शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

बिहारमध्ये लवकरच मंत्रिमंडळ विस्तार, नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 05:04 IST

तीन ते चार जणांना मिळू शकते संधी

एस. पी. सिन्हा

पाटणा : बंगळुरूत होणाऱ्या विरोधी ऐक्याच्या बैठकीत भाग घेतल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार याच आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकतात. हा विस्तार २१ किंवा २२ जुलै रोजी होऊ शकतो, अशी चर्चा आहे. मंत्रिमंडळ विस्तारात तीन ते चार नव्या मंत्र्यांना शपथ दिली जाईल. दोन मंत्री राजदच्या कोट्यातून तर एक किंवा दोन मंत्री काँग्रेसच्या कोट्यातून घेण्यात येणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराची काँग्रेसकडून दीर्घ काळापासून मागणी करण्यात येत आहे.

काँग्रेसने दोन मंत्रिपदे मागितली आहेत. मात्र, राजदने काँग्रेसला एकच मंत्रिपद द्यावे, असे मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. राजदचे नेते आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव काँग्रेसला दोन मंत्रिपदे देण्याच्या विरोधात आहेत. सध्या काँग्रेसचे दोन मंत्री आहेत. एकीकडे काँग्रेसला किती मंत्रिपदे द्यायची, यावर अद्याप अंतिम सहमती झालेली नाही तर दुसरीकडे कोणाला मंत्रिपद द्यावे यावरून काँग्रेसमध्येही गोंधळाची स्थिती आहे. जर पक्षाला एकच मंत्रिपद मिळाले तर वैश्य समाजातील नेत्याला मंत्रिपद दिले जाऊ शकते. एक सवर्ण आणि एक अन्य जातीतील नेत्याला मंत्री बनवता यावे यासाठी काँग्रेसने दोन पदांची मागणी केली आहे. मात्र, आता एकच मंत्रिपद मिळण्याची चिन्हे असल्याने कोणाला मंत्री करावे, असे आव्हान पक्षासमोर निर्माण झाले आहे. दुसरीकडे राजदकडून ज्या दोन नेत्यांना मंत्रिपद दिले जाणार आहे त्यात एक  भूमिहार आणि एक राजपूत समाजातील असेल, असे सांगण्यात येते.

टॅग्स :Biharबिहारcongressकाँग्रेसNitish Kumarनितीश कुमार