शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

महिलांना ५० हजार रुपयांचे कॅश व्हाउचर, जगन्नाथ मंदिरासाठी ५०० कोटी; ओडिशाच्या माझी सरकारच्या पहिल्या कॅबिनेटमधील निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 08:38 IST

मंदिराशी संबंधित हे दोन्ही प्रस्ताव मंजूर तर झालेच पण मुख्यमंत्री मोहन चरण माझी हे बुधवारी रात्रीच आपल्या मंत्रिमंडळासह पुरी येथे पोहोचले.

भुवनेश्वर : आदिवासी नेते, भाजपच्या तिकिटावर चार वेळा आमदारपदी निवडून आलेले मोहन चरण माझी यांना बुधवारी ओडिशाच्या मुख्यमंत्रिपदाची राज्यपाल रघुबर दास यांनी शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांसह १५ मंत्र्यांनी शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर ओडिशाचे भाजप सरकार ॲक्शन मोडमध्ये दिसत आहे. बुधवारी शपथ घेतल्यानंतर काही तासांतच पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे गुरुवारी सकाळी पुन्हा उघडले जातील आणि ५०० कोटी रुपयांचा निधी उभारला जाईल, असा निर्णय पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 

मंदिराशी संबंधित हे दोन्ही प्रस्ताव मंजूर तर झालेच पण मुख्यमंत्री मोहन चरण माझी हे बुधवारी रात्रीच आपल्या मंत्रिमंडळासह पुरी येथे पोहोचले. त्यानंतर गुरुवारी सकाळी त्यांच्या उपस्थितीत मंदिराचे चारही दरवाजे उघडण्यात आले. दरम्यान, भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे उघडण्याचे आश्वासन दिले होते. कोरोनाच्या काळात हे दरवाजे बंद असल्याने भाविकांची अडचण होत होती. आता चारही दरवाज्यातून भाविकांना प्रवेश मिळणार असून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास कोणतीही अडचण येणार नाही.

मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी संध्याकाळी राज्य सचिवालय लोकसेवा भवन येथे त्यांच्या मंत्र्यांसोबत बैठक झाली. त्यानंतर मंत्रिमंडळाशी संबंधित निर्णयांची माहिती दिली. तसेच, माझी सरकारने शेतकरी आणि महिलांशी संबंधित निर्णयही घेतले. यावेळी मुख्यमंत्री मोहन चरण माझी म्हणाले, राज्य सरकारने पुरी जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे सकाळी सर्व मंत्र्यांच्या उपस्थितीत पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. चारही दरवाजातून भाविकांना मंदिरात प्रवेश मिळेल. 

नवीन सरकारने शेतकरी आणि महिलांसाठी कोणते निर्णय घेतले?याचबरोबर, धानाची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) प्रति क्विंटल ३१०० रुपये करण्यासाठी राज्य सरकार पावले उचलणार असून संबंधित विभागाला यासंदर्भात काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लवकरच समिती स्थापन करण्यात येणार आहे. याशिवाय एमएसपीसह शेतकऱ्यांच्या इतर समस्यांना तोंड देण्यासाठी 'समृद्ध कृषक नीती योजना' करण्यात येणार आहे. यासंदर्भात विभागांना योग्य मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या असून रोडमॅप तयार करून तो शासनासमोर मांडण्यास सांगण्यात आले आहे. सरकारच्या पहिल्या १०० दिवसांत हे काम केले जाईल, असे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी सांगितले.

मंत्रिमंडळ बैठकीत माझी सरकारने महिलांशी संबंधित निर्णय घेतले. यावेळी मुख्यमंत्री मोहन चरण माझी म्हणाले की, महिला सक्षमीकरण आणि बालकल्याणासाठी मागील बीजेडी सरकारचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. त्यामुळे नवीन सरकार १०० दिवसांच्या आत सुभद्रा योजना लागू करेल, ज्याअंतर्गत प्रत्येक महिलेला ५० हजार रुपयांचे कॅश व्हाउचर दिले जाईल. सुभद्रा योजनेच्या अंमलबजावणीसाठी विभागांना मार्गदर्शक तत्त्वे आणि रोडमॅप तयार करण्यास सांगितले आहे.

टॅग्स :OdishaओदिशाBJPभाजपा