शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दलच्या पोस्टवरून वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 09:08 IST

Rahul Gandhi latest news: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल पोस्ट केली होती. याच प्रकरणात आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

Rahul Gandhi Marathi News: नेताजी सुभाषचंद्र बोस यांची २३ जानेवारी रोजी जयंती होती. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन केले. त्यांनी केलेल्या पोस्टवर आक्षेप घेत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

दक्षिण कोलकातामधील भवानीपूर पोलीस ठाण्यात राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेने राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दिली होती. 

राहुल गांधींची पोस्ट, आरोप काय?

२३ जानेवारी २०२५ रोजी राहुल गांधींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन करणारी पोस्ट केली. त्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूच्या तारखेबद्दल महासभेने आक्षेप घेतला आहे. 

या पोस्टविरोधात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या घराबाहेर महासभेच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींविरोधात निदर्शने केली. अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रचूड गोस्वामी म्हणाले की, "राहुल गांधी तोच वारसा पुढे चालवत आहे, ज्याने नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आधी काँग्रेस आणि नंतर देश सोडायला भाग पाडले. राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबाने नेहमीच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृती पुसण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळीही त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल चुकीची माहिती दिली आहे."

राहुल गांधींच्या पोस्टमध्ये काय?

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी जी पोस्ट शेअर केली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ रोजी झाल्याचा उल्लेख केला आहे. याच दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विमान ताइहोकू (आता ताईपे, तैवानची राजधानी) येथे दुर्घटनाग्रस्त झाले होते.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू कोणत्या तारखेला झाला, याबद्दल निश्चित माहिती नाही. ते बेपत्ता झाल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या आयोगालाही त्यांच्या मृत्यूच्या तारखेबद्दल निश्चित माहिती मिळाली नाही. 

या पोस्टवरून राहुल गांधी यांच्यावर ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकनेही टीका केली आहे. ही ती संघटना आहे, जिची स्थापना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर केली होती. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि भाजपनेही राहुल गांधींवर या पोस्टवरून टीका केली आहे. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसwest bengalपश्चिम बंगालNetaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोस