शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

सीबीएसई बोर्डाचे गणित आणि अर्थशास्त्राचा पेपर फुटले; परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 15:57 IST

या दोन्ही विषयांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय सीबीएसई बोर्डाने घेतला आहे. 

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे पेपर फुटल्याची बाब समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, दहावीचा गणित विषयाचा आणि बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटला आहे. त्यामुळे या दोन्ही विषयांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय सीबीएसई बोर्डाने घेतला आहे. 

सीबीएसई बोर्डाकडे परीक्षा सुरू असताना काही पेपरांच्यावेळी गैरप्रकार झाल्याच्या काही तक्रारी आल्या होत्या. त्याची दखल घेऊन बोर्डाने गणित व अर्थशास्त्र या दोन विषयांच्या परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून या परीक्षांचे महत्त्व टिकून राहील आणि विद्यार्थ्यांना न्याय वागणूक मिळेल. दरम्यान, हा निर्णय विशिष्ट विभांगापुरता अथवा संपूर्ण देशभरासाठी घेतला आहे, याबाबत बोर्डाकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. दरम्यान, या फेरपरीक्षेच्या या निर्णयाविरोधात काही पालक आणि शिक्षकांनी दिल्ली उच्च न्यायालयात जाण्याची तयारी केल्याचे समजते. 

दरम्यान, पेपर फुटीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना दूरध्वनी करून तीव्र नाराजी व्यक्त केली असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या दोन्ही वर्षांच्या परीक्षा ५ मार्च रोजी सुरु झाल्या होत्या. १० वीच्या परीक्षेसाठी १६ लाख ३८ हजार ४२८ विद्यार्थी बसले होते. तर १२ वीच्या परीक्षेसाठी ११ लाख ८६ हजार ३०६ विद्यार्थी बसले होते. १२ वीच्या अर्थशास्त्राच्या पेपरबरोबरच दिल्लीमध्ये जीवशास्त्राचा पेपर फुटल्याची चर्चा होती. मात्र तपासणीअंती हे खोटे असल्याचे समोर आले होते. 

टॅग्स :CBSE Paper Leak 2018सीबीएसई पेपरफुटी प्रकरणeducationशैक्षणिकexamपरीक्षा