शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

मंदिर उभारणे ही बलिदान देणाऱ्यांना खरी श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 04:44 IST

त्यावेळी जे बरोबर नव्हते, ते आताही बरोबर आहेत; नरेंद्र मोदी वीर पुरुष; राममंदिरासाठी संघर्ष करणाऱ्यांची शिलान्यासामध्ये कोणतीही भूमिका नाही : विनय कटियार

नितीन अग्रवाल ।नवी दिल्ली : राममंदिराची मागणी जनआंदोलनामध्ये बदलणारे व मंदिर निर्माणापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे नेते मंदिराच्या शिलान्यासाच्या कार्यक्रमात केवळ प्रेक्षकांच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. राममंदिर आंदोलनाचा प्रमुख चेहरा राहिलेले माजी खा. विनय कटियार यांचे म्हणणे आहे की, १५ सेकंदांच्या लहानशा शुभ मुहूर्तावर होणाºया शिलान्यासात कोणाची काहीही भूमिका राहणार नाही.

राममंदिर व आंदोलनाशी संबंधित अनेक पैलूंवर बजरंग दलाचे संस्थापक अध्यक्ष विनय कटियार यांनी ‘लोकमत’बरोबर केलेली ही विशेष बातचीत-राममंदिर आंदोलनाचा बिगुल वाजवणाºया नेत्यांच्या शिलान्यासामधील आंदोलनाबाबत ते म्हणाले की, यात कोणाची काही भूमिका नाही. हा केवळ २०० ते २५० लोकांचा कार्यक्रम आहे. कोरोनामुळे सर्वांना लांब-लांब बसविण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी १५ सेकंदांच्या शुभ महूर्तावर भूमिपूजन करतील. तथापि, ते ३ तास अयोध्येत राहतील.राममंदिरासाठी आंदोलन उभे करून मोठा संघर्ष करणारे लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासारख्या नेत्यांच्या भूमिपूजनातील सहभागाबद्दल कटियार म्हणाले की, यात न्याय-अन्याय यासारखे काहीही नाही. आता मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्व जण मिळून ते उभारत आहेत. जे लोक त्यावेळी बरोबर नव्हते, तेही आज बरोबर आहेत.मंदिराचा मुद्दा बनवून भाजपच्या सत्तेपर्यंत पोहोचण्याच्या प्रश्नावर तीन वेळा लोकसभा व एक वेळ राज्यसभेत गेलेले कटियार म्हणाले की, भाजपने मंदिराला पाठिंबा दिला; परंतु कधीच मुद्दा बनवला नाही. पक्षाने जाहीरनाम्यात याला स्थान दिले असले तरी मुद्दा कधीच बनवला नाही.भाजपचे माजी राष्टÑीय सरचिटणीस राहिलेले कटियार म्हणाले की, नरेंद्र मोदी वीर पुरुष आहेत. ते अयोध्येत येत आहेत. त्यांच्या कार्यकाळात मंदिर बनवण्याचा मार्ग मोकळा झाला. काँग्रेसने काही अपप्रचार चालवून लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला होता; परंतु आता निर्णय झालेला आहे व सर्व काही शांततेत होत आहे. जुन्या आठवणींना उजाळा देताना कटियार म्हणाले की, त्यादिवशी देशभरातून रामनाम लिहिलेल्या विटा घेऊन रामभक्त कारसेवक अयोध्येत दाखल झाले होते.मंदिरासाठी दीर्घ आंदोलनच्हिंदू जागरण मंच व बजरंग दलाची स्थापना करून मंदिर आंदोलन व्यापक बनवणारे कटियार हे कारसेवकांवर गोळ्या चालविण्यासाठी तत्कालीन मुलायम सरकारला दोषी मानतात.च्ते म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी संपूर्ण अयोध्येतील रस्ते रक्तरंजित केले होते.च्१५२८ मध्ये सुरू झालेल्या मंदिरासाठीच्या शेकडो वर्षांच्या संघर्षात तीन लाख लोकांनी बलिदान दिले. मंदिराचा शिलान्यास त्या बलिदांनाना खरी श्रद्धांजली होईल.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या