शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
2
'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल
3
कुठे तोडफोड, कुठे राडा; उमेदवारीवरून राज्यभरात दिसला 'हायव्होल्टेज ड्रामा'! इच्छुकांचे नेत्यांपुढे रडगाणे...
4
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
5
नवीन वर्ष २०२६ मध्ये PM Kisan योजनेचा २२ वा हप्ता कधी जारी होईल? कोणाला मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या
6
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
7
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
8
टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...
9
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
10
६ राशींचे धनलाभाने २०२६ नववर्ष सुरू, यश-प्रगती; समृद्धी-भरभराट, तुमच्या राशीवर कसा प्रभाव?
11
निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार...
12
गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर ३ टक्के सवलत; प्रवाशांना आर्थिक दिलासा
13
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
14
सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
15
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
16
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
17
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
18
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
19
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
20
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

एलआयसीच्या बंद पॉलिसीजच्या पुनरुज्जीवनासाठी मोहीम (वाणिज्य वार्तासाठी)

By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST

नाशिक : भारतीय आयुर्विमा महामंडळाने ग्राहकांसाठी विविध योजना आखल्या असून, आता ई टर्म पॉलिसी थेट संकेतस्थळावरून खरेदी करता येईल. त्याचप्रमाणे बंद पडलेल्या पॉलिसींचे पुनरुज्जीवन आणि बिमा ग्राम अशा विविध योजना राबविण्यास प्रारंभ झाल्याची माहिती वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक प्रदीप शेणॉय यांनी दिली.

नाशिक : भारतीय आयुर्विमा महामंडळाने ग्राहकांसाठी विविध योजना आखल्या असून, आता ई टर्म पॉलिसी थेट संकेतस्थळावरून खरेदी करता येईल. त्याचप्रमाणे बंद पडलेल्या पॉलिसींचे पुनरुज्जीवन आणि बिमा ग्राम अशा विविध योजना राबविण्यास प्रारंभ झाल्याची माहिती वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक प्रदीप शेणॉय यांनी दिली.
महामंडळाने मंगळवारी ५१वा वर्धापनदिन उत्साहात साजरा केला. त्यानिमित्ताने त्यांनी ही माहिती दिली. व्यवस्थापक (विक्री) दिनेश सुखात्मे, व्यवस्थापक (विपणन) अभय कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. केंद्र शासनाची कंपनी खासगी २३ कंपन्यांशी स्पर्धा करीत असूनही अत्यंत यशस्वी आहे. आजही महामंडळाचा मार्केटमधील वाटा ७० टक्क्यांहून अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक मंडल कार्यालयाने गेल्या वर्षभरात २ लाख २५ हजार पॉलिसीज विकून २६७ कोटी रुपयांचा प्रीमिअम मिळवला. यंदाच्या आर्थिक वर्षात ५५ कोटी रुपयांचा प्रीमिअम मिळवतानाच ६० हजार पॉलिसीज विक्रीची सीमा रेषा केव्हाच ओलांडली आहे. विमा दावे निकाली काढण्यातही महामंडळ अग्रेसर असून, गेल्या वर्षी २ लाख २१ हजार विमाधारकांना एसबी आणि मॅच्युरिटी क्लेमपोटी ५३८ कोटी रुपयांचे वाटप केले, तर सर्वच्या सर्व म्हणजे ८ हजार ६५५ डेथ क्लेमची रक्कम १०२ कोटी २७ लाख त्यांच्या वारसांना अदा केली, अशी माहिती देऊन त्यांनी सांगितले की, महामंडळाने ग्राहकांसाठी विविध भरणा केंद्र, तसेच संकेतस्थळ आणि ॲपसारखी सुविधा दिल्याने आता ६५ टक्के ग्राहकांना विमा कार्यालयात प्रीमिअम भरण्यासाठी येण्याची गरज राहिलेली नाही. त्याचबरोबर १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद पडलेल्या पॉलिसीज सुरू करण्याची मोहीम राबविण्यात येणार असून, पाच वर्षांच्या आत बंद पडलेल्या पॉलिसीज सुरू करण्यात येणार आहे. प्रीमिअमपोटी थकलेल्या व्याजात सवलत आणि वैद्यकीय तपासणीची गरज नाही, अशा अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे बचत ग्राम योजना सुरू करण्यात आली असून, संबंधित गावातून दहा लाख रुपयांपर्यंत प्रीमिअम मिळाल्यास त्या गावाला एक लाख रुपयांची लोकोपयोगी सुविधा दिली जाणार असल्याचे ते म्हणाले. (वा. प्र)