विकतचे पाणी घेऊन मोफत पुरवठा भारतभूमी संस्थेचा उपक्रम : नागरिकांची भटकंती थांबली

By Admin | Updated: July 13, 2015 16:07 IST2015-07-13T16:07:47+5:302015-07-13T16:07:47+5:30

एस.आर. मुळे, शिरूर अनंतपाळ : पावसाने दडी मारल्याने सध्या शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ घागरभर पाण्यासाठी नागरिकांना रात्री-अपरात्री भटकंती करावी लागत असल्याचे पाहून येथील भारतभूमी सेवाभावी संस्थेच्या वतीने पाणी विकत घेऊन टँकरद्वारे मोफत पुरवठा सुरु केला आहे़ या उपक्रमामुळे नागरिकांची सोय झाली आहे.

BUILDING BUILDING FREE BUILDING WITH BUY BALANCED PROGRAM: Citizens' wanderings stopped | विकतचे पाणी घेऊन मोफत पुरवठा भारतभूमी संस्थेचा उपक्रम : नागरिकांची भटकंती थांबली

विकतचे पाणी घेऊन मोफत पुरवठा भारतभूमी संस्थेचा उपक्रम : नागरिकांची भटकंती थांबली

.आर. मुळे, शिरूर अनंतपाळ : पावसाने दडी मारल्याने सध्या शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ घागरभर पाण्यासाठी नागरिकांना रात्री-अपरात्री भटकंती करावी लागत असल्याचे पाहून येथील भारतभूमी सेवाभावी संस्थेच्या वतीने पाणी विकत घेऊन टँकरद्वारे मोफत पुरवठा सुरु केला आहे़ या उपक्रमामुळे नागरिकांची सोय झाली आहे.
शिरूर अनंतपाळ शहरास घरणी मध्यम प्रकल्पाच्या शिवपूर जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणीपुरवठा केला जातो. परंतु, सध्या घरणी मध्यम प्रकल्पात अत्यल्प जलसाठा शिल्लक असून, गाळमिश्रित पाणी आहे. त्यामुळे हा पाणीपुरवठा नियमित नाही. त्याचबरोबर शहरातील अनेक हातपंप, विद्युतपंप बंद पडले आहेत. परिणामी, तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यातच पावसाने दडी मारली आहे़ पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ नागरिकांचा हा त्रास कमी व्हावा, यासाठी येथील भारतभूमी सेवाभावी संस्थेच्या वतीने डॉ. अरविंद भातांब्रे यांनी गेल्या १५ दिवसांपासून पाणी विकत घेऊन टँकरने गल्लोगल्ली मोफत पुरवठा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
या सेवाभावी संस्थेने पाणी वाटपासाठी चौघांची नियुक्ती केली असून, यात हमीद तांबोळी, नागेश भातांब्रे, श्रीराम गुराळे, शिवकांत संभाळे यांचा समावेश आहे़ ज्या गल्लीत तीव्र पाणीटंचाई आहे, त्यास प्रथम प्राधान्य देऊन पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ दिवसभरात टँकरच्या चार ते पाच खेपा विविध गल्लीत होतात़
चाळीस हजार खर्च...
दरम्यान, जून अखेरपासून सुरू झालेल्या या टँकरवर आजतागायत ४० हजार रुपयांचा खर्च झाला असून, प्रति टँकरला साधारणपणे ८०० रुपये खर्च येत असल्याचे डॉ. भातांब्रे यांनी सांगितले. दरम्यान, दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून, पाणीटंचाईच्या झळा वाढत आहेत. त्यामुळे पाऊस पडेपर्यंत मोफत पाणीपुरवठा करण्याचा संकल्प सेवाभावी संस्थेने केला आहे़

Web Title: BUILDING BUILDING FREE BUILDING WITH BUY BALANCED PROGRAM: Citizens' wanderings stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.