शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

सन 2100 पर्यंत भारताची लोकसंख्या 100 तर चीनची लोकसंख्या 49 कोटींवर येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 14:21 IST

लोकसंख्येनुसार चीन जगात पहिल्या क्रमांकावर आहे, तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

लोकसंख्येनुसार चीन जगात पहिल्या क्रमांकावर आहे, तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आपल्यापैकी बहुतेकांना असे वाटते की, येत्या काळात भारतात लोकसंख्येचा स्फोट होईल आणि भारत चीनच्या पुढे जाईल. परंतु, भारताची लोकसंख्या येत्या 78 वर्षात 41 कोटींनी कमी होणार आहे. त्याहूनही आश्चर्याची बाब म्हणजे सध्या 142 कोटींच्या आसपास असलेल्या चीनची लोकसंख्या 2100 साली 49 कोटींपर्यंत घसरणार आहे. तुम्ही विचार करत असाल की, हे कसे होऊ शकते? 

युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन डिव्हिजनच्या डेटानुसार सध्या भारत आणि चीनची लोकसंख्या जवळपास सारखीच आहे. परंतु आगामी काळात चीनची लोकसंख्या भारताच्या तुलनेत कितीतरी पटीने कमी होणार आहे. आकडेवारीनुसार, सन 2100 पर्यंत भारताची लोकसंख्या सुमारे 100 कोटी आणि चीनची लोकसंख्या 49 कोटींच्या आसपास येईल.  अमेरिकेबद्दल बोलायचे झाले तर येत्या 78 वर्षांत अमेरिकेची लोकसंख्या 33 कोटींवरून 28 कोटींवर येईल. 

चीनची लोकसंख्या भारतापेक्षा जास्त आहे, परंतु घनतेच्या बाबतीत भारत चीनपेक्षा खूप पुढे आहे. भारतात 1 चौरस किलोमीटरमध्ये 476 लोक राहतात. तर, चीनमध्ये 1 चौरस किलोमीटरमध्ये केवळ 148 लोक राहतात. कारण चीनचे क्षेत्रफळ भारतापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. परंतु भारत, चीन आणि जपानची लोकसंख्येची घनता संपूर्ण जगाच्या तुलनेत खूपच कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. 

टॅग्स :Indiaभारतchinaचीन