शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

धिंड प्रकरणी सीबीआयने हाती घेतला तपास, फॉरेन्सिक टीम मणिपूरला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 06:14 IST

चौकशीसाठी लवकरच महिला अधिकाऱ्यांनाही पाठवणार... 

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये ४ मे रोजी जमावाने दोन महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सीबीआयने तपास हाती घेतला असून तेथे फॉरेन्सिकची टीम पाठवण्यात येणार आहे. तसेच महिलांवरील अत्याचाराचा तपास करण्यासाठी महिला अधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार असल्याचे सीबीआयमधील अधिकाऱ्यांनी सांगितले.  

या महिन्याच्या सुरुवातीला सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. मणिपूरमधील या प्रकरणाचे पडसाद देशभर उमटले आणि या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला होता. 

राज्य पोलिसांनी १८ मे रोजी अज्ञात सशस्त्र लोकांविरुद्ध थौबल जिल्ह्यातील नॉन्गपोक सेकमाई पोलिस ठाण्यात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला होता. मणिपूरमध्ये ३ मेपासून इम्फाळ खोऱ्यात बहुसंख्य मैतेई समुदाय आणि कुकी यांच्यात संघर्ष सुरू आहे. यात आतापर्यंत १५०हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 

शनिवारी मैतेई समुदायाने मोठी रॅली काढली. या रॅलीत पाच जिल्ह्यांतील हजारो लोकांनी भाग घेतला. ही रॅली इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील थांगमेबंद येथून सुरू झाली आणि पाच किलोमीटरचे अंतर कापून इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील हप्ता कांगजेयबुंग येथे तिचा समारोप झाला.

‘इंडिया’चे २१ खासदार पीडितांना भेटले -इंफाळ : मणिपूरमधील जातीय संघर्ष भारताची प्रतिमा डागाळत आहे आणि तो संपवण्यासाठी सर्व पक्षांना शांततापूर्ण तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा लागेल, असे मत काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. इंडिया या विरोधी आघाडीच्या २१ खासदारांचे शिष्टमंडळ हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या दोनदिवसीय दौऱ्यावर शनिवारी येथे आले. विरोधी पक्षांच्या खासदारांचे एक शिष्टमंडळ हिंसाचारातील पीडितांना भेटण्यासाठी अनेक मदत शिबिरांना भेट देणार आहे.

हे शिष्टमंडळ दिल्लीहून विमानाने मणिपूरला पोहोचले. येथे पोहोचल्यानंतर शिष्टमंडळाने चुराचांदपूर येथील मदत छावण्यांमध्ये राहणाऱ्या कुकी समाजातील पीडितांची भेट घेतली. येथे अलीकडे हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. सूत्रांनी सांगितले की, लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई आणि इतर खासदारांचे पथक चुराचांदपूर येथील डॉन बॉस्को शाळेत उभारलेल्या मदत शिबिरात गेले होते. 

राजकारणासाठी आलो नाही -आम्ही येथे जातीय हिंसाचारातील पीडितांना भेटण्यासाठी आणि समस्या समजून घेण्यासाठी आलो आहोत. हा हिंसाचार लवकरात लवकर संपावा आणि शांतता प्रस्थापित व्हावी, अशी आमची इच्छा आहे. मणिपूरमध्ये काय चालले आहे, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. आम्ही येथे कोणतेही राजकारण करण्यासाठी आलो नाही.- अधीर रंजन चौधरी, काँग्रेस नेते

हा दौरा निव्वळ दिखावा -जेव्हा मणिपूर पूर्वीच्या सरकारच्या काळात जळत होते तेव्हा त्यांनी संसदेत एक शब्दही उच्चारला नाही. जेव्हा मणिपूर अनेक महिने बंद असायचे, तेव्हा ते एक शब्दही बोलले नाहीत. मी अधीर रंजन चौधरी यांना विनंती करतो की, तेच शिष्टमंडळ पश्चिम बंगालमध्ये आणावे. जिथे महिलांवर अत्याचार होत आहेत.  - अनुराग ठाकूर, केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारCentral Governmentकेंद्र सरकारCBIगुन्हा अन्वेषण विभागWomenमहिला