शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

भारतात सातत्याने येणाऱ्या वादळ, पूर आणि ढगफुटीसारख्या घटनांचे कारण आले समोर, जाणकार सांगतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 17:26 IST

Climate Change: आधी वाटायचं की, हवामान बदलाचा परिणाम आपल्याला 50 ते 90 वर्षानंतर दिसेल. पण, आता हा 10-30 वर्षातच दिसण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली: मागच्या काही काळात भारतीय उपखंडातील संपूर्ण परिसर म्हणजेच भारत, बांगलादेश ते नेपाळ, दक्षिण चीन आणि अफगाणिस्तानपर्यंतचे क्षेत्र सातत्याने वादळ, पूर आणि ढगफुटींसारख्या आपत्तींना तोंड देत आहे. येत्या काळात अशा घटनांमध्ये तीव्रतेने वाढ होणार असल्याची माहिती ग्लेशियोलॉजिस्ट पॉल मायेव्स्की यांनी दिली आहे.

पॉल यांनी सांगितल्यानुसार, आर्कटिक, अंटार्कटिक आणि एव्हरेस्टचा बर्फ वितळत असल्यामुळे अशा घटना वाढल्या आहेत. पॉल जगातील एकमेव ग्लेशियोलॉजिस्ट आहेत, ज्यांनी तिन्ही क्षेत्रांच्या वातावरण बदलाचा अभ्यास केला आहे. ते जगातील सर्वात जुन्या क्लायमेट चेंज इंस्टीट्यूट, यूनिव्हर्सिटी ऑफ मेनच संचालकदेखील आहेत. दैनिक भास्करला त्यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बरीच माहिती दिली आहे.

भारतीय उपखंडात पूर-दुष्काळ वाढण्याचे कारण ?भारतात दक्षिण आणि पश्चिम भागात आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहेत. परंतु काही वर्षांपासून आर्क्टिक ध्रुवावरुनही भारतामध्ये ओलावा पोहोचत आहे. याचे कारण म्हणजे आर्क्टिक, अंटार्क्टिक आणि हिमालयातील हिमनद्या हवामान बदलामुळे सर्वाधिक प्रभावित होत आहेत. जगातील तापमान वाढ 1.5 अंश असताना, या क्षेत्रांमधील तापमानवाढ 4 अंशांपर्यंत गेली आहे. दरम्यान, बर्फ वेगाने वितळत असल्यामुळे त्याच्या ओलाव्यासह वारे हिमालयाच्या उत्तर आणि दक्षिण दिशेने वेगाने वाहत आहेत.

जेव्हा हे थंड वारे सखल भागातील उबदार वाऱ्यांसोबत मिसळतात, तेव्हा वादळ तयार होते. त्यामुळेच भारतात मागील अनेक दिवसांपासून वादळी पाऊस आणि पूर येण्याच्या घटना वाढल्या आहेत. हा बर्फ वितळण्यासह, जंगल कमी झाल्यमुळे पाऊस जमीनीत मुरण्याऐवजी मातीला घेऊन नद्यांसोबत मिसळत आहे. त्यामुळेच एखाद्या ठिकाणी थोडा पाऊस झाला तरी पूर परिस्थिती तयार होत आहे आणि पाऊस थांबताच नद्यांमधील प्रवाह पूर्णपणे थांबून नदी कोरडी पडतीये.

परिस्थिती किती वेगाने बदलतीये ?90 च्या दशकात आपल्याला वाटायचं की, हवामान बदलाचा परिणाम आपल्याला 50 ते 90 वर्षानंतर दिसेल. पण, आता हा 10-30 वर्षातच दिसण्याची शक्यता आहे. तुम्हीही वृत्तपत्रात वाचत असाल किंवा टीव्हीवर पाहत असाल, मागच्या काही दिवसात ढगफुटीच्या घटना चांगल्याच वाढल्या आहेत. ढगफुटी होणे म्हणजे वातावरणातील आद्रता वाढून प्रचंड पाऊस पडणे. जगातील तापमान वाढीमुळे अनेक ठिकाणी या घटना घडत आहेत. यामळे मोठ्या आर्थिक नुकसानीसह जीवितहानी देखील होत आहे.

दैनंदिन जीवनावर काय परिणाम होणार ?

बर्फाळ प्रदेशातील बर्फ एखाद्या स्पंजप्रमाणे प्रदूषण शोषून घेत असतो. पण, बर्फ वितळत असल्यामुळे प्रदुषण वाढत आहे. याशिवाय, बर्फ वितळल्यामुळे यातील जमा असलेले दुषित प्रदुषण नद्यांमध्ये जमा होऊन नद्यांनाही दुषित करतोय. याचा आपल्यावरही परिणाम होतोय. तसचे, आजकाल बर्फाचा रंगही राखाडी होऊ लागला आहे. त्यामुळे वातावरणातील उष्णता नष्ट करण्याऐवजी आता बर्फातच बरीच उष्णता साचून राहतीये. 

हवामान बदलाचे सर्वात वाईट स्वरूप कोणते असेल?

जगातील लाखो टन मिथेन वायू बर्फाखाली जमा आहे. जर पर्माफ्रॉस्ट नावाचा बर्फाचा थर वितळवून मिथेन वातावरणात आला तर ते वातावरणाची उष्णता 30 ते 50 पट वाढवू शकतो. वाढत्या उष्णतेमुळे जगातील बर्फाचे आवरण वितळून समुद्राची पातळी 70 मीटरपर्यंत वाढू शकते. यामुळे समुद्राजवळ राहणाऱ्यांना पाण्याचा आणि जे समुद्राच्या जवळ राहत नाहीत त्यांना तीव्र दुष्काळ, जंगलातील आग आणि धुळीच्या वादळांना सामोरे जावे लागेल.

टॅग्स :floodपूरRainपाऊसIndiaभारत