शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

कॅगला समजले भारतीय रेल्वेच्या विस्कटलेल्या गणिताचे गुपित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 16:40 IST

कॅगने मंगळवारी यासंदर्भात संसदेत अहवाल सादर केला. त्यात कॅगने निरीक्षणे नोंदवली आहेत.

नवी दिल्ली- भारतीय रेल्वे गेल्या काही वर्षांमध्ये वेळापत्रकापेक्षा अत्यंत उशिरा धावत असल्याचे दिसत आहे.

2017-18 या वर्षी 30 टक्के ट्रेन उशिरा धावल्याचे स्पष्ट झाले आहे. एप्रिल 2017-मार्च 2018 या कालावधीमध्ये केवळ 71.39 टक्के फेऱ्याच वेळेवर झाल्या. त्याआधीच्या वर्षापेक्षा म्हणजे 2016-17 यावर्षी 76.69 टक्के इतक्याच फेऱ्या वेळेनुसार झाल्या होत्या. कॅगला मात्र भारतीय रेल्वेच्या 'मंदयाळीचे' कारण समजले आहे. गेल्या काही दिवसांपासून कॅगने भारतीय रेल्वेमध्ये होत असलेल्या विविध गोंधळाच्या बाबी उजेडात येत आहेत. केंद्र सरकारने घोषित केलेल्या स्थानकांच्या पुनर्विकास योजनेतील त्रूटींमुळे हा उशिर होत असल्याचे कॅगचे म्हणणे आहे. या योजनेमुळे स्थानकांवर रेल्वे थांबण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नाही व त्यामुळे वेळापत्रक कोलमडते.

कॅगने मंगळवारी यासंदर्भात संसदेत अहवाल सादर केला. त्यात कॅगने निरीक्षणे नोंदवली आहेत. 24 डब्यांच्या रेल्वे थांबतील अशी स्थानकांवर पुरेशा प्लॅटफॉर्म्सची सुविधा नाही तसेच वॉशिंग पिट लाइन्स आणि स्टॅबलिंग लाइन्स नसल्यामुळेही रेल्वेला उशिर होतो असे मत कॅगने नोंदवले आहे. कॅगने भारतीय रेल्वेच्या 10 विभागांपैकी 15 स्थानकांचा अभ्यास केला.

गेल्याच आठवड्यात याप्रकारेच आणखी एक धक्कादायक माहिती उघड झाली होती. 2014 साली पाठवलेले खत रेल्वेने संबंधित स्थळी 2018 साली पोहोचवले.  आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून मालगाडीतून उत्तरप्रदेशातील बस्ती जिल्ह्यात पोहोचवण्यासाठी खत पाठवले गेले. 2014 मध्ये ही मालगाडी तेथून निघाली. तिला 1400 किमी अंतर पार करुन बस्ती येथे जायचे होते. या खताची किंमत 10 लाख इतकी होती. बस्ती येथे खताची डिलिव्हरी झाली नसल्याचे लक्षात येताच भारतीय रेल्वेशी संपर्क करण्यात आला. मात्र रेल्वेला हे डबे शोधता आले नाहीत. हे डबे भारतभर एका स्टेशनमागे दुसऱ्य़ा स्टेशनमध्ये फिरत राहिले आणि शेवटी 3.5 वर्षांनी बस्ती येथे पोहोचले आहेत. यामधील सर्व खत खराब झाले असून त्याचे मालक रामचंद्र गुप्ता यांनी ते स्विकारण्यास नकार दिला आहे. आपण गेली साडेतीन वर्षे रेल्वेक़डे चौकशी केली मात्र रेल्वेने कोणतेही उत्तर दिले नाही. 

टॅग्स :railwayरेल्वे