शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

सीबीआय तोंडघशी : पालक निर्दोष, आरुषीची हत्या मग केली तरी कोणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:47 IST

पुरावे देण्यात सीबीआयला अपयश आल्याने आरुषी हत्या प्रकरणातून अलाहाबाद उच्च न्यायालयाने तिचे वडील डॉ. राजेश तलवार व आई नुपूर यांची पुराव्याअभावी सुटका केली.

अलाहाबाद : पुरावे देण्यात सीबीआयला अपयश आल्याने आरुषी हत्या प्रकरणातून अलाहाबाद उच्च न्यायालयाने तिचे वडील डॉ. राजेश तलवार व आई नुपूर यांची पुराव्याअभावी सुटका केली. आरुषी व घरातील नोकर यांचे मृतदेह १६ मे २00८ रोजी घरात आढळले होते. पालकांची सुटका झाल्याने आरुषी व नोकर हेमराज यांची हत्या कोणी केली, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.दोघांच्या हत्येप्रकरणी गाझियाबाद सीबीआय न्यायालयाने राजेश व नुपूर यांना २६ आॅक्टोबर २0१३ रोजी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. तेव्हापासून हे दाम्पत्य गाझियाबादच्या दासना तुरुंगात होते. उच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे त्यांची शुक्रवारी सुटका होईल, अशी अपेक्षा आहे.आरुषीचा मृतदेह १६ मे २00८ रोजी नॉयडातील घरात आढळला होता. तिची हत्या हेमराजने केल्याचा संशय घेतला गेला. पण दुसºया दिवशी घराच्या गच्चीवर हेमराजचा मृतदेह सापडल्याने तलवार दाम्पत्याकडे संशयाने पाहिले गेले. त्यांना अटकही करण्यात आली. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले होते. आता या निकालानंतर सीबीआयने आदेशाचा अभ्यास करून पुढे काय करायचे ठरवणार असल्याचे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)आरुषीची हत्या झाली, तेव्हा ती अवघी १४ वर्षांची होती. तिचे व हेमराजचे संबंध होते, या संशयातून त्या दोघांची हत्या करण्यात आली आणि ती तलवार दाम्पत्यानेच केली, असे सांगण्यात येत होते. आता तलवार दाम्पत्याची निर्दोष सुटका झाल्यामुळे या हत्या कोणी केल्या, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे. परिणामी या हत्येचे रहस्य कायमच आहे.सीबीआय तपासाचा गोंधळ-गाझियाबाद पोलिसांनी तपास नीट न केल्याची आणि त्यामुळे घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे नष्ट झाल्याची टीका झाल्यानंतर त्या वेळच्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी महिनाभरातच या खुनांचा तपास सीबीआयकडे सोपविला होता. सीबीआयनेही तपासात गोंधळ घातला.तपास करणाºया पहिल्या तुकडीने ‘लाय डिटेक्टर’ आणि ‘नाकोॅ’ चाचण्यांनंतर तलवार दाम्पत्यासह त्यांच्या कम्पाउंडरला व इतर दोघांना अटक केली. परंतु नंतर या तपासी पथकाने अटक केलेल्या कोणाहीविरुद्ध पुरावा नसल्याचा अहवाल दिला. परंतु विशेष न्यायालयाने तो फेटाळला व आणखी तपास करण्याचा आदेश दिला.दुसरे तपासी पथक नेमून पुन्हा तपास केला गेला. या पथकानेही तलवार दाम्पत्याविरुद्धचा पुरावा साशंक असल्याचे म्हटले. परंतु न्यायालयाने आहे त्या पुराव्यावर आरोपपत्र दाखल करण्यास सांगितले.घटनेवर चित्रपट : हा खटला केवळ दिल्ली आणि परिसरापुरता मर्यादित न राहता संपूर्ण देशात त्याविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. या लोकभावना लक्षात घेऊनच या घटनाक्रमावर ‘तलवार’ नावाचा चित्रपट काढला गेला. मेघना गुलजार यांनी तो दिग्दर्शित केला होता.आनंदाश्रूआणि प्रार्थनानिकाल जाहीर करताच डॉ. राजेश तलवार यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले व त्यांनी आनंदाने सोबत आलेल्या तुरुंग कर्मचाºयांना मिठी मारली. त्यांची पत्नी डॉ. नुपूर यांनी आपल्या भावना उघडपणे व्यक्त केल्या नाहीत. मात्र निकाल वाचला जाताना त्या हात जोडून प्रार्थना करत होत्या. या दोघांनी न्याय मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केल्याचे तुरुंग अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :Aarushi murderआरुषी हत्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालय