शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बुलेट ट्रेन हे श्रीमंतांचे चोचले, ‘मेट्रो मॅन' इ. श्रीधरन यांचे परखड मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 23:46 IST

बुलेट ट्रेनचा प्रवास अत्यंत महागडा असून तो सामान्य माणसांच्या आवाक्यातला नाही. ही ट्रेन म्हणजे श्रीमंतांचे चोचले आहेत.

तिरुवनंतपुरम : बुलेट ट्रेनचा प्रवास अत्यंत महागडा असून तो सामान्य माणसांच्या आवाक्यातला नाही. ही ट्रेन म्हणजे श्रीमंतांचे चोचले आहेत. त्यापेक्षा सध्या देशाला आधुनिक, सुरक्षित, जलदगतीच्या रेल्वेगाड्या व यंत्रणेची गरज आहे असे कोकण रेल्वे, दिल्ली मेट्रोसारख्या प्रकल्पांचे माजी प्रमुख इ. श्रीधरन यांनी म्हटले आहे.देशातील सर्व मेट्रो रेल्वे प्रकल्पांची मानकनिश्चिती करण्याचे काम ८६ वर्षे वयाचे मेट्रो मॅन इ. श्रीधरन यांच्यावर अलीकडेच केंद्र सरकारने सोपविले आहे. मानकनिश्चितीमुळे मेट्रो प्रकल्पांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल. मेट्रो रेल्वेसाठी लागणाऱ्या डब्यांचे व सुट्या भागांचे उत्पादन सुरु करता येईल असे सांगून श्रीधरन म्हणाले की, मेट्रो रेल्वे व त्याच्याशी संबंधित गोष्टींचे उत्पादन मेक इन इंडिया प्रकल्पांतर्गत करण्यासाठीही हालचाली सुरु आहेत.भारतीय रेल्वे जगापेक्षा वीस वर्षे मागेदेशभरात सध्या १३ मेट्रो रेल्वे प्रकल्पांचे काम सुरु आहे. २० वर्षांच्या कालावधीत दिल्ली मेट्रोच्या जाळ््याचा २६० किमीपर्यंत विस्तार झाला आहे. तो जगातील सर्वात वेगाने विकसित होणारा मेट्रो प्रकल्प आहे. मात्र अशी प्रगती भारतीय रेल्वेची झालेली नाही. बायो टॉयलेटची सुविधा वगळली तर रेल्वे यंत्रणेत फारसे आधुनिकीकरण झालेले नाही. गाड्यांचा वेग लक्षणीय म्हणावा इतका वाढलेला नाही. महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांचा वेगही कमी झाला आहे. गाड्या वेळेत सुटत नाहीत. रेल्वे अपघातांची आकडेवारी अचूक नसते. प्रगत देशांपेक्षा भारतातील रेल्वे यंत्रणा वीस वर्षे तरी मागे आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन