शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

राजस्थानमध्ये CAA आणि NRC लागू करणार नाही - अशोक गहलोत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 19:24 IST

'तुम्ही बहुमताने कायदा आणू शकता. मात्र, लोकांची मनं जिंकू शकत नाही'

जयपूर : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नोंदणी नागरिक (एनआरसी) राजस्थानात लागू केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी स्पष्ट केले आहे. रविवारी राजधानी जयपूरमध्ये संविधान बचाव शांती मार्च काढल्यानंतर याठिकाणी आयोजित सभेत मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत सीएए आणि एनआरसी राज्यस्थानमध्ये लागू करणार नाही, अशी घोषणा केली. 

जनसभेत मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले, "तुम्ही बहुमताने कायदा आणू शकता. मात्र, लोकांची मनं जिंकू शकत नाही. उत्तर प्रदेशात 15 जणांचा मृत्यू झाला. ज्या राज्यात भाजपाशासित सरकार आहेत, त्याठिकाणी गोळीबार झाला." याचबरोबर, आसामध्ये एनआरसी अयशस्वी झाली. त्याठिकाणी एनआरसीमधून 16 लाख हिंदू बाहेर झाले. आता सीएए आणले. हे अव्यवहारिक असे अशोक गहलोत यांनी सांगितले. याशिवाय, अशोक गहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सुद्धा हल्लाबोल केला. बिहारचे मुख्यमंत्री आणि ओडिशाचे मुख्यमंत्री जे की संसदेत तुम्हाला पाठिंबा देतात. ते सुद्धा त्यांच्या राज्यात एनआरसी लागू करणार नाहीत. त्यामुळे जनतेच्या भावना समजून राजस्थान सरकार हे दोन्ही कायदे राज्यात लागू करणार नाही, असे अशोक गहलोत म्हणाले. 

दरम्यान, सीएएच्याविरोधात सध्या देशातले वातावरण तापले आहे. अनेक ठिकाणी आंदोलने सुरू असून काही ठिकाणी आंदोलनांना हिंसक वळणदेखील लागले आहे. सीएएवरुन एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपावर टीका केली आहे. ही लढाई फक्त मुस्लिमांपुरती मर्यादित नसून यामध्ये दलित आणि अनुसुचित जाती- जमातींचादेखील समावेश असल्याचे असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सीएए या काळ्या कायद्याला विरोध आहे, त्यांनी आपल्या घराबाहेर तिरंगा फडकवावा. जेणेकरुन भाजपाला हा कायदा चुकीचा असल्याचा संदेश पोहोचण्यास मदत होईल. तसेच, या कायद्याला शांतता आणि अहिंसेच्या मार्गाने विरोध करावा, असे आवाहन करत असदुद्दीन ओवेसी यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिकरित्या वाचन केले.

दुसरीकडे याच मुद्यावरून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. उत्तर प्रदेशात झालेल्या हिंसेला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दोषी ठरवत सरकारच्या आदेशानुसारच जाणीवपूर्वक जाळपोळ व हिंसाचार करण्यात आल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केले आहे. अर्थव्यवस्था, रोजगार आणि शेतकर्‍यांच्या मुद्दय़ावर भाजपा पूर्णपणे अपयशी ठरले आहे, त्यामुळे जनतेचे लक्ष वळवण्यासाठी दंगली पसरवल्या जात आहेत. दंगलीचा फायदा भाजपला होतो. दंगल घडवून आणणारे लोकं सरकारमध्ये बसले आहेत. तसेच भाजप जाणीवपूर्वक द्वेष पसरवत असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचे सुद्धा अखिलेश यादव म्हणाले.

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीRajasthanराजस्थान