शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

“मोबाईलमध्ये असे मेसेज आहेत की ते डिलीट केले नाही तर अडकेन”; भाजपा खासदाराचं संसदेत विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 15:11 IST

Cyber Fraud Issue Raised in Rajyasabha: त्याचसोबत बँकेकडून परवानगी नसतानाही गुन्हेगार क्रेडिट मर्यादेपलीकडे रोख रक्कम काढण्यास यशस्वी होतात

ठळक मुद्देमला या प्रकराचे अनेक घटना समजल्या आहेत. जिथे मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढली गेली आहे५ लाखांची लॉटरी लागली आहे असे मेसेज सगळ्यांना येत आहेत, ५ रुपये दिले तर ५ लाखांची लॉटरी लागेलबँक कोणतीही कारवाई करत नाही, अशा प्रकरणात तातडीने कारवाई होऊन जे पीडित असतील त्यांना त्यांचे पैसे परत मिळायला हवेत

नवी दिल्ली – राज्यसभेत बुधवारी काही सदस्यांनी डिजिटल व्यवहार, एटीएमच्या ग्राहकांसोबत होणाऱ्या फसवणुकीबाबत आणि बँकिंग सुविधेवर मुद्दा उचलला आणि, सरकारने आवश्यक कारवाई करण्याची मागणी केली आहे. भाजपा खासदार शिवप्रताप शुक्ला यांनी सायबर गुन्हेगारांकडून बँक ग्राहकांना फोन करून फसवणूक केल्याप्रकरणी मुद्दा उपस्थित केला होता. बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून लोकांची फसवणूक होत असल्याचा त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणलं.

याबाबत उत्तर प्रदेशचे भाजपा खासदार शिवप्रताप शुक्ला म्हणाले की, फेक कॉल सेंटरमधून ग्राहकांना फोन करून त्यांची फसवणूक केली जाते, त्यासाठी हे गुन्हेगार बनावट डोमेनचा वापर करतात. हे सायबर गुन्हेगार कॉल करून KYC अपडेट करण्याचं ग्राहकांना सांगतात. असं नाही केल्यास खाते बंद होण्याची धमकी देतात. त्यामुळे समोरील ग्राहक घाबरून OTP देतो. त्यामुळे ग्राहकांच्या खात्यावरून परस्पर मोठी रक्कम लंपास करण्याचे प्रकार घडतात.

त्याचसोबत बँकेकडून परवानगी नसतानाही गुन्हेगार क्रेडिट मर्यादेपलीकडे रोख रक्कम काढण्यास यशस्वी होतात. मला या प्रकराचे अनेक घटना समजल्या आहेत. जिथे मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढली गेली आहे. ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. आताही मोबाईलवर असे मेसेज आहेत, जे डिलीट केले नाही तर अडकेन असं भाजपा खासदार म्हणाले. यावर सभापती वैकय्या नायडूंनी सांगितलं की, ५ लाखांची लॉटरी लागली आहे असे मेसेज सगळ्यांना येत आहेत, ५ रुपये दिले तर ५ लाखांची लॉटरी लागेल असं ते म्हणाले.

लोकांना त्यांचे पैसे परत मिळावेत

भाजपा खासदार संसदेत म्हणाले की, बँक कोणतीही कारवाई करत नाही, अशा प्रकरणात तातडीने कारवाई होऊन जे पीडित असतील त्यांना त्यांचे पैसे परत मिळायला हवेत. ग्राहकांच्या मोबाईलवर अशाप्रकारे मेसेज येतात की, काही रुपये जमा करा तुम्हाला लाखो रुपये मिळतील, प्रलोभन दाखवून ग्राहकांची लूट होते असं त्यांनी सांगितले.

पिन ऐवजी ओटीपी लागू करा

भाजपाचे रामकुमार वर्मा यांनी एटीएममधून पैसे काढण्याबाबत सरकारला पिन ऐवजी ओटीपी लागू करण्याची मागणी केली, त्यामुळे एटीएममधून परस्पर पैसे काढण्याचं सायबर गुन्ह्यांना आळा घालता येईल असं त्यांनी सांगितले.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाbankबँक