शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आंदोलनाचा पर्यटन उद्योगाला मोठा फटका, पर्यटकांचा ओघ आटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 05:28 IST

पर्यटकांचा ओघ आटणार; अनेक देशांनी भारताला पर्यटनासाठी असुरक्षित देश केले घोषित

कोलकाता : सीएए आणि एनआरसी यावरून देशात निर्माण झालेल्या संघर्षाचा मोठा फटका पर्यटन उद्योगाला बसत आहे. अनेक देशांनी भारताला प्रवासासाठी असुरक्षित देश घोषित केले आहे. त्यामुळे ऐन सुट्यांच्या हंगामात विदेशी पर्यटकांचा ओघ आटण्याची भीती निर्माण झाली आहे. भारतीय पर्यटकही देशांतर्गत पर्यटन करण्यापेक्षा विदेशी जाण्याचा पर्याय निवडण्याचा विचार करीत आहेत.

‘बुकिंग केलेल्या विदेशी पर्यटकांकडून आम्हाला परिस्थितीची विचारणा करणारे फोन येत आहेत. बुकिंग रद्द करण्याचे अथवा प्रवास पुढे ढकलण्याचे प्रकार अजून फार मोठ्या प्रमाणात घडलेले नाहीत. तथापि, वातावरण न निवळल्यास बुकिंग रद्दच होऊ शकतात, असे ट्रॅव्हल एंजटस् असोसिएशनच्या अध्यक्ष ज्योती मायल यांनी सांगितले. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, संयुक्त अरब अमिरात आणि आॅस्ट्रेलिया या देशांनी आपल्या पर्यटकांसाठी सल्लापत्र जारी करून भारतात प्रवास टाळण्याचा व विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.केरळच्या मुख्यमंत्र्यांवर केंद्रीय मंत्र्यांची टीका1 तिरुवनंतपुरम : नागरिकत्व कायद्याविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनावरून केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन आणि राज्यातील काँग्रेसचे नेते रमेश चेन्नीथला यांच्यावर टीका करीत केंद्रीय परराष्ट्रमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी म्हटले आहे की, हे आंदोलन रस्त्यांवर घेऊन जाणे हे अराजकवाद्यांचे वैशिष्ट्य आहे.2 केरळात काँग्रेस आणि डाव्यांनी अलीकडेच सीएएविरुद्ध संयुक्त आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी भाजपच्या नेतृत्वातील रालोआ, संघ परिवारावर टीका केली होती.3 मुरलीधरन म्हणाले की, केरळच्या मुख्यमंत्र्यांना जर या कायद्याबाबत काही शंका असतील, तर त्यांनी यावर चर्चा करावी; पण हे आंदोलन रस्त्यांवर घेऊन जाणे अराजकवाद्यांचे वैशिष्ट्य आहे. जेव्हा संवैधानिक पदांवर बसलेले लोक अराजकवादी बनण्याचा प्रयत्न करतात तेव्हा कायदा सुव्यवस्थेसाठी त्यांच्याशी कोण संपर्क करील.

टॅग्स :Keralaकेरळcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकtourismपर्यटनBJPभाजपा