शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 21:23 IST

Caste Census: केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आता जात सांगावी लागणार आहे. मात्र यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आता जात सांगावी लागणार आहे. मात्र यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. त्यात जर एखाद्या व्यक्तीने जनगणना करणाऱ्याला आपली जात सांगितली नाही तर काय होईल, असंही विचारलं जात आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यापूर्वी आपण जनगणना कशी होते आणि त्याबाबत कायद्यात काय तरतुदी आहेत, याबाबत आपण जाणून घेऊयात.

यावेळची जातनिहाय जनगणना ही पूर्णपणे डिजिटल होणार आहे. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआयचाही वापर केला जाणार आहे. तसेच जियोफेसिंगच्या माघ्यमातून जनगणना होईल. यामध्ये ओबीसींसाठी वेगळा रकाना असेल. आतापर्यंत एससी आणि एसटींसाठी असा रकाना मोकळा ठेवला जात असे. कारण आता ओबीसींच्या  उपजातींसाठीही रकाना ठेवण्याबाबत विचार सुरू आहे. यामध्ये सुमारे ३० प्रश्न असतील. आता जे प्रश्न जनगणनेदरम्यान विचारले जातील. याच माध्यमातून सामाजिक आणि आर्थिक स्थिती निश्चित केली जाईल.

आता जातीबाबत बोलायचं झाल्यास आतापर्यंतच्या जनगणना कायद्यानुसार जात सांगणं आवश्यक नव्हतं. केवळ एससी आणि एसटींना जातीबाबत विचारलं जात असे. मात्र आता जातनिहाय जनगणना होणार असल्याने प्रत्येकाला त्याची जात विचारलं जाईल. आतापर्यंत जात सांगणं अनिवार्य असेल की ऐच्छिक याबाबतचा कुठलाही कायदा बनलेला नाही. त्यामुळे सरकार जेव्हा जातनिहाय जनगणनेसाठी अधिसूचना काढेल तेव्हा त्याबाबतचं स्पष्टीकरण येईल.  

टॅग्स :IndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार