शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

कांडला बंदराला दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्यास कॅबिनेटची मंजूरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 12:50 IST

भारतीय बंदरे कायदा 1908 नुसार देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करत केंद्र सरकारने 25 सप्टेंबरपासून यां बंदराचे नाव बदलत असल्याचे जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे कांडला पोर्ट ट्रस्टही आता दीनदयाळ पोर्ट ट्रस्ट या नावाने ओळखले जाणार आहे.

ठळक मुद्देकांडला बंदर महाराव खेंगर्जी यांच्या प्रयत्नांमधून 1931 साली उभे राहिले होते. कालांतराने या बंदरातून मालवाहतुकीचे प्रमाण वाढत गेले आणि गुजरातमधून मालवाहतूक करणाऱ्या बंदरांमध्ये पहिल्या क्रमांकावर जाऊन पोहोचले. कांडला बंदरातून 10 कोटी टन कार्गोचा व्यापार झाल्याने एक नवा विक्रमही स्थापन झाला. कच्छच्या आखातात बांधलेले हे बंदर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील एक महत्त्वाचे बंदर मानले जाते.

नवी दिल्ली, दि.4- गुजरातमधील कांडला बंदरास पं. दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्यास केंद्रीय कॅबिनेटने मंजूरी दिली आहे. पं. दीनदयाळ उपाध्याय यांची जन्मशताब्दीच्या निमित्ताने या वर्षी 25 सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी गुजरातमधील कांडला बंदराचे नाव बदलून दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. आता केंद्रीय कॅबिनेटने या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.

भारतीय बंदरे कायदा 1908 नुसार देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करत केंद्र सरकारने 25 सप्टेंबरपासून यां बंदराचे नाव बदलत असल्याचे जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे कांडला पोर्ट ट्रस्टही आता दीनदयाळ पोर्ट ट्रस्ट या नावाने ओळखले जाणार आहे. कांडला बंदरातील 933 कोटींच्या विविध कामांच्या कोनशिला समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कांडला बंदरास पं. दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्यात यावे असी इच्छा व्यक्त केली होती. दीनदयाळ नेहमीच गरिबांसाठी उभे ठाकले, त्यांचं कार्य गरीब आणि समाजातील दबलेल्या लोकांच्या उत्थानासाठी काम करण्यासाठी आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहिल असे पंतप्रधान मोदी त्या कार्यक्रमात म्हणाले होते.

कांडला बंदर महाराव खेंगर्जी यांच्या प्रयत्नांमधून 1931 साली उभे राहिले होते. कालांतराने या बंदरातून मालवाहतुकीचे प्रमाण वाढत गेले आणि गुजरातमधून मालवाहतूक करणाऱ्या बंदरांमध्ये पहिल्या क्रमांकावर जाऊन पोहोचले. कांडला बंदरातून 10 कोटी टन कार्गोचा व्यापार झाल्याने एक नवा विक्रमही स्थापन झाला. कच्छच्या आखातात बांधलेले हे बंदर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील एक महत्त्वाचे बंदर मानले जाते.

टॅग्स :Indiaभारत