शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

जातनिहाय जनगणना केंद्र सरकारकडून अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 07:18 IST

शरद पवार यांची भाजपवर टीका, ओबीसी आरक्षण मार्गी लावूनच निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जो न्यायाचा अधिकार आहे, तो मिळायला हवा. यासाठी जातनिहाय जनगणना केल्याशिवाय गत्यंतर नाही. भाजपसोबत असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडला. पण केंद्रातील हे सरकार असेपर्यंत हे होईल, असे मला वाटत नाही. कारण ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, त्यांची मानसिकताच वेगळी आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर तोफ डागली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलची बुधवारी बैठक झाली. त्यावेळी पवार म्हणाले की, आज भाजपचे लोक काहीही बोलत असले तरी त्यांच्या मनातली मळमळ स्पष्ट दिसत आहे. जोपर्यंत एखादा समाज सन्मानाने उभा राहात नाही, तोपर्यंत सवलती देण्याची गरज आहे. ओबीसींची नेमकी लोकसंख्या किती? असा प्रश्न काही लोक उपस्थित करतात. त्यामुळे एकदाची जातनिहाय जनगणना करूनच टाका, म्हणजे या देशाला नेमकी संख्या कळेल. मग त्या संख्येप्रमाणे न्यायाची वाटणी करा. इथे कुणी फुकट काही मागत नाही.

आरक्षणाचा विषय मार्गी लावूनच निवडणूकआगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लावूनच निवडणुकांना सामोरे जाईल, अशी भूमिका राष्ट्रवादीने राज्य सरकारमध्ये घेतली आहे. ओबीसींना त्यांचे प्रतिनिधित्व देऊनच सत्तेचा कारभार चालवेल. तसेच हे फक्त महाराष्ट्रापुरते करून चालणार नाही, तर संपूर्ण देशात ओबीसींना न्याय देण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल, असेही पवार म्हणाले.

फडणवीस, तुम्ही झोपला होता का?भाजपकडून ओबीसींना न्याय मिळण्याची शक्यता नाही. देवेंद्र फडणवीस म्हणतात की, महाविकास आघाडीने धोका दिला. पण पाच वर्षे केंद्र  व राज्यात सत्ता असताना तुम्ही झोपला होता का? आमच्यावर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार नाही.     - शरद पवार

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारOBC Reservationओबीसी आरक्षणBJPभाजपा