शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

जातनिहाय जनगणना केंद्र सरकारकडून अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 07:18 IST

शरद पवार यांची भाजपवर टीका, ओबीसी आरक्षण मार्गी लावूनच निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जो न्यायाचा अधिकार आहे, तो मिळायला हवा. यासाठी जातनिहाय जनगणना केल्याशिवाय गत्यंतर नाही. भाजपसोबत असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडला. पण केंद्रातील हे सरकार असेपर्यंत हे होईल, असे मला वाटत नाही. कारण ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, त्यांची मानसिकताच वेगळी आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर तोफ डागली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलची बुधवारी बैठक झाली. त्यावेळी पवार म्हणाले की, आज भाजपचे लोक काहीही बोलत असले तरी त्यांच्या मनातली मळमळ स्पष्ट दिसत आहे. जोपर्यंत एखादा समाज सन्मानाने उभा राहात नाही, तोपर्यंत सवलती देण्याची गरज आहे. ओबीसींची नेमकी लोकसंख्या किती? असा प्रश्न काही लोक उपस्थित करतात. त्यामुळे एकदाची जातनिहाय जनगणना करूनच टाका, म्हणजे या देशाला नेमकी संख्या कळेल. मग त्या संख्येप्रमाणे न्यायाची वाटणी करा. इथे कुणी फुकट काही मागत नाही.

आरक्षणाचा विषय मार्गी लावूनच निवडणूकआगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लावूनच निवडणुकांना सामोरे जाईल, अशी भूमिका राष्ट्रवादीने राज्य सरकारमध्ये घेतली आहे. ओबीसींना त्यांचे प्रतिनिधित्व देऊनच सत्तेचा कारभार चालवेल. तसेच हे फक्त महाराष्ट्रापुरते करून चालणार नाही, तर संपूर्ण देशात ओबीसींना न्याय देण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल, असेही पवार म्हणाले.

फडणवीस, तुम्ही झोपला होता का?भाजपकडून ओबीसींना न्याय मिळण्याची शक्यता नाही. देवेंद्र फडणवीस म्हणतात की, महाविकास आघाडीने धोका दिला. पण पाच वर्षे केंद्र  व राज्यात सत्ता असताना तुम्ही झोपला होता का? आमच्यावर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार नाही.     - शरद पवार

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारOBC Reservationओबीसी आरक्षणBJPभाजपा