शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआय तोंडघशी : पालक निर्दोष, आरुषीची हत्या मग केली तरी कोणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:47 IST

पुरावे देण्यात सीबीआयला अपयश आल्याने आरुषी हत्या प्रकरणातून अलाहाबाद उच्च न्यायालयाने तिचे वडील डॉ. राजेश तलवार व आई नुपूर यांची पुराव्याअभावी सुटका केली.

अलाहाबाद : पुरावे देण्यात सीबीआयला अपयश आल्याने आरुषी हत्या प्रकरणातून अलाहाबाद उच्च न्यायालयाने तिचे वडील डॉ. राजेश तलवार व आई नुपूर यांची पुराव्याअभावी सुटका केली. आरुषी व घरातील नोकर यांचे मृतदेह १६ मे २00८ रोजी घरात आढळले होते. पालकांची सुटका झाल्याने आरुषी व नोकर हेमराज यांची हत्या कोणी केली, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.दोघांच्या हत्येप्रकरणी गाझियाबाद सीबीआय न्यायालयाने राजेश व नुपूर यांना २६ आॅक्टोबर २0१३ रोजी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. तेव्हापासून हे दाम्पत्य गाझियाबादच्या दासना तुरुंगात होते. उच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे त्यांची शुक्रवारी सुटका होईल, अशी अपेक्षा आहे.आरुषीचा मृतदेह १६ मे २00८ रोजी नॉयडातील घरात आढळला होता. तिची हत्या हेमराजने केल्याचा संशय घेतला गेला. पण दुसºया दिवशी घराच्या गच्चीवर हेमराजचा मृतदेह सापडल्याने तलवार दाम्पत्याकडे संशयाने पाहिले गेले. त्यांना अटकही करण्यात आली. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले होते. आता या निकालानंतर सीबीआयने आदेशाचा अभ्यास करून पुढे काय करायचे ठरवणार असल्याचे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)आरुषीची हत्या झाली, तेव्हा ती अवघी १४ वर्षांची होती. तिचे व हेमराजचे संबंध होते, या संशयातून त्या दोघांची हत्या करण्यात आली आणि ती तलवार दाम्पत्यानेच केली, असे सांगण्यात येत होते. आता तलवार दाम्पत्याची निर्दोष सुटका झाल्यामुळे या हत्या कोणी केल्या, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे. परिणामी या हत्येचे रहस्य कायमच आहे.सीबीआय तपासाचा गोंधळ-गाझियाबाद पोलिसांनी तपास नीट न केल्याची आणि त्यामुळे घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे नष्ट झाल्याची टीका झाल्यानंतर त्या वेळच्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी महिनाभरातच या खुनांचा तपास सीबीआयकडे सोपविला होता. सीबीआयनेही तपासात गोंधळ घातला.तपास करणाºया पहिल्या तुकडीने ‘लाय डिटेक्टर’ आणि ‘नाकोॅ’ चाचण्यांनंतर तलवार दाम्पत्यासह त्यांच्या कम्पाउंडरला व इतर दोघांना अटक केली. परंतु नंतर या तपासी पथकाने अटक केलेल्या कोणाहीविरुद्ध पुरावा नसल्याचा अहवाल दिला. परंतु विशेष न्यायालयाने तो फेटाळला व आणखी तपास करण्याचा आदेश दिला.दुसरे तपासी पथक नेमून पुन्हा तपास केला गेला. या पथकानेही तलवार दाम्पत्याविरुद्धचा पुरावा साशंक असल्याचे म्हटले. परंतु न्यायालयाने आहे त्या पुराव्यावर आरोपपत्र दाखल करण्यास सांगितले.घटनेवर चित्रपट : हा खटला केवळ दिल्ली आणि परिसरापुरता मर्यादित न राहता संपूर्ण देशात त्याविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. या लोकभावना लक्षात घेऊनच या घटनाक्रमावर ‘तलवार’ नावाचा चित्रपट काढला गेला. मेघना गुलजार यांनी तो दिग्दर्शित केला होता.आनंदाश्रूआणि प्रार्थनानिकाल जाहीर करताच डॉ. राजेश तलवार यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले व त्यांनी आनंदाने सोबत आलेल्या तुरुंग कर्मचाºयांना मिठी मारली. त्यांची पत्नी डॉ. नुपूर यांनी आपल्या भावना उघडपणे व्यक्त केल्या नाहीत. मात्र निकाल वाचला जाताना त्या हात जोडून प्रार्थना करत होत्या. या दोघांनी न्याय मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केल्याचे तुरुंग अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :Aarushi murderआरुषी हत्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालय