शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

“मोबाईलमध्ये असे मेसेज आहेत की ते डिलीट केले नाही तर अडकेन”; भाजपा खासदाराचं संसदेत विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 15:11 IST

Cyber Fraud Issue Raised in Rajyasabha: त्याचसोबत बँकेकडून परवानगी नसतानाही गुन्हेगार क्रेडिट मर्यादेपलीकडे रोख रक्कम काढण्यास यशस्वी होतात

ठळक मुद्देमला या प्रकराचे अनेक घटना समजल्या आहेत. जिथे मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढली गेली आहे५ लाखांची लॉटरी लागली आहे असे मेसेज सगळ्यांना येत आहेत, ५ रुपये दिले तर ५ लाखांची लॉटरी लागेलबँक कोणतीही कारवाई करत नाही, अशा प्रकरणात तातडीने कारवाई होऊन जे पीडित असतील त्यांना त्यांचे पैसे परत मिळायला हवेत

नवी दिल्ली – राज्यसभेत बुधवारी काही सदस्यांनी डिजिटल व्यवहार, एटीएमच्या ग्राहकांसोबत होणाऱ्या फसवणुकीबाबत आणि बँकिंग सुविधेवर मुद्दा उचलला आणि, सरकारने आवश्यक कारवाई करण्याची मागणी केली आहे. भाजपा खासदार शिवप्रताप शुक्ला यांनी सायबर गुन्हेगारांकडून बँक ग्राहकांना फोन करून फसवणूक केल्याप्रकरणी मुद्दा उपस्थित केला होता. बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून लोकांची फसवणूक होत असल्याचा त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणलं.

याबाबत उत्तर प्रदेशचे भाजपा खासदार शिवप्रताप शुक्ला म्हणाले की, फेक कॉल सेंटरमधून ग्राहकांना फोन करून त्यांची फसवणूक केली जाते, त्यासाठी हे गुन्हेगार बनावट डोमेनचा वापर करतात. हे सायबर गुन्हेगार कॉल करून KYC अपडेट करण्याचं ग्राहकांना सांगतात. असं नाही केल्यास खाते बंद होण्याची धमकी देतात. त्यामुळे समोरील ग्राहक घाबरून OTP देतो. त्यामुळे ग्राहकांच्या खात्यावरून परस्पर मोठी रक्कम लंपास करण्याचे प्रकार घडतात.

त्याचसोबत बँकेकडून परवानगी नसतानाही गुन्हेगार क्रेडिट मर्यादेपलीकडे रोख रक्कम काढण्यास यशस्वी होतात. मला या प्रकराचे अनेक घटना समजल्या आहेत. जिथे मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढली गेली आहे. ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. आताही मोबाईलवर असे मेसेज आहेत, जे डिलीट केले नाही तर अडकेन असं भाजपा खासदार म्हणाले. यावर सभापती वैकय्या नायडूंनी सांगितलं की, ५ लाखांची लॉटरी लागली आहे असे मेसेज सगळ्यांना येत आहेत, ५ रुपये दिले तर ५ लाखांची लॉटरी लागेल असं ते म्हणाले.

लोकांना त्यांचे पैसे परत मिळावेत

भाजपा खासदार संसदेत म्हणाले की, बँक कोणतीही कारवाई करत नाही, अशा प्रकरणात तातडीने कारवाई होऊन जे पीडित असतील त्यांना त्यांचे पैसे परत मिळायला हवेत. ग्राहकांच्या मोबाईलवर अशाप्रकारे मेसेज येतात की, काही रुपये जमा करा तुम्हाला लाखो रुपये मिळतील, प्रलोभन दाखवून ग्राहकांची लूट होते असं त्यांनी सांगितले.

पिन ऐवजी ओटीपी लागू करा

भाजपाचे रामकुमार वर्मा यांनी एटीएममधून पैसे काढण्याबाबत सरकारला पिन ऐवजी ओटीपी लागू करण्याची मागणी केली, त्यामुळे एटीएममधून परस्पर पैसे काढण्याचं सायबर गुन्ह्यांना आळा घालता येईल असं त्यांनी सांगितले.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाbankबँक