शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कॅगला समजले भारतीय रेल्वेच्या विस्कटलेल्या गणिताचे गुपित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 16:40 IST

कॅगने मंगळवारी यासंदर्भात संसदेत अहवाल सादर केला. त्यात कॅगने निरीक्षणे नोंदवली आहेत.

नवी दिल्ली- भारतीय रेल्वे गेल्या काही वर्षांमध्ये वेळापत्रकापेक्षा अत्यंत उशिरा धावत असल्याचे दिसत आहे.

2017-18 या वर्षी 30 टक्के ट्रेन उशिरा धावल्याचे स्पष्ट झाले आहे. एप्रिल 2017-मार्च 2018 या कालावधीमध्ये केवळ 71.39 टक्के फेऱ्याच वेळेवर झाल्या. त्याआधीच्या वर्षापेक्षा म्हणजे 2016-17 यावर्षी 76.69 टक्के इतक्याच फेऱ्या वेळेनुसार झाल्या होत्या. कॅगला मात्र भारतीय रेल्वेच्या 'मंदयाळीचे' कारण समजले आहे. गेल्या काही दिवसांपासून कॅगने भारतीय रेल्वेमध्ये होत असलेल्या विविध गोंधळाच्या बाबी उजेडात येत आहेत. केंद्र सरकारने घोषित केलेल्या स्थानकांच्या पुनर्विकास योजनेतील त्रूटींमुळे हा उशिर होत असल्याचे कॅगचे म्हणणे आहे. या योजनेमुळे स्थानकांवर रेल्वे थांबण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नाही व त्यामुळे वेळापत्रक कोलमडते.

कॅगने मंगळवारी यासंदर्भात संसदेत अहवाल सादर केला. त्यात कॅगने निरीक्षणे नोंदवली आहेत. 24 डब्यांच्या रेल्वे थांबतील अशी स्थानकांवर पुरेशा प्लॅटफॉर्म्सची सुविधा नाही तसेच वॉशिंग पिट लाइन्स आणि स्टॅबलिंग लाइन्स नसल्यामुळेही रेल्वेला उशिर होतो असे मत कॅगने नोंदवले आहे. कॅगने भारतीय रेल्वेच्या 10 विभागांपैकी 15 स्थानकांचा अभ्यास केला.

गेल्याच आठवड्यात याप्रकारेच आणखी एक धक्कादायक माहिती उघड झाली होती. 2014 साली पाठवलेले खत रेल्वेने संबंधित स्थळी 2018 साली पोहोचवले.  आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून मालगाडीतून उत्तरप्रदेशातील बस्ती जिल्ह्यात पोहोचवण्यासाठी खत पाठवले गेले. 2014 मध्ये ही मालगाडी तेथून निघाली. तिला 1400 किमी अंतर पार करुन बस्ती येथे जायचे होते. या खताची किंमत 10 लाख इतकी होती. बस्ती येथे खताची डिलिव्हरी झाली नसल्याचे लक्षात येताच भारतीय रेल्वेशी संपर्क करण्यात आला. मात्र रेल्वेला हे डबे शोधता आले नाहीत. हे डबे भारतभर एका स्टेशनमागे दुसऱ्य़ा स्टेशनमध्ये फिरत राहिले आणि शेवटी 3.5 वर्षांनी बस्ती येथे पोहोचले आहेत. यामधील सर्व खत खराब झाले असून त्याचे मालक रामचंद्र गुप्ता यांनी ते स्विकारण्यास नकार दिला आहे. आपण गेली साडेतीन वर्षे रेल्वेक़डे चौकशी केली मात्र रेल्वेने कोणतेही उत्तर दिले नाही. 

टॅग्स :railwayरेल्वे