शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

सीबीएसई बोर्डाचे गणित आणि अर्थशास्त्राचा पेपर फुटले; परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 3:52 PM

या दोन्ही विषयांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय सीबीएसई बोर्डाने घेतला आहे. 

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे पेपर फुटल्याची बाब समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, दहावीचा गणित विषयाचा आणि बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटला आहे. त्यामुळे या दोन्ही विषयांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय सीबीएसई बोर्डाने घेतला आहे. 

सीबीएसई बोर्डाकडे परीक्षा सुरू असताना काही पेपरांच्यावेळी गैरप्रकार झाल्याच्या काही तक्रारी आल्या होत्या. त्याची दखल घेऊन बोर्डाने गणित व अर्थशास्त्र या दोन विषयांच्या परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून या परीक्षांचे महत्त्व टिकून राहील आणि विद्यार्थ्यांना न्याय वागणूक मिळेल. दरम्यान, हा निर्णय विशिष्ट विभांगापुरता अथवा संपूर्ण देशभरासाठी घेतला आहे, याबाबत बोर्डाकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. दरम्यान, या फेरपरीक्षेच्या या निर्णयाविरोधात काही पालक आणि शिक्षकांनी दिल्ली उच्च न्यायालयात जाण्याची तयारी केल्याचे समजते. 

दरम्यान, पेपर फुटीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना दूरध्वनी करून तीव्र नाराजी व्यक्त केली असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या दोन्ही वर्षांच्या परीक्षा ५ मार्च रोजी सुरु झाल्या होत्या. १० वीच्या परीक्षेसाठी १६ लाख ३८ हजार ४२८ विद्यार्थी बसले होते. तर १२ वीच्या परीक्षेसाठी ११ लाख ८६ हजार ३०६ विद्यार्थी बसले होते. १२ वीच्या अर्थशास्त्राच्या पेपरबरोबरच दिल्लीमध्ये जीवशास्त्राचा पेपर फुटल्याची चर्चा होती. मात्र तपासणीअंती हे खोटे असल्याचे समोर आले होते. 

टॅग्स :CBSE Paper Leak 2018सीबीएसई पेपरफुटी प्रकरणeducationशैक्षणिकexamपरीक्षा