शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

जातनिहाय जनगणना केंद्र सरकारकडून अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 07:18 IST

शरद पवार यांची भाजपवर टीका, ओबीसी आरक्षण मार्गी लावूनच निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जो न्यायाचा अधिकार आहे, तो मिळायला हवा. यासाठी जातनिहाय जनगणना केल्याशिवाय गत्यंतर नाही. भाजपसोबत असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडला. पण केंद्रातील हे सरकार असेपर्यंत हे होईल, असे मला वाटत नाही. कारण ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, त्यांची मानसिकताच वेगळी आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर तोफ डागली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलची बुधवारी बैठक झाली. त्यावेळी पवार म्हणाले की, आज भाजपचे लोक काहीही बोलत असले तरी त्यांच्या मनातली मळमळ स्पष्ट दिसत आहे. जोपर्यंत एखादा समाज सन्मानाने उभा राहात नाही, तोपर्यंत सवलती देण्याची गरज आहे. ओबीसींची नेमकी लोकसंख्या किती? असा प्रश्न काही लोक उपस्थित करतात. त्यामुळे एकदाची जातनिहाय जनगणना करूनच टाका, म्हणजे या देशाला नेमकी संख्या कळेल. मग त्या संख्येप्रमाणे न्यायाची वाटणी करा. इथे कुणी फुकट काही मागत नाही.

आरक्षणाचा विषय मार्गी लावूनच निवडणूकआगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लावूनच निवडणुकांना सामोरे जाईल, अशी भूमिका राष्ट्रवादीने राज्य सरकारमध्ये घेतली आहे. ओबीसींना त्यांचे प्रतिनिधित्व देऊनच सत्तेचा कारभार चालवेल. तसेच हे फक्त महाराष्ट्रापुरते करून चालणार नाही, तर संपूर्ण देशात ओबीसींना न्याय देण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल, असेही पवार म्हणाले.

फडणवीस, तुम्ही झोपला होता का?भाजपकडून ओबीसींना न्याय मिळण्याची शक्यता नाही. देवेंद्र फडणवीस म्हणतात की, महाविकास आघाडीने धोका दिला. पण पाच वर्षे केंद्र  व राज्यात सत्ता असताना तुम्ही झोपला होता का? आमच्यावर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार नाही.     - शरद पवार

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारOBC Reservationओबीसी आरक्षणBJPभाजपा