शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानमध्ये CAA आणि NRC लागू करणार नाही - अशोक गहलोत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 19:24 IST

'तुम्ही बहुमताने कायदा आणू शकता. मात्र, लोकांची मनं जिंकू शकत नाही'

जयपूर : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नोंदणी नागरिक (एनआरसी) राजस्थानात लागू केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी स्पष्ट केले आहे. रविवारी राजधानी जयपूरमध्ये संविधान बचाव शांती मार्च काढल्यानंतर याठिकाणी आयोजित सभेत मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत सीएए आणि एनआरसी राज्यस्थानमध्ये लागू करणार नाही, अशी घोषणा केली. 

जनसभेत मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले, "तुम्ही बहुमताने कायदा आणू शकता. मात्र, लोकांची मनं जिंकू शकत नाही. उत्तर प्रदेशात 15 जणांचा मृत्यू झाला. ज्या राज्यात भाजपाशासित सरकार आहेत, त्याठिकाणी गोळीबार झाला." याचबरोबर, आसामध्ये एनआरसी अयशस्वी झाली. त्याठिकाणी एनआरसीमधून 16 लाख हिंदू बाहेर झाले. आता सीएए आणले. हे अव्यवहारिक असे अशोक गहलोत यांनी सांगितले. याशिवाय, अशोक गहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सुद्धा हल्लाबोल केला. बिहारचे मुख्यमंत्री आणि ओडिशाचे मुख्यमंत्री जे की संसदेत तुम्हाला पाठिंबा देतात. ते सुद्धा त्यांच्या राज्यात एनआरसी लागू करणार नाहीत. त्यामुळे जनतेच्या भावना समजून राजस्थान सरकार हे दोन्ही कायदे राज्यात लागू करणार नाही, असे अशोक गहलोत म्हणाले. 

दरम्यान, सीएएच्याविरोधात सध्या देशातले वातावरण तापले आहे. अनेक ठिकाणी आंदोलने सुरू असून काही ठिकाणी आंदोलनांना हिंसक वळणदेखील लागले आहे. सीएएवरुन एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपावर टीका केली आहे. ही लढाई फक्त मुस्लिमांपुरती मर्यादित नसून यामध्ये दलित आणि अनुसुचित जाती- जमातींचादेखील समावेश असल्याचे असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सीएए या काळ्या कायद्याला विरोध आहे, त्यांनी आपल्या घराबाहेर तिरंगा फडकवावा. जेणेकरुन भाजपाला हा कायदा चुकीचा असल्याचा संदेश पोहोचण्यास मदत होईल. तसेच, या कायद्याला शांतता आणि अहिंसेच्या मार्गाने विरोध करावा, असे आवाहन करत असदुद्दीन ओवेसी यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिकरित्या वाचन केले.

दुसरीकडे याच मुद्यावरून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. उत्तर प्रदेशात झालेल्या हिंसेला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दोषी ठरवत सरकारच्या आदेशानुसारच जाणीवपूर्वक जाळपोळ व हिंसाचार करण्यात आल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केले आहे. अर्थव्यवस्था, रोजगार आणि शेतकर्‍यांच्या मुद्दय़ावर भाजपा पूर्णपणे अपयशी ठरले आहे, त्यामुळे जनतेचे लक्ष वळवण्यासाठी दंगली पसरवल्या जात आहेत. दंगलीचा फायदा भाजपला होतो. दंगल घडवून आणणारे लोकं सरकारमध्ये बसले आहेत. तसेच भाजप जाणीवपूर्वक द्वेष पसरवत असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचे सुद्धा अखिलेश यादव म्हणाले.

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीRajasthanराजस्थान