आज केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाला. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजार मोठ्या प्रमाणात कोसळला. राजकीय वर्तुळात या अर्थसंकल्पाचे सत्ताधारी नेत्यांनी कौतुक केले. तर विरोधकांनी टीका केली. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या विधेयकावर टीका करत बेरोजगारी, कृषी संकट आणि घटत्या बचतीबद्दल चिंता व्यक्त केली .
अर्थसंकल्पानंतर पंतप्रधान मोदींनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे अभिनंदन केले, हा अर्थसंकल्प सध्याच्या स्वप्नांना पूर्ण करते. हा अर्थसंकल्प ऐतिहासिक आहे. आज भारत सुधारणांच्या दिशेने प्रवास करत आहे, असंही मोदी म्हणाले. दरम्यान, विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी या अर्थसंकल्पातील उणीवा देशवासीयांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला.
राहुल गांधी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर केली. "बेरोजगार तरुणाई, घटते उत्पादन, गुंतवणूकदार भांडवल काढून घेत आहेत, घरगुती बचत वेगाने कमी होत आहे, संकटात शेतकरी, येणारे जागतिक धक्के - या सर्वांकडे दुर्लक्ष केले आहे. सुधारणांना नकार देणारा अर्थसंकल्प भारताच्या खऱ्या संकटांपासून अनभिज्ञ आहे, याबाबत गांधी यांनी चिंता व्यक्त केली.
काँग्रेसचा एनडीए सरकारवर जोरदार निशाणा
काँग्रेस अर्थसंकल्पाला जमिनीच्या वास्तवापासून पूर्णपणे वेगळे म्हणत आहे. संकटात सापडलेले शेतकरी आणि बुडत्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष दिले नाही आणि लोकांना प्राधान्य देण्यासाठी खऱ्या सुधारणांची आवश्यकता आहे, आवडींना नाही, अशी टीका काँग्रेसच्या नेत्यांनी केली.
अर्थसंकल्पात पारदर्शकतेचा अभाव
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलेले अर्थसंकल्पीय भाषणही पारदर्शक नव्हते कारण त्यात प्रमुख कार्यक्रम आणि योजनांसाठी अर्थसंकल्पीय वाटपाची कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती.
जयराम रमेश यांनी 'एक्स'वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “कागदपत्रे तपशीलवार वाचण्याची आवश्यकता असली तरी, ९० मिनिटांनंतर हे स्पष्ट होते की, २०२६-२७ चा अर्थसंकल्प त्याबद्दल निर्माण झालेल्या अपेक्षा पूर्ण करत नव्हता.
Web Summary : Rahul Gandhi slammed Budget 2026, pointing to rising unemployment, falling manufacturing, and farmers' distress. He claims the budget ignores India's real crises and lacks necessary reforms, while the Congress party criticizes its lack of transparency and detachment from ground realities.
Web Summary : राहुल गांधी ने बजट 2026 की आलोचना करते हुए बढ़ती बेरोजगारी, गिरते उत्पादन और किसानों की दुर्दशा की ओर इशारा किया। उनका दावा है कि बजट भारत के वास्तविक संकटों को अनदेखा करता है और इसमें आवश्यक सुधारों का अभाव है, जबकि कांग्रेस पार्टी इसकी पारदर्शिता की कमी और जमीनी हकीकत से अलगाव की आलोचना करती है।