शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

२०४७ पर्यंत विकसित भारताचे मांडले लक्ष्य, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 06:39 IST

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील ही अशा प्रकारची शेवटची बैठक ठरू शकते.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘विकसित भारत : २०४७’ साठी आराखडा (व्हिजन डॉक्युमेंट) आणि पुढील पाच वर्षांच्या विस्तृत कृती आराखड्यावर दिवसभर विचारमंथन केले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील ही अशा प्रकारची शेवटची बैठक ठरू शकते.

सरकारी सूत्रांनी सांगितले की, मे महिन्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर तत्काळ पावले उचलण्यासाठी १०० दिवसांची विषयपत्रिका (अजेंडा) त्वरित अमलात आणण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली. ‘विकसित भारत’साठीचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ दोन वर्षांपेक्षा जास्त गहन तयारीतून साकारले असून, त्यात सर्व मंत्रालयांचा दृष्टिकोन आणि राज्य सरकारे, शैक्षणिक संस्था, उद्योगसंस्था, नागरी समाज, वैज्ञानिकांचा व्यापक सल्ला समाविष्ट आहे. त्यासाठी विविध स्तरांवर २७०० हून अधिक बैठका, कार्यशाळा आणि चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. २० लाखांहून अधिक तरुणांच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

विकासाची ‘ब्लू प्रिंट’‘विकसित भारत’ आराखडा राष्ट्रीय धोरण, आकांक्षा, उद्दिष्टे आणि कृती बिंदूंसह सर्वसमावेशक ‘ब्लू प्रिंट’ आहे, सूत्रांनी सांगितले. त्याच्या उद्दिष्टांमध्ये आर्थिक वाढ, शाश्वत विकास उद्दिष्टे, राहणीमान सुलभता, व्यवसाय, पायाभूत सुविधा आणि सामाजिक कल्याण सुलभ करणे यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. या बैठकीत अनेक मंत्रालयांनी आपली कल्पना मांडली.

जनतेचा पाठिंबा मिळवा : मोदी- पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मंत्री सहकाऱ्यांना निवडणुकीदरम्यान लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यास सांगितले. - विकासाला चालना देण्यासाठी आणि समाजाच्या सर्व घटकांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी सरकारने केलेल्या असंख्य उपाययोजनांबद्दलही मोदींनी सांगितले. - बैठकीत विविध मुद्द्यांवर सादरीकरणही करण्यात आले. आपले सरकार सलग तिसऱ्यांदा सत्ता राखेल, असा विश्वास त्यांनी वारंवार व्यक्त केला आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाIndiaभारत