रद्द तत्काळ तिकिटाचा अर्धा परतावा
By Admin | Updated: June 11, 2015 02:40 IST2015-06-11T02:40:30+5:302015-06-11T02:40:30+5:30
तत्काळ तिकीट रद्द केल्यानंतर होणारे संपूर्ण नुकसान आता अर्ध्याने कमी होणार असून, आरक्षित केलेले तत्काळ तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना तिकिटाची

रद्द तत्काळ तिकिटाचा अर्धा परतावा
नवी दिल्ली : तत्काळ तिकीट रद्द केल्यानंतर होणारे संपूर्ण नुकसान आता अर्ध्याने कमी होणार असून, आरक्षित केलेले तत्काळ तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना तिकिटाची ५० टक्के रक्कम परत करण्यात येईल, असे रेल्वेने जाहीर केले. याशिवाय भारतीय रेल्वेने तत्काळ तिकीट आरक्षणाच्या वेळेत बदल केला आहे.
रेल्वेने जारी केलेल्या नव्या वेळेनुसार वातानुकूलित (एसी) श्रेणीचे तत्काळ तिकीट सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत आरक्षित करता येईल. तसेच बिगर वातानुकूलित (नॉन एसी) साठी तत्काळ तिकिटाचे आरक्षण सकाळी ११ वाजता सुरू होईल आणि दुपारी १२ वाजता बंद केले जाईल. यापूर्वी तत्काळ आरक्षणाची वेळ सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत अशी होती.
संपूर्ण गाडी हवी असणाऱ्यांसाठी रेल्वे
लवकरच ‘तत्काळ विशेष रेल्वे’ सेवा सुरू
करणार आहे. ही गाडी काही ठरावीक मार्गांवरच उपलब्ध असेल. ही नियमित नव्हे, तर अतिरिक्त रेल्वे सेवा आहे. रेल्वेने प्रीमियम रेल्वे तिकिटांची रचना कायम ठेवली आहे.
रेल्वेने ‘तत्काळ विशेष रेल्व’च्या आरक्षण कालावधीतही वाढ केली आहे. आता तत्काळ विशेष रेल्वेसाठी ६० दिवसांपूर्वीही आरक्षण करता येईल. तर व्यक्तिगत प्रवाशांना कमीत कमी १० दिवसांपूर्वी तत्काळ रेल्वे आरक्षण करता येईल, असे रेल्वेने म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)