थेने २७ मे रोजी म्हटले आहे की, अकरावी इयत्तेत विद्यार्थ्याने विविध विषयांत सरासरी गुण किती मिळविले याची माहिती गोळा करण्यास शाळांना सांगण्यात आले आहे. तसेच बारावीमध्ये शाळेअंतर्गत झालेल्या परीक्षांमध्ये त्या विद्यार्थ्याला किती गुण मिळाले याचाही तपशील जमा केला जात आहे. त्या गुणांचा विचार करून बारावीच्या विद्यार्थ्याला अंतिम गुण देता येतील का, याची पडताळणी सुरू आहे.आज याचिकेची सुनावणी कोरोनामुळे बारावीची परीक्षा रद्द करा, अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर आज, सोमवारी ३१ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यावेळी न्यायालय काय आदेश देते याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.- राज्यातील शिक्षण मंडळाचेही लक्षबारावीच्या परीक्षा घेण्याबाबत केंद्र सरकार नेमका काय निर्र्णय घेणार याकडे महाराष्ट्रासह इतर राज्यांतील शिक्षण मंडळांचेही लक्ष लागले आहे. परीक्षा न झाल्यास बारावीच्या  विद्यार्थ्यांना गुण द्यायचे कसे हा प्रश्नही त्यांच्यासमोर आहे. परीक्षा रद्द झाल्यास राज्यातील शिक्षण मंडळेही बारावीचे गुण देताना सीबीएसईप्रमाणे नववी, दहावी आणि अकरावीच्या गुणांचा आधार घेण्याच्या पर्याय स्वीकारू शकतात. दोन टप्प्यात परीक्षेचा पर्यायकोरोना साथीमुळे बारावीची परीक्षा रद्द करावी या मागणीसाठी काही विद्यार्थी न्यायालयात गेले आहेत. १ ते २० ऑगस्ट बारावीची परीक्षा घ्यावी किंवा १५ जुलै ते २६ ऑगस्ट दरम्यान विद्यार्थ्यांची त्यांच्या शाळेतच बारावीची परीक्षा घेण्यात यावी. त्यांना ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचे प्रश्न विचारले जावेत. ही परीक्षा दोन टप्प्यात घेतली जावी, असा दुसरा पर्याय सीबीएसईने मांडला होता.