शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

मंदिर उभारणे ही बलिदान देणाऱ्यांना खरी श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 04:44 IST

त्यावेळी जे बरोबर नव्हते, ते आताही बरोबर आहेत; नरेंद्र मोदी वीर पुरुष; राममंदिरासाठी संघर्ष करणाऱ्यांची शिलान्यासामध्ये कोणतीही भूमिका नाही : विनय कटियार

नितीन अग्रवाल ।नवी दिल्ली : राममंदिराची मागणी जनआंदोलनामध्ये बदलणारे व मंदिर निर्माणापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे नेते मंदिराच्या शिलान्यासाच्या कार्यक्रमात केवळ प्रेक्षकांच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. राममंदिर आंदोलनाचा प्रमुख चेहरा राहिलेले माजी खा. विनय कटियार यांचे म्हणणे आहे की, १५ सेकंदांच्या लहानशा शुभ मुहूर्तावर होणाºया शिलान्यासात कोणाची काहीही भूमिका राहणार नाही.

राममंदिर व आंदोलनाशी संबंधित अनेक पैलूंवर बजरंग दलाचे संस्थापक अध्यक्ष विनय कटियार यांनी ‘लोकमत’बरोबर केलेली ही विशेष बातचीत-राममंदिर आंदोलनाचा बिगुल वाजवणाºया नेत्यांच्या शिलान्यासामधील आंदोलनाबाबत ते म्हणाले की, यात कोणाची काही भूमिका नाही. हा केवळ २०० ते २५० लोकांचा कार्यक्रम आहे. कोरोनामुळे सर्वांना लांब-लांब बसविण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी १५ सेकंदांच्या शुभ महूर्तावर भूमिपूजन करतील. तथापि, ते ३ तास अयोध्येत राहतील.राममंदिरासाठी आंदोलन उभे करून मोठा संघर्ष करणारे लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासारख्या नेत्यांच्या भूमिपूजनातील सहभागाबद्दल कटियार म्हणाले की, यात न्याय-अन्याय यासारखे काहीही नाही. आता मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्व जण मिळून ते उभारत आहेत. जे लोक त्यावेळी बरोबर नव्हते, तेही आज बरोबर आहेत.मंदिराचा मुद्दा बनवून भाजपच्या सत्तेपर्यंत पोहोचण्याच्या प्रश्नावर तीन वेळा लोकसभा व एक वेळ राज्यसभेत गेलेले कटियार म्हणाले की, भाजपने मंदिराला पाठिंबा दिला; परंतु कधीच मुद्दा बनवला नाही. पक्षाने जाहीरनाम्यात याला स्थान दिले असले तरी मुद्दा कधीच बनवला नाही.भाजपचे माजी राष्टÑीय सरचिटणीस राहिलेले कटियार म्हणाले की, नरेंद्र मोदी वीर पुरुष आहेत. ते अयोध्येत येत आहेत. त्यांच्या कार्यकाळात मंदिर बनवण्याचा मार्ग मोकळा झाला. काँग्रेसने काही अपप्रचार चालवून लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला होता; परंतु आता निर्णय झालेला आहे व सर्व काही शांततेत होत आहे. जुन्या आठवणींना उजाळा देताना कटियार म्हणाले की, त्यादिवशी देशभरातून रामनाम लिहिलेल्या विटा घेऊन रामभक्त कारसेवक अयोध्येत दाखल झाले होते.मंदिरासाठी दीर्घ आंदोलनच्हिंदू जागरण मंच व बजरंग दलाची स्थापना करून मंदिर आंदोलन व्यापक बनवणारे कटियार हे कारसेवकांवर गोळ्या चालविण्यासाठी तत्कालीन मुलायम सरकारला दोषी मानतात.च्ते म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी संपूर्ण अयोध्येतील रस्ते रक्तरंजित केले होते.च्१५२८ मध्ये सुरू झालेल्या मंदिरासाठीच्या शेकडो वर्षांच्या संघर्षात तीन लाख लोकांनी बलिदान दिले. मंदिराचा शिलान्यास त्या बलिदांनाना खरी श्रद्धांजली होईल.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या