शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भारतासाठी कॅन्सर बनला गंभीर धोका, ९.३ लाख जणांचा मृत्यू; कॅन्सरने मृत्यू होण्यात आशियात दुसऱ्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 09:29 IST

कॅन्सर साधारण ३४ कारणांमुळे होतो. त्यातही  धूम्रपान, अल्कोहोलचे सेवन आणि वाढत असलेले प्रदूषण आणि त्यातील कणांमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. वायू प्रदूषणामुळे कॅन्सरचे वाढते प्रमाण आशियामध्ये अतिशय चिंताजनक आहे.

नवी दिल्ली : भारतात २०१९ मध्ये नव्याने १२ लाख कॅन्सर रुग्णांची नोंद झाली असून, ९.३ लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कॅन्सरने मृत्यू होण्यात आशिया खंडात भारत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे धक्कादायक वास्तव लॅन्सेट या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या नव्या अभ्यासातून समोर आले आहे.

कारण काय?कॅन्सर साधारण ३४ कारणांमुळे होतो. त्यातही  धूम्रपान, अल्कोहोलचे सेवन आणि वाढत असलेले प्रदूषण आणि त्यातील कणांमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. वायू प्रदूषणामुळे कॅन्सरचे वाढते प्रमाण आशियामध्ये अतिशय चिंताजनक आहे.

शहरीकरण, ग्रामीण ते शहरी स्थलांतर आणि मोटार वाहनांचा वाढता वापर यामुळेही कॅन्सर वाढत असल्याचे संशोधकांनी सांगितले. खैनी, गुटखा, सुपारी आणि पान मसाला यामुळेही कॅन्सर वाढत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर धोकाआशियातील चीन, जपान आणि भारतात कॅन्सर रुग्णांचे प्रमाण आणि मृत्यू सर्वाधिक आहेत. येथे २०१९ मध्ये तब्बल ९४ लाख नवे कॅन्सर रुग्ण सापडले असून, तब्बल ५६ लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कॅन्सर हा सार्वजनिक आरोग्यासाठी अधिक गंभीर धोका बनला आहे, असे अहवालात म्हटले आहे.आम्ही १९९० ते २०१९ दरम्यान ४९ आशियाई देशांमधील कॅन्सरच्या २९ पॅटर्नचा अभ्यास केला. त्यानंतर आजाराचा जगावर बनत चाललेला गंभीर धोका, जखमा आणि धोके यासंदर्भात संशोधनात अभ्यास करण्यात आल्याचे संशोधकांनी सांगितले.

गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर वाढतोय- आशियामध्ये श्वासनलिका आणि फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे अंदाजे १३ लाख जणांना कॅन्सरचे निदान झाले तर १२ लाख जणांचा मृत्यू झाला.- श्वासनलिका आणि फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण पुरुषांमध्ये अधिक तर महिलांमध्ये तिसरे महत्त्वाचे कारण आहे.- महिलांमध्ये, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा अनेक आशियाई देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर किंवा टॉप-५ कॅन्सरमध्ये आहे.

सर्वाधिक कॅन्सर? - श्वासनलिका कॅन्सर- स्तन कॅन्सर- कोलन कॅन्सर- गुदाशय कॅन्सर- पोट आणि नॉन मेलोनोमा त्वचेचा कॅन्सर

कोणत्या देशांमध्ये कॅन्सर वाढतोय? - भारत - नेपाळ - कतार - बांगलादेश - पाकिस्तान

मृत्यू हे ओठाचा आणि तोंडाचा कॅन्सर झाल्यामुळे भारतात होतात. तंबाखूमुळे कॅन्सरसोबतच अन्ननलिका आणि स्वादुपिंडाच्या कॅन्सरचा धोका वाढतो.

टॅग्स :cancerकर्करोगHealthआरोग्यIndiaभारतchinaचीन