शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भारतासाठी कॅन्सर बनला गंभीर धोका, ९.३ लाख जणांचा मृत्यू; कॅन्सरने मृत्यू होण्यात आशियात दुसऱ्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 09:29 IST

कॅन्सर साधारण ३४ कारणांमुळे होतो. त्यातही  धूम्रपान, अल्कोहोलचे सेवन आणि वाढत असलेले प्रदूषण आणि त्यातील कणांमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. वायू प्रदूषणामुळे कॅन्सरचे वाढते प्रमाण आशियामध्ये अतिशय चिंताजनक आहे.

नवी दिल्ली : भारतात २०१९ मध्ये नव्याने १२ लाख कॅन्सर रुग्णांची नोंद झाली असून, ९.३ लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कॅन्सरने मृत्यू होण्यात आशिया खंडात भारत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे धक्कादायक वास्तव लॅन्सेट या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या नव्या अभ्यासातून समोर आले आहे.

कारण काय?कॅन्सर साधारण ३४ कारणांमुळे होतो. त्यातही  धूम्रपान, अल्कोहोलचे सेवन आणि वाढत असलेले प्रदूषण आणि त्यातील कणांमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. वायू प्रदूषणामुळे कॅन्सरचे वाढते प्रमाण आशियामध्ये अतिशय चिंताजनक आहे.

शहरीकरण, ग्रामीण ते शहरी स्थलांतर आणि मोटार वाहनांचा वाढता वापर यामुळेही कॅन्सर वाढत असल्याचे संशोधकांनी सांगितले. खैनी, गुटखा, सुपारी आणि पान मसाला यामुळेही कॅन्सर वाढत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर धोकाआशियातील चीन, जपान आणि भारतात कॅन्सर रुग्णांचे प्रमाण आणि मृत्यू सर्वाधिक आहेत. येथे २०१९ मध्ये तब्बल ९४ लाख नवे कॅन्सर रुग्ण सापडले असून, तब्बल ५६ लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कॅन्सर हा सार्वजनिक आरोग्यासाठी अधिक गंभीर धोका बनला आहे, असे अहवालात म्हटले आहे.आम्ही १९९० ते २०१९ दरम्यान ४९ आशियाई देशांमधील कॅन्सरच्या २९ पॅटर्नचा अभ्यास केला. त्यानंतर आजाराचा जगावर बनत चाललेला गंभीर धोका, जखमा आणि धोके यासंदर्भात संशोधनात अभ्यास करण्यात आल्याचे संशोधकांनी सांगितले.

गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर वाढतोय- आशियामध्ये श्वासनलिका आणि फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे अंदाजे १३ लाख जणांना कॅन्सरचे निदान झाले तर १२ लाख जणांचा मृत्यू झाला.- श्वासनलिका आणि फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण पुरुषांमध्ये अधिक तर महिलांमध्ये तिसरे महत्त्वाचे कारण आहे.- महिलांमध्ये, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा अनेक आशियाई देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर किंवा टॉप-५ कॅन्सरमध्ये आहे.

सर्वाधिक कॅन्सर? - श्वासनलिका कॅन्सर- स्तन कॅन्सर- कोलन कॅन्सर- गुदाशय कॅन्सर- पोट आणि नॉन मेलोनोमा त्वचेचा कॅन्सर

कोणत्या देशांमध्ये कॅन्सर वाढतोय? - भारत - नेपाळ - कतार - बांगलादेश - पाकिस्तान

मृत्यू हे ओठाचा आणि तोंडाचा कॅन्सर झाल्यामुळे भारतात होतात. तंबाखूमुळे कॅन्सरसोबतच अन्ननलिका आणि स्वादुपिंडाच्या कॅन्सरचा धोका वाढतो.

टॅग्स :cancerकर्करोगHealthआरोग्यIndiaभारतchinaचीन