शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

 कावेरी पाणीप्रश्नी चार आठवड्यात सुनावणार निकाल - सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 20:47 IST

दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या कावेरी नदीच्या पाणी वाटपाच्या प्रश्नाबाबत येत्या चार आठवड्यात निकाल सुनावणार असल्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. दक्षिण भारतामधून वाहत बंगालच्या उपसागराला मिळाणाऱ्या कावेरी नदीच्या पाण्यावरून कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. 

नवी दिल्ली -   दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या कावेरी नदीच्या पाणी वाटपाच्या प्रश्नाबाबत येत्या चार आठवड्यात निकाल सुनावणार असल्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. दक्षिण भारतामधून वाहत बंगालच्या उपसागराला मिळाणाऱ्या कावेरी नदीच्या पाण्यावरून कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. कावेरी नदीच्या पाणीपुरवठ्यावरून गेल्या दोन दशकांमध्ये खूप संभ्रम निर्माण करण्यात आला. कावेरी पाणीप्रश्नाबाबत चार आठवड्यांत निकाल सुनावल्यानंतरच कोणताही मंच कावेरी बेसिन संदर्भातील प्रश्न पुढे आणू शकेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. दोन दशकांपासून कर्नाटक आणि तामिळानाडूमधील वादाचे केंद्र बनलेल्या कावेरी नदीच्या पाणीवाटपाबाबत २००७ साली कावेरी पाणी लवादाने निर्णय दिला होता. मात्र हा निर्णय कुणालाही मान्य न झाल्याने कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या तिन्ही राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, या खटल्याबाबत दीर्घकाळ चाललेल्या सुनावणीनंतर २० सप्टेंबर २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. कावेरी पाणी वाटपाच्या वादावर सुनावणी करताना सरन्यायाधीश दीपक मिश्रा,  न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर  आणि न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने, कावेरी पाणी वापपाच्या विवादाबाबत गेल्या दोन दशकांपासून खूप संभ्रमाची स्थिती राहिली आहे आता या प्रश्नाला कोणताही मंच निकाल आल्यानंतरच हात घालू शकतो. आम्ही येत्या चार आठवड्यात निकाल देऊ, असे सांगितले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयKarnatakकर्नाटकTamilnaduतामिळनाडू