शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 11:34 IST

Kerala Lok Sabha Election 2024: डाव्या पक्षांच्या एलडीएफ आघाडीमधील आमदार पी.व्ही. अन्वर यांनी काँग्रेसचे नेते आणि वायनाड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राहुल गांधी यांच्याविरोधात अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यानंतर आता अन्वर यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

देशभरात विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस आणि डावे एकत्र लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. मात्र केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी आणि डाव्या पक्षांच्या नेतृत्वाखालील आघाडी एकमेकांच्या आमने सामने आले होते. शुक्रवारी झालेल्या मतदानापूर्वी प्रचारामाध्ये दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून प्रचारादरम्यान, एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोपही करण्यात आले. यादरम्यान डाव्या पक्षांच्या एलडीएफ आघाडीमधील आमदार पी.व्ही. अन्वर यांनी काँग्रेसचे नेते आणि वायनाड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राहुल गांधी यांच्याविरोधात अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यानंतर आता अन्वर यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अन्वर यांचं विधान हे दोन समाजामधील तेढ वाढवणारं असल्याचा आरोप ठेवत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

पी. व्ही. अन्वर यांनी २२ एप्रिल रोजी पलक्कड जिल्ह्यात एका प्रचारसभेला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा उल्लेख चौथ्या श्रेणीमधील नागरिक असा केला होता. तसेच राहुल गांधी यांच्या डीएनएची चाचणी केली पाहिजे, अशी मागणी केली होती. तसेच राहुल गांधीं हे गांधी या आडनावाने संबोधण्याच्या पात्रतेचे नसल्याचेही विधान त्यांनी केले होते.

दरम्यान, या प्रकरणी मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या आदेशानुसार शुक्रवार २६ एप्रिल रोजी एलडीएफचे आमदार पी.व्ही. अन्वर यांच्याविरोधात नट्टुकल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अन्वर यांच्यावर भादंवि कलम १५२ए आणि लोकप्रतिनिधित्व कायदा कलम १२५ अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. वकील बैजू नोएल रोसारियो यांच्याकडून दाखल तक्रारीची दखल घेताना कोर्टाने हे आदेश दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या प्रसारादरम्यान राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी आणि अटकेपासून सवलत मिळत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अन्वर यांनी हे विधान केलं होतं. तसेच केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजय यांनीही अन्वर यांच्या विधानाला पाठिंबा दिला होता. 

टॅग्स :kerala Lok Sabha Election 2024केरळ लोकसभा निवडणूक 2024congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४