शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

उमेदवाराने एकाच मतदारसंघातून निवडणूक लढवली पाहिजे - निवडणूक आयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 10:30 IST

एका उमेदवाराने दोन मतदारसंघातून निवडणूक लढवू नये असं मत निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयासमोर व्यक्त केलं आहे

ठळक मुद्दे'एका उमेदवाराने दोन मतदारसंघातून निवडणूक लढवू नये'निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयासमोर आपलं मत व्यक्त केलं आहेन्यायालयाने 13 ऑक्टोबरला निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला नोटीस पाठवून उत्तर मागितलं होतं

नवी दिल्ली - एका उमेदवाराने दोन मतदारसंघातून निवडणूक लढवू नये असं मत निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयासमोर व्यक्त केलं आहे. आयोगाने सांगितलं आहे की, जेव्हा एखादा उमेदवार दोन्ही मतदारसंघातून निवडणूक जिंकतो तेव्हा त्याला एक जागा सोडत राजीनामा द्यावा लागतो. यामुळे त्या जागेवर पुन्हा एकदा निवडणूक घ्यावी लागते. निवडणूक पुन्हा घ्यावी लागल्यामुळे निवडणुकीचा अतिरिक्त खर्च होतो. 2004 आणि 2016 मध्ये देखील यासंबंधी प्रस्ताव देण्यात आला होता. 

सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांच्या खंडपीठाने अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांना सांगितलं आहे की, त्यांनी यासंबंधी सहकार्य केलं पाहिजे. तीन आठवड्यानंतर याप्रकरणी सुनावणी करणार असल्याचं न्यायालयाने सांगितलं आहे. न्यायालयाने 13 ऑक्टोबरला निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला नोटीस पाठवून उत्तर मागितलं होतं. न्यायालयात यासंबंधी एक याचिका दाखल करत आव्हान देण्यात आलं होतं. याचिकेतून संसद तसंच विधानसभासहित सर्व निवडणुकांमध्ये उमेदवाराने दोन मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर बंदी आणण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. 

भाजपा नेता आणि याचिकाकर्ता अश्विनी उपाध्याय यांनी याचिकेत सांगितलं आहे की, ज्याप्रमाणे एक मतदार एक मत तसंच एक उमेदवार एक जागा फॉर्म्यूला असला पाहिजे. लोकशाहीत एक उमेदवारी एकाच जागी निवडणूक लढवण्याचा नियम असला पाहिजे. दोन्ही जागांवर निवडणूक जिंकल्यानंतर एक जागा सोडावी लागते आणि पुन्हा निवडणूक झाल्याने सरकारी तिजोरीवर भार पडतो. त्यामुळे कायद्यानुसार हा नियम खोडून काढला गेला पाहिजे आणि असंवैधानिक घोषित केलं पाहिजे. 

टॅग्स :ElectionनिवडणूकSupreme Courtसर्वोच्च न्यायालय