शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

कुलभूषण जाधव प्रकरणी भारत अडून, पाकिस्तानसोबत सर्व चर्चा रद्द

By admin | Published: April 15, 2017 8:28 AM

कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर भारत - पाकिस्तानमधील संबंध ताणले जात असून भारताने कठोर पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर भारत - पाकिस्तानमधील संबंध ताणले जात असून भारताने कठोर पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. भारताने पाकिस्तानसोबत सर्व द्विपक्षीय चर्चांवर तात्पुरती स्थगिती आणली आहे. 
 
(कुलभूषण जाधव यांची फाशी म्हणजे पाकचा पूर्वनियोजित हत्येचा कट - राजनाथ सिंह)
 
भारत आणि पाकिस्तानमध्ये 17 एप्रिल रोजी समुद्र सुरक्षेसंबंधी होणारी चर्चा रद्द करण्याचा निर्णय सरकारकडून शुक्रवारी घेण्यात आला. भारताने अधिकृतरित्या पाकिस्तानला रविवारी होणा-या प्रस्तावित चर्चेसाठी आम्ही तुमच्या पाकिस्तान समुद्र सुरक्षा एनज्सीच्या (पीएमएसए) प्रतिनिधीमंडळाच्या स्वागतासाठी तयार नसल्याचं कळवलं आहे. सर्व आंतरराष्ट्रीय कायद्यांना झुगारत पाकिस्तानकडून कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर भारतीय संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानसोबत चर्चा न करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
 
महत्वाचं म्हणजे गतवर्षी पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून पठाणकोट आणि उरीमध्ये दहशतवादी हल्ले झाल्यानंतर दोन्ही देशांमधील चर्चा थांबल्या होत्या. त्या नव्याने सुरु करण्याचे प्रयत्न नुकते सुरु झाले होते. गेल्याच महिन्यात सिंधू नदी करारावर चर्चा करण्यासाठी भारताचं प्रतीनिधीमंडळ पाकिस्तानला गेलं होतं. मात्र आता पुन्हा दोन्ही देशांमधील सर्व प्रकारची देवाण - घेवाण थांबली आहे.  "इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयाने 17 एप्रिलला पाकिस्तान समुद्र सुरक्षा एनज्सी आणि भारतीय तटरक्षक दलात होणारी बैठक स्थगित करण्यात आली आहे, असं कळवलं असल्याची", माहिती पाकिस्तान उच्चायुक्तालयाचे प्रवक्ते ख्वाजा तारिक यांनी दिली आहे.
 
याआधी भारत आणि पाकिस्तानदरम्यान सिंधू पाणी करारसंबंधी होणारी चर्चा स्थगित करण्यात आली होती. अमेरिकेत 11 ते 13 एप्रिलदरम्यान ही चर्चा होणार होती. 
 
भारतीय तटरक्षक दल आणि पाकिस्तान समुद्र सुरक्षा एनज्सीमध्ये 2005 रोजी एक करार झाला होता. या करारानुसार दोन्ही देश एकमेकांना बेकायदेशीर जहाजं, सागरी प्रदूषण आणि नैसर्गित आपत्तीशी संबंधित गोष्टींची माहिती पुरवतील. 2016 मध्ये हा करार पाच वर्षांसाठी वाढवण्यात आला. याआधी जुलै महिन्यात भारतीय तटरक्षक दल आणि पाकिस्तान समुद्र सुरक्षा एनज्सीमध्ये शेवटची चर्चा झाली होती. 
 
हेरगिरीच्या आरोपांवरून भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेवर कोणतीही तडजोड न करण्याचा निर्णय पाकिस्तानच्या वरिष्ठ लष्करी जनरल्सनी गुरुवारी घेतला. जाधव यांना फाशी दिले गेले तर त्याचे द्विपक्षीय संबंधांवर अत्यंत गंभीर परिणाम होतील, असा इशारा भारताने आधीच दिलेला आहे. लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा यांच्या अध्यक्षतेखाली कोअर कमांडर्सची बैठक रावळपिंडीत झाली. त्यात कोणतीही तडजोड न करण्याचा निर्णय झाला. लष्कराच्या जनसंपर्क विभागाने निवेदनाद्वारे ही माहिती दिली.
 
कुलभूषण जाधव प्रकरणाची थोडक्यात माहिती जनरल्सना देण्यात आली व अशा देशविरोधी कृत्यांबद्दल कोणतीही तडजोड न करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे त्यात म्हटले आहे.