शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
4
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
5
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
6
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
7
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
8
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
9
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
10
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
11
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
12
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
13
Video - "मी GPS लावला होता..."; हॉटेलमध्ये बायकोला रंगेहाथ पकडल्यावर ढसाढसा रडला नवरा
14
जागावाटपावरून महायुतीत तणाव! मुंबईत शिंदेसेनेला हव्यात १०० हून अधिक जागा, भाजपाचा प्लॅन बी तयार
15
वसंत मोरे मनसे कार्यालयात जाणार; ठाकरे बंधू युतीमुळे पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील रुसवे फुगवे दूर
16
IPL ऑक्शनच्या दिवशीच परफेक्ट ऑडिशन! व्यंकटेश अय्यरचा SMAT स्पर्धेतील टी-२० सामन्यात मोठा धमाका
17
पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदारांची नावं वगळली, SIRच्या मसुदा यादीतून धक्कादायक आकडेवारी समोर 
18
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
19
ICICI Prudential IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज अखेरची संधी; GMP ₹३०० च्या पार, धमाकेदार लिस्टिंगचे संकेत
20
पीएम नरेंद्र मोदी जॉर्डनच्या दौऱ्यावर; भारतासाठी का महत्वाचा आहे हा देश? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमधील प्रकरण : ३०० जवानांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय करणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 04:32 IST

सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा (अफ्स्पा)लागू असलेल्या भागात आॅपरेशन चालविल्याबद्दल सैन्याच्या ३००पेक्षा अधिक जवानांवर गुन्हे दाखल झाल्याच्या प्रकरणात या जवानांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

नवी दिल्ली -  सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा (अफ्स्पा)लागू असलेल्या भागात आॅपरेशन चालविल्याबद्दल सैन्याच्या ३००पेक्षा अधिक जवानांवर गुन्हे दाखल झाल्याच्या प्रकरणात या जवानांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर २० आॅगस्ट रोजी सुनावणी घेण्यात येणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.अशांत क्षेत्रात कर्तव्य पार पाडणाऱ्या जवानांवर खटला चालविला जात आहे, असे मत अ‍ॅड. ऐश्वर्या भाटी यांनी न्यायालयात व्यक्त केले होते. त्यावर सरन्यायाधीश दीपक मिश्र आणि न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर यांच्या पीठाने विचारविनिमय केला. या याचिकेत म्हटले आहे की, गुन्हा दाखल करणे आणि सैन्याच्या जवानांवर खटला चालविणे अफ्स्पाच्या तरतुदींच्या विरुद्ध आहे. कारण, कर्तव्यावर असताना कारवाई केली तर त्यांच्यावर खटला दाखल करण्यापासून सूट मिळालेली आहे. अशा खटल्यांमुळे सैन्य आणि निमलष्करी दलाचे मनोधैर्य कमी होईल, असेही या याचिकेत म्हटले आहे. मणिपूरसारख्या भागात कथित एन्काउंटर आणि कारवाईचा अतिरेक केल्याप्रकरणी सैन्याच्या जवानांवर खटला चालविण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर काही खटले सुरू करण्यात आले आहेत.केंद्र, आसाम सरकारकडून न्यायालयाला हवा खुलासाआसाममध्ये सशस्त्र दले आणि पोलिसांकडून बनावट चकमकी केल्या जात असल्याचा आरोप करणाºया सार्वजनिक हित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि आसाम सरकारकडून उत्तर मागितले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयnewsबातम्या