शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
4
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
5
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
6
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
7
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
8
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
9
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
10
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
11
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
12
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
13
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
14
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
15
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
16
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
17
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
18
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
19
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
20
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दलच्या पोस्टवरून वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 09:08 IST

Rahul Gandhi latest news: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल पोस्ट केली होती. याच प्रकरणात आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

Rahul Gandhi Marathi News: नेताजी सुभाषचंद्र बोस यांची २३ जानेवारी रोजी जयंती होती. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन केले. त्यांनी केलेल्या पोस्टवर आक्षेप घेत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

दक्षिण कोलकातामधील भवानीपूर पोलीस ठाण्यात राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेने राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दिली होती. 

राहुल गांधींची पोस्ट, आरोप काय?

२३ जानेवारी २०२५ रोजी राहुल गांधींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन करणारी पोस्ट केली. त्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूच्या तारखेबद्दल महासभेने आक्षेप घेतला आहे. 

या पोस्टविरोधात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या घराबाहेर महासभेच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींविरोधात निदर्शने केली. अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रचूड गोस्वामी म्हणाले की, "राहुल गांधी तोच वारसा पुढे चालवत आहे, ज्याने नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आधी काँग्रेस आणि नंतर देश सोडायला भाग पाडले. राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबाने नेहमीच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृती पुसण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळीही त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल चुकीची माहिती दिली आहे."

राहुल गांधींच्या पोस्टमध्ये काय?

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी जी पोस्ट शेअर केली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ रोजी झाल्याचा उल्लेख केला आहे. याच दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विमान ताइहोकू (आता ताईपे, तैवानची राजधानी) येथे दुर्घटनाग्रस्त झाले होते.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू कोणत्या तारखेला झाला, याबद्दल निश्चित माहिती नाही. ते बेपत्ता झाल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या आयोगालाही त्यांच्या मृत्यूच्या तारखेबद्दल निश्चित माहिती मिळाली नाही. 

या पोस्टवरून राहुल गांधी यांच्यावर ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकनेही टीका केली आहे. ही ती संघटना आहे, जिची स्थापना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर केली होती. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि भाजपनेही राहुल गांधींवर या पोस्टवरून टीका केली आहे. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसwest bengalपश्चिम बंगालNetaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोस