शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
4
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
5
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
6
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
7
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
8
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
9
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
10
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
11
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
12
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
13
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
14
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
15
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
16
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
17
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
18
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
19
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
20
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

निकाल रद्द की, यादीत दुरुस्ती तलाठी भरती : प्रशासनाचे चाचपडणे सुरूच

By admin | Updated: April 15, 2016 23:35 IST

नाशिक : तलाठी भरतीत उमेदवारांची निवड करताना झालेल्या गैरप्रकाराचे प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागताच, चाचपडणार्‍या प्रशासनाने उलट-सुलट निर्णय घेऊन हजारो उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. जाहीर केलेली निवड यादी अंतिम नाही असे एकीकडे सांगत असतानाच तलाठी भरतीची निवड यादी रद्द केल्याचे जाहीर करणार्‍या प्रशासनाने दुसरीकडे अन्याय झालेल्या उमेदवारांकडून लेखी तक्रारीही मागितल्या आहेत. त्यामुळे प्रशासन नेमके काय करणार याविषयी स्पष्ट उलगडा होत नाही.

नाशिक : तलाठी भरतीत उमेदवारांची निवड करताना झालेल्या गैरप्रकाराचे प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागताच, चाचपडणार्‍या प्रशासनाने उलट-सुलट निर्णय घेऊन हजारो उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. जाहीर केलेली निवड यादी अंतिम नाही असे एकीकडे सांगत असतानाच तलाठी भरतीची निवड यादी रद्द केल्याचे जाहीर करणार्‍या प्रशासनाने दुसरीकडे अन्याय झालेल्या उमेदवारांकडून लेखी तक्रारीही मागितल्या आहेत. त्यामुळे प्रशासन नेमके काय करणार याविषयी स्पष्ट उलगडा होत नाही. लिपिक व तलाठी भरतीचे निकाल जाहीर झाल्यानंतर उघड झालेल्या बाबींमुळे अडचणीत आलेल्या प्रशासनाने आता कालापरत्वे भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. जाहीर झालेली निवड यादी अंतिम नाही, त्यात फेरबदल होऊ शकतो असे एकीकडे सांगतानाच, संपूर्ण निवड यादीच रद्द करून २१ एप्रिलनंतर नव्याने यादी जाहीर करण्याचा मनोदयही प्रशासनाने बोलून दाखविला आहे. या निवड यादी विषयी प्रामुख्याने कमी गुण मिळालेल्यांना थेट नियुक्ती देतानाच, परीक्षेला अनुत्तीर्ण असलेल्यांची वर्णी प्रतीक्षा यादीत लावण्याचा प्रकार घडला आहे. एवढेच नव्हे तर पेसा क्षेत्राची बाबही उमेदवारांपासून दडवून ठेवून, हजारो विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळण्यात आले आहे. गुणवत्ता प्राप्त करूनही हजारो उमेदवारांची निवड यादीत वर्णी लागू शकलेली नाही. त्यामुळे पेसा क्षेत्रातील उमेदवारांबाबत प्रशासन काय निर्णय घेणार हेदेखील गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे निवड यादीविषयी तक्रारी घेऊन गेलेल्या उमेदवारांना लेखी तक्रारी करा म्हणून सल्ला देण्यात येत असून, त्यांच्या तक्रारींचे निराकरण करणार म्हणजे काय याविषयीही कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे परीक्षा शुल्क भरून परीक्षेसाठी दिवसरात्र मेहनत घेणार्‍या व गुणवत्ता मिळालेल्या उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. निवड यादी रद्द केली तर त्यासाठ पात्र ठरलेले उमेदवार त्याविरुद्ध न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. त्यातही ज्यांची निवड झाली आहे व गुणवत्ता पात्र असूनही ज्यांना डावलण्यात आले, त्यांना फेर यादीत सामावून घेण्याचा प्रकार म्हणजे निवडीतील गैरप्रकाराची कबुली दिल्यासारखेच होणार आहे. प्रशासन या सार्‍या प्रकारात चाचपडत असल्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.