शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

सन 2100 पर्यंत भारताची लोकसंख्या 100 तर चीनची लोकसंख्या 49 कोटींवर येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 14:21 IST

लोकसंख्येनुसार चीन जगात पहिल्या क्रमांकावर आहे, तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

लोकसंख्येनुसार चीन जगात पहिल्या क्रमांकावर आहे, तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आपल्यापैकी बहुतेकांना असे वाटते की, येत्या काळात भारतात लोकसंख्येचा स्फोट होईल आणि भारत चीनच्या पुढे जाईल. परंतु, भारताची लोकसंख्या येत्या 78 वर्षात 41 कोटींनी कमी होणार आहे. त्याहूनही आश्चर्याची बाब म्हणजे सध्या 142 कोटींच्या आसपास असलेल्या चीनची लोकसंख्या 2100 साली 49 कोटींपर्यंत घसरणार आहे. तुम्ही विचार करत असाल की, हे कसे होऊ शकते? 

युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन डिव्हिजनच्या डेटानुसार सध्या भारत आणि चीनची लोकसंख्या जवळपास सारखीच आहे. परंतु आगामी काळात चीनची लोकसंख्या भारताच्या तुलनेत कितीतरी पटीने कमी होणार आहे. आकडेवारीनुसार, सन 2100 पर्यंत भारताची लोकसंख्या सुमारे 100 कोटी आणि चीनची लोकसंख्या 49 कोटींच्या आसपास येईल.  अमेरिकेबद्दल बोलायचे झाले तर येत्या 78 वर्षांत अमेरिकेची लोकसंख्या 33 कोटींवरून 28 कोटींवर येईल. 

चीनची लोकसंख्या भारतापेक्षा जास्त आहे, परंतु घनतेच्या बाबतीत भारत चीनपेक्षा खूप पुढे आहे. भारतात 1 चौरस किलोमीटरमध्ये 476 लोक राहतात. तर, चीनमध्ये 1 चौरस किलोमीटरमध्ये केवळ 148 लोक राहतात. कारण चीनचे क्षेत्रफळ भारतापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. परंतु भारत, चीन आणि जपानची लोकसंख्येची घनता संपूर्ण जगाच्या तुलनेत खूपच कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. 

टॅग्स :Indiaभारतchinaचीन