शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

१५५१ कोटी रुपयांची रोकड, अमली पदार्थ जप्त, महाराष्ट्रात सर्वाधिक दारु हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 08:23 IST

निवडणूक आयोगाची कारवाई; सोन्याचांदीच्या वस्तूही हस्तगत, महाराष्ट्रात सर्वाधिक दारु हस्तगत

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक आयोगाने देशभरात आतापर्यंत बेहिशेबी रोकड, अवैध दारु, अंमली पदार्थ, सोने-चांदीच्या वस्तू असा सुमारे १५५१ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक १९ लाख लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. या गोष्टींचा वापर मतदारांना आमिष दाखविण्यासाठी करण्यात येणार होता, असे आयोगाने म्हटले आहे. आयोगाने ३७७ कोटी रुपयांची रोकड, १५७ कोटी रुपये किमतीची दारू, ७०५ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ, ७८ लाख लिटर पेट्रोल, ३१२ कोटी रुपयांच्या सोने-चांदीच्या वस्तू जप्त केल्या आहेत.

मतदारांना पैसे किंवा अन्य भेटवस्तू देऊन आपल्या बाजूने वळविण्याचे राजकीय पक्षांचे प्रयत्न हाणून पाडण्याचे आयोगाने ठरविले आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकांत अशा प्रकारच्या २९९.९४ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड निवडणूक आयोगाने जप्त केली होती. आतापर्यंत देशात तामिळनाडूमध्ये सर्वात जास्त म्हणजे १२७.८४ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड निवडणूक आयोगाने जप्त केली आहे.२०१४च्या निवडणुकीत या राज्यातून फक्त १५.५६ कोटींची रोकड ताब्यात घेण्यात आली होती. मतदारांनी देण्यासाठीतयार केलेल्या सोने-चांदीच्या वस्तू तामिळनाडूमधूनच हस्तगत करण्यात आल्या आहेत.पंजाबमधून ११६ कोटींचे अमली पदार्थदेशात महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर म्हणजे १९ लाख लिटर अवैध दारु जप्त करण्यात आली आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकांत महाराष्ट्रातून ३१ हजार लीटर अवैध दारु ताब्यात घेण्यात आली होती. पंजाबमधून ११६ कोटींचे अंमली पदार्थ निवडणूक आयोगाने जप्त केले आहेत.

टॅग्स :liquor banदारूबंदीElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक