शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
5
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
6
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
7
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
8
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
9
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
10
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
11
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
12
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
13
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
14
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
15
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
16
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
17
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
18
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
19
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
20
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...

भारतात सातत्याने येणाऱ्या वादळ, पूर आणि ढगफुटीसारख्या घटनांचे कारण आले समोर, जाणकार सांगतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 17:26 IST

Climate Change: आधी वाटायचं की, हवामान बदलाचा परिणाम आपल्याला 50 ते 90 वर्षानंतर दिसेल. पण, आता हा 10-30 वर्षातच दिसण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली: मागच्या काही काळात भारतीय उपखंडातील संपूर्ण परिसर म्हणजेच भारत, बांगलादेश ते नेपाळ, दक्षिण चीन आणि अफगाणिस्तानपर्यंतचे क्षेत्र सातत्याने वादळ, पूर आणि ढगफुटींसारख्या आपत्तींना तोंड देत आहे. येत्या काळात अशा घटनांमध्ये तीव्रतेने वाढ होणार असल्याची माहिती ग्लेशियोलॉजिस्ट पॉल मायेव्स्की यांनी दिली आहे.

पॉल यांनी सांगितल्यानुसार, आर्कटिक, अंटार्कटिक आणि एव्हरेस्टचा बर्फ वितळत असल्यामुळे अशा घटना वाढल्या आहेत. पॉल जगातील एकमेव ग्लेशियोलॉजिस्ट आहेत, ज्यांनी तिन्ही क्षेत्रांच्या वातावरण बदलाचा अभ्यास केला आहे. ते जगातील सर्वात जुन्या क्लायमेट चेंज इंस्टीट्यूट, यूनिव्हर्सिटी ऑफ मेनच संचालकदेखील आहेत. दैनिक भास्करला त्यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बरीच माहिती दिली आहे.

भारतीय उपखंडात पूर-दुष्काळ वाढण्याचे कारण ?भारतात दक्षिण आणि पश्चिम भागात आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहेत. परंतु काही वर्षांपासून आर्क्टिक ध्रुवावरुनही भारतामध्ये ओलावा पोहोचत आहे. याचे कारण म्हणजे आर्क्टिक, अंटार्क्टिक आणि हिमालयातील हिमनद्या हवामान बदलामुळे सर्वाधिक प्रभावित होत आहेत. जगातील तापमान वाढ 1.5 अंश असताना, या क्षेत्रांमधील तापमानवाढ 4 अंशांपर्यंत गेली आहे. दरम्यान, बर्फ वेगाने वितळत असल्यामुळे त्याच्या ओलाव्यासह वारे हिमालयाच्या उत्तर आणि दक्षिण दिशेने वेगाने वाहत आहेत.

जेव्हा हे थंड वारे सखल भागातील उबदार वाऱ्यांसोबत मिसळतात, तेव्हा वादळ तयार होते. त्यामुळेच भारतात मागील अनेक दिवसांपासून वादळी पाऊस आणि पूर येण्याच्या घटना वाढल्या आहेत. हा बर्फ वितळण्यासह, जंगल कमी झाल्यमुळे पाऊस जमीनीत मुरण्याऐवजी मातीला घेऊन नद्यांसोबत मिसळत आहे. त्यामुळेच एखाद्या ठिकाणी थोडा पाऊस झाला तरी पूर परिस्थिती तयार होत आहे आणि पाऊस थांबताच नद्यांमधील प्रवाह पूर्णपणे थांबून नदी कोरडी पडतीये.

परिस्थिती किती वेगाने बदलतीये ?90 च्या दशकात आपल्याला वाटायचं की, हवामान बदलाचा परिणाम आपल्याला 50 ते 90 वर्षानंतर दिसेल. पण, आता हा 10-30 वर्षातच दिसण्याची शक्यता आहे. तुम्हीही वृत्तपत्रात वाचत असाल किंवा टीव्हीवर पाहत असाल, मागच्या काही दिवसात ढगफुटीच्या घटना चांगल्याच वाढल्या आहेत. ढगफुटी होणे म्हणजे वातावरणातील आद्रता वाढून प्रचंड पाऊस पडणे. जगातील तापमान वाढीमुळे अनेक ठिकाणी या घटना घडत आहेत. यामळे मोठ्या आर्थिक नुकसानीसह जीवितहानी देखील होत आहे.

दैनंदिन जीवनावर काय परिणाम होणार ?

बर्फाळ प्रदेशातील बर्फ एखाद्या स्पंजप्रमाणे प्रदूषण शोषून घेत असतो. पण, बर्फ वितळत असल्यामुळे प्रदुषण वाढत आहे. याशिवाय, बर्फ वितळल्यामुळे यातील जमा असलेले दुषित प्रदुषण नद्यांमध्ये जमा होऊन नद्यांनाही दुषित करतोय. याचा आपल्यावरही परिणाम होतोय. तसचे, आजकाल बर्फाचा रंगही राखाडी होऊ लागला आहे. त्यामुळे वातावरणातील उष्णता नष्ट करण्याऐवजी आता बर्फातच बरीच उष्णता साचून राहतीये. 

हवामान बदलाचे सर्वात वाईट स्वरूप कोणते असेल?

जगातील लाखो टन मिथेन वायू बर्फाखाली जमा आहे. जर पर्माफ्रॉस्ट नावाचा बर्फाचा थर वितळवून मिथेन वातावरणात आला तर ते वातावरणाची उष्णता 30 ते 50 पट वाढवू शकतो. वाढत्या उष्णतेमुळे जगातील बर्फाचे आवरण वितळून समुद्राची पातळी 70 मीटरपर्यंत वाढू शकते. यामुळे समुद्राजवळ राहणाऱ्यांना पाण्याचा आणि जे समुद्राच्या जवळ राहत नाहीत त्यांना तीव्र दुष्काळ, जंगलातील आग आणि धुळीच्या वादळांना सामोरे जावे लागेल.

टॅग्स :floodपूरRainपाऊसIndiaभारत