शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

CAA Protest : 'भाजपाला एकटे पाडण्यासाठी सर्वांनी एकत्र या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 16:08 IST

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची एकजूट होत आहे.

पुरूलिया - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची एकजूट होत आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. आसाममध्ये राबविण्यात येणारी एनआरसी योजना तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात ममता बॅनर्जी ठामपणे उभ्या राहिल्या. त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. 

पुरूलिया येथे सोमवारी (30 डिसेंबर) एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जनतेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून भाजपावर जोरदार टीका केली आहे. तसेच भाजपाला एकटे पाडण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले आहे. 'तुम्ही केवळ मतदान यादीत आपले नाव अचूक आहे की नाही याची खात्री करा, आम्ही एकाही व्यक्तीला देशाबाहेर काढू देणार नाही, हे आमचं वचन आहे' असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

ममता बॅनर्जी यांनी याआधीही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात जाहीर सभा घेतल्या आहेत. त्यामध्ये भाजपा हा बंगालीविरोधी पक्ष आहे, असं आवर्जून सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशात संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षणाखाली सार्वमत घ्यावं असे आव्हान त्यांनी दिलं होतं. ''केंद्र सरकारने संयुक्त राष्ट्र आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यासारख्या कुठल्याही निष्पक्षपाती संघटनेच्या देखरेखीखाली सार्वमत घ्यावे आणि किती नागरिक नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या बाजूने आहेत आणि किती नागरिक विरोधात आहेत हे विचारावे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 73 वर्षांनी आम्हाला अचानकपणे आम्ही भारतीय नागरिक आहोत हे सिद्ध करावे लागणार आहे. तुम्ही तुमचा विरोध मवाळ करू नका कारण आपल्याला नागरिकत्वविरोधा कायदा रद्द करायचा आहे.''

कोलकातामधील धर्मतला येथे एका आंदोलनात सहभागी झालेल्या ममता बॅनर्जी यांनी मंचावर आंदोलकांसोबत आंदोलनात सहभागी होत नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीला विरोध केला होता. ''सध्या भाजपा खास प्रकारच्या टोप्या खरेदी करत आहे. या टोप्या परिधान करून ते हिंसाचार माजवण्यास सांगणार आहे जेणेकरून एक समुदाय बदनाम व्हावा हा त्यांचा हेतू आहे. त्यांना यशस्वी होऊ देऊ नका'' असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं.

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपा