शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

भ्रष्टाचार खटल्यांत ‘सीबीआय’ ठरली यशाएवढीच अपयशीही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 03:52 IST

नवी दिल्ली : भ्रष्टाचारमुक्तीचा नारा देऊन नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या चार वर्षांत केंद्राच्या अखत्यारित असलेल्या केंद्रीय गुप्तचर संस्थेला (सीबीआय) भ्रष्टाचार खटल्यांमध्ये जवळजवळ समान यश व अपयश आल्याचे दिसते.

नवी दिल्ली : भ्रष्टाचारमुक्तीचा नारा देऊन नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या चार वर्षांत केंद्राच्या अखत्यारित असलेल्या केंद्रीय गुप्तचर संस्थेला (सीबीआय) भ्रष्टाचार खटल्यांमध्ये जवळजवळ समान यश व अपयश आल्याचे दिसते. केंद्रीय कर्मचाºयांविरुद्धचे खटले फक्त ‘सीबीआय’ हाताळत असते, हे लक्षात घेण्यासारखे आहे.केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी बुधवारी लोकसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिलेल्या माहितीनुसार गेल्या चार वर्षांत ‘सीबीआय’ने दाखल केलेल्या भ्रष्टाचार खटल्यांमध्ये ३,६१७ आरोपींना न्यायालयांनी दोषी ठरवून शिक्षा दिल्या. तर ३,२०० आरोपींना सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले गेले. मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोषसिद्धीचा वार्षिक आकडेवारी अशी: वर्ष २०१४- ५०९ खटल्यांत ९९३ आरोपी दोषी. सन २०१५- ४३४ खटल्यांत ८७८ दोषी. वर्ष २०१६ मध्ये ५०३ खटल्यांत १,००५ आरोपी दोषी व यंदा नोव्हेंबर अखेरपर्यंत ७४१ आरोपी दोषी. सीबीआयने केलेल्या तपासात केंद्र सरकार हस्तक्षेप करत नाही.ज्यात आरोपी निर्दोष सुटतात अशा प्रकरणांच्या निकालांची छाननी करून अपिलाबाबत निर्णय घेण्याची सीबीआयची सुप्रस्थापित अशी अंतर्गत व्यवस्था आहे. त्यानुसार निर्णय घेतले जातात, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.>जबाबदारी निश्चितीआरोपी निर्दोष सुटण्यास तपासातील त्रुटी कारणीभूत आहेत की अभियोग चालविण्यातील यादृष्टीनेही निकालपत्रांचा अभ्यास केला जातो व अ‍ॅटर्नी जनरल वा त्यांच्या प्रतिनिधींच्या सल्ल्याने जबाबदारी निश्चित केली जाते, असेही मंत्र्यांनी सांगितले.>आरोप सिद्धकरण्यात अपयशवर्ष खटले२०१४ ७४८२०१५ ८२१२०१६ ९४४२०१७* ७५५(*नोव्हेंबर अखेरपर्यंत)

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग