शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
3
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
4
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
5
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
6
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
7
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
8
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
9
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
10
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
11
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
12
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
13
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
14
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
15
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
16
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
17
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

सीबीआय तोंडघशी : पालक निर्दोष, आरुषीची हत्या मग केली तरी कोणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:47 IST

पुरावे देण्यात सीबीआयला अपयश आल्याने आरुषी हत्या प्रकरणातून अलाहाबाद उच्च न्यायालयाने तिचे वडील डॉ. राजेश तलवार व आई नुपूर यांची पुराव्याअभावी सुटका केली.

अलाहाबाद : पुरावे देण्यात सीबीआयला अपयश आल्याने आरुषी हत्या प्रकरणातून अलाहाबाद उच्च न्यायालयाने तिचे वडील डॉ. राजेश तलवार व आई नुपूर यांची पुराव्याअभावी सुटका केली. आरुषी व घरातील नोकर यांचे मृतदेह १६ मे २00८ रोजी घरात आढळले होते. पालकांची सुटका झाल्याने आरुषी व नोकर हेमराज यांची हत्या कोणी केली, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.दोघांच्या हत्येप्रकरणी गाझियाबाद सीबीआय न्यायालयाने राजेश व नुपूर यांना २६ आॅक्टोबर २0१३ रोजी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. तेव्हापासून हे दाम्पत्य गाझियाबादच्या दासना तुरुंगात होते. उच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे त्यांची शुक्रवारी सुटका होईल, अशी अपेक्षा आहे.आरुषीचा मृतदेह १६ मे २00८ रोजी नॉयडातील घरात आढळला होता. तिची हत्या हेमराजने केल्याचा संशय घेतला गेला. पण दुसºया दिवशी घराच्या गच्चीवर हेमराजचा मृतदेह सापडल्याने तलवार दाम्पत्याकडे संशयाने पाहिले गेले. त्यांना अटकही करण्यात आली. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले होते. आता या निकालानंतर सीबीआयने आदेशाचा अभ्यास करून पुढे काय करायचे ठरवणार असल्याचे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)आरुषीची हत्या झाली, तेव्हा ती अवघी १४ वर्षांची होती. तिचे व हेमराजचे संबंध होते, या संशयातून त्या दोघांची हत्या करण्यात आली आणि ती तलवार दाम्पत्यानेच केली, असे सांगण्यात येत होते. आता तलवार दाम्पत्याची निर्दोष सुटका झाल्यामुळे या हत्या कोणी केल्या, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे. परिणामी या हत्येचे रहस्य कायमच आहे.सीबीआय तपासाचा गोंधळ-गाझियाबाद पोलिसांनी तपास नीट न केल्याची आणि त्यामुळे घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे नष्ट झाल्याची टीका झाल्यानंतर त्या वेळच्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी महिनाभरातच या खुनांचा तपास सीबीआयकडे सोपविला होता. सीबीआयनेही तपासात गोंधळ घातला.तपास करणाºया पहिल्या तुकडीने ‘लाय डिटेक्टर’ आणि ‘नाकोॅ’ चाचण्यांनंतर तलवार दाम्पत्यासह त्यांच्या कम्पाउंडरला व इतर दोघांना अटक केली. परंतु नंतर या तपासी पथकाने अटक केलेल्या कोणाहीविरुद्ध पुरावा नसल्याचा अहवाल दिला. परंतु विशेष न्यायालयाने तो फेटाळला व आणखी तपास करण्याचा आदेश दिला.दुसरे तपासी पथक नेमून पुन्हा तपास केला गेला. या पथकानेही तलवार दाम्पत्याविरुद्धचा पुरावा साशंक असल्याचे म्हटले. परंतु न्यायालयाने आहे त्या पुराव्यावर आरोपपत्र दाखल करण्यास सांगितले.घटनेवर चित्रपट : हा खटला केवळ दिल्ली आणि परिसरापुरता मर्यादित न राहता संपूर्ण देशात त्याविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. या लोकभावना लक्षात घेऊनच या घटनाक्रमावर ‘तलवार’ नावाचा चित्रपट काढला गेला. मेघना गुलजार यांनी तो दिग्दर्शित केला होता.आनंदाश्रूआणि प्रार्थनानिकाल जाहीर करताच डॉ. राजेश तलवार यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले व त्यांनी आनंदाने सोबत आलेल्या तुरुंग कर्मचाºयांना मिठी मारली. त्यांची पत्नी डॉ. नुपूर यांनी आपल्या भावना उघडपणे व्यक्त केल्या नाहीत. मात्र निकाल वाचला जाताना त्या हात जोडून प्रार्थना करत होत्या. या दोघांनी न्याय मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केल्याचे तुरुंग अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :Aarushi murderआरुषी हत्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालय