शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

राजस्थानमध्ये CAA आणि NRC लागू करणार नाही - अशोक गहलोत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 19:24 IST

'तुम्ही बहुमताने कायदा आणू शकता. मात्र, लोकांची मनं जिंकू शकत नाही'

जयपूर : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नोंदणी नागरिक (एनआरसी) राजस्थानात लागू केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी स्पष्ट केले आहे. रविवारी राजधानी जयपूरमध्ये संविधान बचाव शांती मार्च काढल्यानंतर याठिकाणी आयोजित सभेत मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत सीएए आणि एनआरसी राज्यस्थानमध्ये लागू करणार नाही, अशी घोषणा केली. 

जनसभेत मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले, "तुम्ही बहुमताने कायदा आणू शकता. मात्र, लोकांची मनं जिंकू शकत नाही. उत्तर प्रदेशात 15 जणांचा मृत्यू झाला. ज्या राज्यात भाजपाशासित सरकार आहेत, त्याठिकाणी गोळीबार झाला." याचबरोबर, आसामध्ये एनआरसी अयशस्वी झाली. त्याठिकाणी एनआरसीमधून 16 लाख हिंदू बाहेर झाले. आता सीएए आणले. हे अव्यवहारिक असे अशोक गहलोत यांनी सांगितले. याशिवाय, अशोक गहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सुद्धा हल्लाबोल केला. बिहारचे मुख्यमंत्री आणि ओडिशाचे मुख्यमंत्री जे की संसदेत तुम्हाला पाठिंबा देतात. ते सुद्धा त्यांच्या राज्यात एनआरसी लागू करणार नाहीत. त्यामुळे जनतेच्या भावना समजून राजस्थान सरकार हे दोन्ही कायदे राज्यात लागू करणार नाही, असे अशोक गहलोत म्हणाले. 

दरम्यान, सीएएच्याविरोधात सध्या देशातले वातावरण तापले आहे. अनेक ठिकाणी आंदोलने सुरू असून काही ठिकाणी आंदोलनांना हिंसक वळणदेखील लागले आहे. सीएएवरुन एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपावर टीका केली आहे. ही लढाई फक्त मुस्लिमांपुरती मर्यादित नसून यामध्ये दलित आणि अनुसुचित जाती- जमातींचादेखील समावेश असल्याचे असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सीएए या काळ्या कायद्याला विरोध आहे, त्यांनी आपल्या घराबाहेर तिरंगा फडकवावा. जेणेकरुन भाजपाला हा कायदा चुकीचा असल्याचा संदेश पोहोचण्यास मदत होईल. तसेच, या कायद्याला शांतता आणि अहिंसेच्या मार्गाने विरोध करावा, असे आवाहन करत असदुद्दीन ओवेसी यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिकरित्या वाचन केले.

दुसरीकडे याच मुद्यावरून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. उत्तर प्रदेशात झालेल्या हिंसेला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दोषी ठरवत सरकारच्या आदेशानुसारच जाणीवपूर्वक जाळपोळ व हिंसाचार करण्यात आल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केले आहे. अर्थव्यवस्था, रोजगार आणि शेतकर्‍यांच्या मुद्दय़ावर भाजपा पूर्णपणे अपयशी ठरले आहे, त्यामुळे जनतेचे लक्ष वळवण्यासाठी दंगली पसरवल्या जात आहेत. दंगलीचा फायदा भाजपला होतो. दंगल घडवून आणणारे लोकं सरकारमध्ये बसले आहेत. तसेच भाजप जाणीवपूर्वक द्वेष पसरवत असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचे सुद्धा अखिलेश यादव म्हणाले.

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीRajasthanराजस्थान