शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कॉ. पानसरे हल्ला निषेध-प्रतिक्रिया-२

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

सरकारसाठी लांच्छनास्पद

सरकारसाठी लांच्छनास्पद

कॉ. गोविंद पानसरे हे महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ राजकीय नेते, विचारवंत आणि धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, श्रमिकांची दयनीय अवस्था, सध्याच्या सरकारच्या खासगीकरणाची धोरणे, त्यातून निर्माण होणारे टोलचे प्रश्न याविरुद्धच्या लढ्यात नेतृत्व केले. अशा नेतृत्वावर बंदुकीचा हल्ला होणे आणि हल्लेखोर पकडले न जाणे, ही सरकारला लांच्छनास्पद गोष्ट आहे. समाजात परिवर्तन घडून येऊ न देणारे बेडर झाले आहेत.तेव्हा मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा छडा लावावा. पुरोगामी कार्यकर्त्यांवर हल्ले होणार नाही, यासाठी सर्वच सामाजिक कार्यकर्त्यांनी एकीने कार्य करावे लागेल. पानसरे दाम्पत्य या हल्ल्यातून लवकर बरे होवो, ही शुभेच्छा.
डॉ. श्रीनिवास खांदेवाले
अर्थतज्ज्ञ

धर्मांध शक्तींचा आततायीपणा वाढला आहे

नरेंद्र दाभोलकर यांच्यावर झालेला हल्ला ज्या विचारांनी केला आहे, त्यातूनच कॉ. गोविंद पानसरे दाम्पत्यावर सुद्धा हल्ला झाला आहे, असे माझे पक्के मत आहे. केंद्रात नवीन सरकार स्थापन झाल्यापासून देशात धर्मांध शक्तींचा आततायीपणा अधिक वाढला आहे. या शक्तींना रोखण्याबाबत सरकारची भूमिकासुद्धा संशयास्पद दिसून येते. हा हल्ला निंदनीय आहेच. हल्लेखोरांना तातडीने पकडून शिक्षा व्हावी.
मोहनदास नायडू
ज्येष्ठ नेते : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

हल्लेखोरांना कठोर शिक्षा करा

ज्येष्ठ विचारवंत व फुले,शाहू,आंबेडकर चळवळीतील खंदे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या नराधमांना त्वरित अटक करण्यात यावी व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी. पुण्यातील नरेंद्र दाभोलकर यांची करण्यात आलेली हत्या व कॉ. पानसरे यांच्यावर करण्यात आलेला हल्ला हा जातीय सांप्रदायिक शक्तींनी घडवून आणला असावा, असा संशय आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या राष्ट्रद्रोही समाजकंटकांना आता जनतेनेही धडा शिकवण्याची तयारी ठेवावी.
आ. प्रा. जोगेंद्र कवाडे
अध्यक्ष - पीपल्स रिपब्लिकन पार्टी


दाभोलकरांची हत्या करणाऱ्यांचाच हल्ला

नरेंद्र दाभोललर यांची हत्या करणाऱ्या लोकांनीच कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला केला आहे, असे आमचे स्पष्ट मत आहे. हा हल्ला म्हणजे पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रतिगामी शक्तींनी दिलेला इशारा आहे. पुरोगामी विरोधात प्रतिगामी या लढाईतूनच हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यातून पानसरे दाम्पत्य लवकर बरे होवोत.
डॉ. सुरेश खैरनार
सामाजिक कार्यकर्ते