शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना ५० हजार रुपयांचे कॅश व्हाउचर, जगन्नाथ मंदिरासाठी ५०० कोटी; ओडिशाच्या माझी सरकारच्या पहिल्या कॅबिनेटमधील निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 08:38 IST

मंदिराशी संबंधित हे दोन्ही प्रस्ताव मंजूर तर झालेच पण मुख्यमंत्री मोहन चरण माझी हे बुधवारी रात्रीच आपल्या मंत्रिमंडळासह पुरी येथे पोहोचले.

भुवनेश्वर : आदिवासी नेते, भाजपच्या तिकिटावर चार वेळा आमदारपदी निवडून आलेले मोहन चरण माझी यांना बुधवारी ओडिशाच्या मुख्यमंत्रिपदाची राज्यपाल रघुबर दास यांनी शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांसह १५ मंत्र्यांनी शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर ओडिशाचे भाजप सरकार ॲक्शन मोडमध्ये दिसत आहे. बुधवारी शपथ घेतल्यानंतर काही तासांतच पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे गुरुवारी सकाळी पुन्हा उघडले जातील आणि ५०० कोटी रुपयांचा निधी उभारला जाईल, असा निर्णय पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 

मंदिराशी संबंधित हे दोन्ही प्रस्ताव मंजूर तर झालेच पण मुख्यमंत्री मोहन चरण माझी हे बुधवारी रात्रीच आपल्या मंत्रिमंडळासह पुरी येथे पोहोचले. त्यानंतर गुरुवारी सकाळी त्यांच्या उपस्थितीत मंदिराचे चारही दरवाजे उघडण्यात आले. दरम्यान, भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे उघडण्याचे आश्वासन दिले होते. कोरोनाच्या काळात हे दरवाजे बंद असल्याने भाविकांची अडचण होत होती. आता चारही दरवाज्यातून भाविकांना प्रवेश मिळणार असून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास कोणतीही अडचण येणार नाही.

मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी संध्याकाळी राज्य सचिवालय लोकसेवा भवन येथे त्यांच्या मंत्र्यांसोबत बैठक झाली. त्यानंतर मंत्रिमंडळाशी संबंधित निर्णयांची माहिती दिली. तसेच, माझी सरकारने शेतकरी आणि महिलांशी संबंधित निर्णयही घेतले. यावेळी मुख्यमंत्री मोहन चरण माझी म्हणाले, राज्य सरकारने पुरी जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे सकाळी सर्व मंत्र्यांच्या उपस्थितीत पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. चारही दरवाजातून भाविकांना मंदिरात प्रवेश मिळेल. 

नवीन सरकारने शेतकरी आणि महिलांसाठी कोणते निर्णय घेतले?याचबरोबर, धानाची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) प्रति क्विंटल ३१०० रुपये करण्यासाठी राज्य सरकार पावले उचलणार असून संबंधित विभागाला यासंदर्भात काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लवकरच समिती स्थापन करण्यात येणार आहे. याशिवाय एमएसपीसह शेतकऱ्यांच्या इतर समस्यांना तोंड देण्यासाठी 'समृद्ध कृषक नीती योजना' करण्यात येणार आहे. यासंदर्भात विभागांना योग्य मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या असून रोडमॅप तयार करून तो शासनासमोर मांडण्यास सांगण्यात आले आहे. सरकारच्या पहिल्या १०० दिवसांत हे काम केले जाईल, असे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी सांगितले.

मंत्रिमंडळ बैठकीत माझी सरकारने महिलांशी संबंधित निर्णय घेतले. यावेळी मुख्यमंत्री मोहन चरण माझी म्हणाले की, महिला सक्षमीकरण आणि बालकल्याणासाठी मागील बीजेडी सरकारचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. त्यामुळे नवीन सरकार १०० दिवसांच्या आत सुभद्रा योजना लागू करेल, ज्याअंतर्गत प्रत्येक महिलेला ५० हजार रुपयांचे कॅश व्हाउचर दिले जाईल. सुभद्रा योजनेच्या अंमलबजावणीसाठी विभागांना मार्गदर्शक तत्त्वे आणि रोडमॅप तयार करण्यास सांगितले आहे.

टॅग्स :OdishaओदिशाBJPभाजपा